शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

फायद्याच्या सरकारी योजना कोणत्या? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 13:20 IST

Government Schemes: केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी अनेक सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. आपल्या फायद्याच्या योजना नेमक्या कोणत्या ते पाहू...

- चंद्रकांत दडस, उपसंपादककेंद्र सरकारकडून सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी अनेक सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. आपल्या फायद्याच्या योजना नेमक्या कोणत्या ते पाहू...प्रधानमंत्री वय वंदना योजनाप्रधानमंत्री वय वंदना योजना ही ज्येष्ठ गुंतवणूकदारांसाठी आहे. विमा कंपनी एलआयसी आणि केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी ही योजना ६० वर्षे ओलांडलेल्या नागरिकांसाठी आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मासिक पेन्शनची हमी मिळते. या योजनेवर व्याज दरवर्षी ७.४० टक्के निश्चित करण्यात आले आहे. जर पती- पत्नी दोघांनी या योजनेत प्रत्येकी १५ लाख रुपये गुंतवले, तर त्यांना निश्चित व्याजदराने ३० लाख रुपयांवर वर्षाला २ लाख २२ हजार रुपये व्याज मिळेल. या आधारावर दरमहा १८ हजार ५०० रुपयांची मासिक पेन्शन त्यांना मिळेल. योजनेची सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे १० वर्षांनंतर गुंतवणूकदाराला गुंतवणूकीची संपूर्ण रक्कम परत मिळते.प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा भारत सरकारची सामान्य लोकांना जीवन संरक्षण देण्यासाठी ही एक उत्तम योजना आहे. तुम्ही वर्षाला फक्त ४३६ रुपये भरून ही योजना घेऊ शकता. ही योजना विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला २ लाखांपर्यंतची आर्थिक मदत देते. ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय चाचणी घेण्याची आवश्यकता नाही. पॉलिसीच्या संमतीपत्रात काही विशेष आजार असल्यास उल्लेख करावा लागेल. या पॉलिसीचे दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. पॉलिसी खरेदी करण्याचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ५५ वर्षे निश्चित केले आहे. जर तुम्ही ही पॉलिसी घेण्याचे ठरवले असेल, तर तुमचे बँक खाते असणे आवश्यक आहे. तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले असावे.अटल पेन्शन योजनाअटल पेन्शन योजना ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी असंघटित क्षेत्रातील कामगारांचे भविष्य सुरक्षित करते. या योजनेंतर्गत, वयाच्या ६० वर्षांनंतर, सदस्याला महिन्याला १ हजार ते ५ हजार रुपये पेन्शन दिली जाते. पेन्शनची रक्कम या योजनेत जमा केलेल्या रकमेवर अवलंबून असते. सदस्याचा मृत्यू झाल्यास, योजनेतील नॉमिनी असलेली व्यक्ती जमा केलेल्या रकमेवर किंवा पेन्शनच्या रकमेवर दावा करण्यास पात्र आहे.

टॅग्स :MONEYपैसा