शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पावसाच्या तोंडावर सरकार कुठे आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 10:52 IST

Agriculture News: शेतकऱ्यांची शेतीमधील लगबग आता वाढली आहे. मान्सून सक्रिय झाल्याने आता शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी सर्वार्थाने सज्ज राहावे लागणार आहे. देशभर निवडणुकांचा माहोल असला तरी शेतकऱ्यांना पेरणीपेक्षा जास्त महत्त्वाचे काहीच नसते.  

- डॉ. अजित नवले(राष्ट्रीय सहसचिव, अखिल भारतीय किसान सभा)शेतकऱ्यांची शेतीमधील लगबग आता वाढली आहे. मान्सून सक्रिय झाल्याने आता शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी सर्वार्थाने सज्ज राहावे लागणार आहे. देशभर निवडणुकांचा माहोल असला तरी शेतकऱ्यांना पेरणीपेक्षा जास्त महत्त्वाचे काहीच नसते.  तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे वेळ आलीच तर ‘मढे झाकुनिया करती पेरणी’ अशी शेतकऱ्यांची अवस्था  असते. संपूर्ण देश सरकार कोणाचे येणार, यात गुंतलेला असतानाही राज्यभरातील शेतकऱ्यांनी यामुळेच मशागतीची पूर्वहंगामी कामे उरकत आणली आहेत. प्रत्यक्ष पेरणी-लागवडीची तयारी तो करतो आहे. शेतकरी अशाप्रकारे खरिपाच्या तयारीत व्यग्र असताना राज्याचे शासन-प्रशासन मात्र निवांत दिसत आहे. आचारसंहितेच्या आडून आपली जबाबदारी इतरांवर ढकलताना दिसते  आहे. 

राज्याच्या एकूण १६६.५० लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी १५१ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होत असते. खरीप हंगामात १४७.७७ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होण्याचा अंदाज आहे. सोयाबीनची राज्यात ५०.७० लाख हेक्टरवर पेरणी होणे अपेक्षित आहे. इतर पिकांची २.६ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. इतकी  पेरणी व्हावी यासाठी राज्याला किमान १९.२८ लाख क्विंटल  बियाणांची आवश्यकता आहे. सध्या महाबीजकडून ३.७६ लाख क्विंटल, राष्ट्रीय बीज निगमकडून ०.५९ लाख क्विंटल आणि खासगी बियाणे कंपन्यांकडून २०.६५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होणे अपेक्षित आहे. 

एकूण बियाण्यांच्या गरजेपैकी राज्याला तब्बल सुमारे बियाण्यांसाठी खासगी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. बियाण्यांच्या गुणवत्तेचे अनेक गंभीर प्रश्न यामुळे निर्माण होत आहेत.  राज्यात सध्या आवश्यक बियाण्याच्या तुलनेत इतकेच अधिकचे बियाणे उपलब्ध आहे. दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करण्यासाठी यापेक्षा खूप अधिक बियाणे हाताशी ठेवण्याची आवश्यकता  आहे. 

कृषी विभागाची  झाली दैना खरिपाची तयारी करण्याची मुख्य जबाबदारी कृषी विभागाची असते. राज्याचे कृषी मंत्री, कृषी सचिव व कृषी आयुक्तांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कृषी विभागाने खरीप हंगामाला सामोरे जाण्यासाठी अत्यंत कुशलतेने नियोजन करणे अपेक्षित असते. दुर्दैवाने राज्याच्या विस्कटलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची अक्षरशः दैना झाली आहे. कृषी आयुक्त, कृषी सचिव व कृषी विभागातील विविध अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदल्या होत आहेत. अनेक  पदे रिक्त आहेत. विभागातील बहुतांश सर्वोच्च पदांवर ‘प्रभारी’ अधिकारी कार्यरत आहेत. प्रभारी चार्ज असल्याने हे अधिकारी खरीप नियोजनासाठी गंभीर नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री, कृषिमंत्री व इतरही संबंधित मंत्री निवडणुकांमध्ये मश्गुल होते. राज्याचा कृषी विभाग यामुळे गळीतगात्र झाला. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीmonsoonमोसमी पाऊसMaharashtraमहाराष्ट्र