शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

शाळेतली मुले जेव्हा मनातले लिहितात..

By admin | Updated: February 27, 2016 15:08 IST

मुले कविता करतात, गोष्टी लिहितात, साहित्य संमेलने भरवतात आणि संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवतात. आणि तेही मुंबै-पुण्यापासून दूरच्या गावखेडय़ात! - जिल्हा परिषदांच्या शाळांमधले एक शुभवर्तमान

- हेरंब कुलकर्णी
 
 
समजा, चौथी-पाचवीतल्या एखाद्या मुला-मुलीला म्हटले, तुला स्वप्नात काय दिसते? तुङया मनात काय चालू असते? तुला कशाचा राग येतो? काय बदलावेसे/नकोसे वाटते?.. त्या सगळ्याबद्दल लिही. तर?
- मोठय़ा माणसांना थक्क करील अशी अभिव्यक्ती पुढे येते. एरवी सरकारी शाळेतल्या शिक्षणाच्या दर्जाच्या नावाने कायम चिंतित असणा:या महाराष्ट्रात लहानग्यांच्या अभिव्यक्तीला काळजीने शिंपण करत कथा-कवितांचे मळे फुलवण्याचे काम काही शिक्षक व्रत घेतल्यासारखे करीत आहेत. काल मराठी दिन साजरा झाला. मराठीच्या भवितव्याविषयी सालाबादप्रमाणो सर्वत्र चिंता व्यक्त झाली. पण ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या मुलांची अभिव्यक्ती उंचावणारे सध्या सुरू असलेले प्रयोग बघितले की थक्क व्हायला होते. मुलांची अभिव्यक्ती फुलविणो हा ज्ञानरचनावादाचा गाभा आहे. यानुसार ग्रामीण  मुले कथा-कविता लिहू लागली आहेत. अनेक शाळा हस्तलिखिते काढतात, तर काहींनी चक्क मोठय़ा कवींसारखे कवितासंग्रह काढलेत. मुलांची साहित्यसंमेलनेही होऊ लागली आहेत.
कोल्हापूरच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेने पुढाकार घेऊन मुलांच्या साहित्य संमेलनाची परंपरा सुरू केली आहे. साहित्यिक असलेले गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी यांच्या पुढाकाराने गेल्या तीन वर्षापासून साहित्य संमेलने होत आहेत. अध्यक्ष हा लेखक विद्यार्थीच असतो. ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शन, कविसंमेलन, कथाकथन असे सारे होते. यावर्षी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबा भांड यांची मुलाखत लहान मुलांनी घेतली. तालुक्यातील शिक्षक संघटनेने या सर्व साहित्य संमेलनाचे नियोजन केले. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात लेखक आपल्या भेटीला हा उपक्र म साहित्य सभा अनेक वर्षे घेत. त्यातून मग मुलांना लिहिते करण्याची कल्पना पुढे आली. त्यानुसार नामदेव माळी व दयासागर बन्ने यांनी लिहिणा:या मुलांची कार्यशाळा घेतली. अनुभवाचे आशयात रूपांतर करणो, योग्य शब्दाची निवड करणो, अनावश्यक भाग वगळणो असे मुले शिकली. त्यातून ‘शाळकरी मुलांच्या कविता’ हा संग्रह झाला. 
किलबिल गोष्टी हा नामदेव माळींनी संपादित केलेला मुलांच्या कथांचा संग्रह महत्त्वपूर्ण आहे. मुलांच्याच कल्पना पुढे येऊ दिल्या. या गोष्टींच्या बोधकथा किंवा पारंपरिक गोष्टी होऊ दिल्या नाहीत. 
 केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक आराखडय़ात मुलांच्या बोलीभाषांना शिक्षणात महत्त्वाचे स्थान देण्याची मांडणी करण्यात आली होती. या शिक्षकांनी मुलांकडून बोलीभाषेत लेखन करून घेतले आहे. बालसाहित्याचे प्रभावी भाषांतरकार पृथ्वीराज तौर यांनी पाठय़पुस्तकातील कवितांचा मुलांकडून त्यांच्या बोलीभाषेत अनुवाद करून घेण्याचा प्रकल्पच उभा केला आहे. मुले अनुवाद करू शकतात हे खरेही वाटणार नाही पण 23 जिल्ह्यांतील 8क् पेक्षा जास्त शाळांतील 338 विद्याथ्र्यानी गोंडी, अहिराणी, गोरमाटी अशा 26  बोलीभाषेत अनुवाद केले आहेत. विशेष म्हणजे, हे अनुवाद ओबडधोबड नाहीत, तर मुलांनी मूळ कवितेचा अर्थ, लय, ताल पकडण्याचा प्रयत्न केला आहे. एकच उदाहरण : नारायण सुर्वेंच्या ‘डोंगरी शेत माझं गं’ या कवितेचा गोरमाटी भाषेत अनुवाद करताना हृषिकेश चव्हाण हा मुलगा लिहितो.
‘डुंगरेर खेत मार यं मं काम करूं 
आवगो बरस काम कारण मं मरू कतरा 
..शाळेतली मुले नुसती कविता लिहित नाहीत तर कवितांची भाषांतरेही करू शकतात, ही काहीशी अशक्य वाटणारी गोष्ट आज घडते आहे. आणि ती मुंबै-पुण्यापासून दूरच्या गावखेडय़ात घडते आहे. या रचनावादी शिक्षण पद्धतीत मुलांच्या अभिव्यक्तीवर विशेष भर आहे. मुलांना विचार करायला लावणो, बोलते करणो आणि त्यांच्या अनुभवांना व्यक्त व्हायला मदत करणो हा ज्ञानरचनावादाचा महत्त्वाचा पैलू शिक्षकांनी अचूक पकडून मुलांच्या सशक्त अभिव्यक्तीला व्यक्त होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न चालवले आहेत.
तेव्हा मराठी जगेल का याची चिंता करू नका. उगवत्या पिढीच्या सृजन पंखाच्या उबेत ती सुरक्षित आहे.. 
 
 
मुलांच्या मनात उतरताना..
 
बालसाहित्याचे प्रभावी भाषांतरकार पृथ्वीराज तौर व प्रा. स्वाती काटे यांनी  महाराष्ट्राच्या विविध भागातून  इंटरनॅशनल स्कूल ते आश्रमशाळा अशा व्यापक परिघात मुलांच्या कविता संकलित केल्या. 3क्क् कवितांबरोबर त्यांच्याकडे 45क् चित्रेही जमली. त्यातून ‘सृजनपंख’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. कल्पकता आणि स्वयंप्रेरणा या दोन निकषांवर कवितांची निवड करण्यात आली. पवनचक्कीपासून चिमण्यांर्पयत कितीतरी विषयांच्या वाटेने मुलांच्या मनात डोकावणारे हे पुस्तक मोठे लोभस झाले आहे.
 
‘छोटय़ांचे 
मोठय़ांविषयीचे विचार’
 
पुणो जिल्ह्यातील हवेली तालुक्यात शिक्षणा फाउंडेशनच्या मदतीने सोरतापवाडी येथे मुलांचे साहित्य संमेलन घेण्यात आले. अध्यक्ष होते 
फ. मुं. शिंदे. ‘छोटय़ांचे मोठय़ांविषयीचे विचार’ असा एक धाडसी परिसंवाद या संमेलनात होता. मुलांचे कविसंमेलन, लेखकाची मुलाखतही घेण्यात आली. या तालुक्यातील वढू खुर्द येथील सचिन बेंडभर या साहित्यिक शिक्षकाने ‘मनातल्या कविता’ हा शाळेतल्या मुलांच्या 
75 कवितांचा संग्रह प्रसिद्ध केला आहे. एकाच शाळेतील लिहिलेल्या 75 कविता संकलित करण्यासाठी धडपडलेल्या या शिक्षकाचे किती कौतुक करावे!
 
(लेखक शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आणि प्रयोगशील शिक्षक आहेत.)
herambkulkarni@gmail.com