शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

लग्नाचा मुहूर्त म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 12:34 IST

Marriage: विवाह मुहूर्त पाहून केलेले सर्वच विवाह यशस्वी होतात का, विवाह मुहूर्त नसताना जर कार्य केले तर ते अयशस्वी होते का, मुहूर्त नसताना ‘काढीव’ मुहूर्तावर विवाह कार्य करणे योग्य आहे का, असे प्रश्न अनेक जण विचारीत असतात.

- दा. कृ. सोमणपंचांगकर्ते, खगोल अभ्यासकविवाह मुहूर्त पाहून केलेले सर्वच विवाह यशस्वी होतात का, विवाह मुहूर्त नसताना जर कार्य केले तर ते अयशस्वी होते का, मुहूर्त नसताना ‘काढीव’ मुहूर्तावर विवाह कार्य करणे योग्य आहे का, असे प्रश्न अनेक जण विचारीत असतात. अर्थात पुढे त्या संसारांचे काय होते याविषयी अजून कोणीही संशोधन केलेले नाही. आपल्याकडे विवाह हा एक शुभ संस्कार मानला जातो. विवाहकार्य निर्विघ्नपणे  व्हावे, वधू-वरांचा भावी संसार सुखाचा व्हावा यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो. विवाहाच्या वेळी आप्तेष्ट मित्रमंडळी वधू-वरांना शुभाशीर्वाद, शुभेच्छा देत असतात. विवाह मुहूर्तावर विवाह संस्कार करणे हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असतो.

विवाह संस्कारगृहस्थाश्रम हा सर्व आश्रमधर्मामध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे. गृहस्थाश्रम धर्माचरणाची योग्यता विवाह संस्कारानेच प्राप्त होते. विवाह विधींमध्ये विवाह होम आणि गृहप्रवेशनीय होम हे दोन प्रमुख विधी सूत्रकारांनी सांगितलेले आहेत. विवाह होमामध्ये होम, पाणिग्रहण, लाजाहोम, अग्निप्रदक्षिणा, अश्मारोहण, सप्तपदी आणि ध्रुवादिदर्शन हे विधी असतात. गृहप्रवेशनीय होमामध्ये गृहप्रवेश, होम, वधूला उपदेश आणि देवता प्रार्थना हे विधी असतात. तसेच पुण्याहवाचन, नांदीश्राद्ध, मंडपदेवता स्थापन, वाग्दान, सीमांतपूजन, ऐरणीपूजन इत्यादी धार्मिक विधीसंस्कारही केले जातात.

कौटुंबिक आनंद सोहळाअनेक लोक विवाहाच्या शुभ मुहूर्ताच्या वेळेला खूप महत्त्व देतात. वैदिक पद्धतीने सर्व विवाहाचा विधी अगोदर करून घेतात आणि मंगलाष्टके म्हणून शुभ मुहूर्तावर वधू-वर एकमेकांना माळा घालतात. शेवटी विवाहकार्यात मुहूर्त वेळेबरोबरच हौस- मौज, कुलाचार यांनाही सध्या विशेष महत्त्व दिले जाते. तो कौटुंबिक आनंद सोहळा असतो. 

-‘काल: शुभक्रियायोगी मुहूर्त: इति कथ्यते ।’ म्हणजे शुभ कर्मांना योग्य असा काल म्हणजे मुहूर्त होय. अशी मुहूर्त शब्दाची व्याख्या ‘विद्यामाध’ या प्राचीन ग्रंथात दिलेली आहे. ऋग्वेदात ‘दिवस सुदिन असताना’, असा उल्लेख आढळतो.- आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंतच्या कालाला चातुर्मास म्हणतात. हे दिवस पावसाळ्याचे शेतीच्या कामांचे असतात. प्रवास करणेही कठीण जात असते. चातुर्मासात विवाह मुहूर्त दिलेले नसतात. तसेच, नियमांप्रमाणे विवाहयोग्य शुभ दिवस आणि शुभ वेळ काढली जाते. -पंचांगे आणि दिनदर्शिकांमधून विवाह मुहूर्त दिलेले असतात. हल्ली काही ग्रंथांचा आधार घेऊन चातुर्मासातही ‘काढीव मुहूर्त’ वेगळे देण्यात येतात. अडीअडचणींच्या वेळी या काढीव मुहूर्तावर विवाह कार्ये केली जातात....आणि शुभ मुहूर्त वेळ चुकते- आधुनिक कालात कधीकधी काही कार्यात विवाह मुहूर्ताची वेळही पाळली जात नाही. हेही खरे आहे. काही कार्यात वधूला मेकअप करायला, सजायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे शुभ मुहूर्ताची वेळ चुकते. -काही कार्यात नवरा मुलगा मिरवणुकीने मंगलकार्यात येत असतो. वऱ्हाडी नाचत येत असल्याने मिरवणुकीला उशीर होतो, मुहूर्ताची वेळ टळून जाते. काही कार्यात अंतरपाट दूर होताच माळ घालण्यापूर्वी उत्साही वऱ्हाडी वधू-वरांना उंच उचलतात. कधीकधी रंगाचा बेरंगही होतो. 

टॅग्स :marriageलग्न