शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

हेल्मेट सक्तीचं करायचं काय? एका शहराला एक न्याय आणि दुसऱ्या शहराला दुसरा न्याय!

By नितीन जगताप | Updated: June 12, 2022 06:04 IST

गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी मुंबईत दुचाकी चालविणाऱ्या व्यक्तीसोबतच आता मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेटची सक्ती केली आहे. हेल्मेट सक्तीचा विषय निघाला

नितीन जगताप, प्रतिनिधी, मुंबई

गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी मुंबईत दुचाकी चालविणाऱ्या व्यक्तीसोबतच आता मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेटची सक्ती केली आहे. हेल्मेट सक्तीचा विषय निघाला की, राज्यातील विविध शहरांत त्याचे वेगवेगळे सूर ऐकायला येतात. पुण्यासारख्या शहरात तर हेल्मेट सक्ती लोकांनी झुगारून दिलेली आहे. कायदा जर सर्वांसाठी समान आहे, तर एका शहराला एक न्याय आणि दुसऱ्या शहराला दुसरा न्याय, हे कसे चालेल?  हेल्मेटला विरोध करून नेमके आपण काय साधतो, आपल्या सुरक्षेपेक्षा आपला हेल्मेटविरोध मोठा आहे का? 

कोरोनामुळे मानवी आयुष्य फार झपाट्याने बदलले आहे. प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र बदल दिसून येत आहेत. लोकांच्या आरोग्यविषयक सवयी बदललेल्या आहेत. सतत २० सेकंद साबणाने हात धुणे, हाताच्या बोटांचा डोळ्याला/तोंडाला स्पर्श होऊ न देणे, घसा कोरडा राहणार नाही, याची काळजी घेणे. विशेष म्हणजे, व्यक्ती बाहेर जात असेल तर मास्कचा नियमित वापर करणे. लोकांनी मास्क वापरणे किती कमी कालावधीत स्वीकारले आहे. मग हेच हेल्मेटच्या बाबतीत दुचाकीस्वारांकडून का होत नाही? ‘मास्क घालू नका, न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडा’, असे कोणी म्हणत आहेत का? एकट्या पुण्यात मागील १५ वर्षांत किमान ८-१० वेळा हेल्मेट सक्तीची कारवाई झाली; पण लोकांनी ती हाणून पाडली. 

२०१८ मध्ये हेल्मेट न घातल्यामुळे दुचाकीस्वारांनी गमावला जीव ४३,६१४ - भारत५,२५२ - महाराष्ट्र  

जर त्यांनी हेल्मेट घातले असते, तर त्यापैकी ४०% लोकांचा जीव नक्कीच वाचला असता. तरुणांचे सर्वाधिक बळी मुंबई वाहतूक पोलिसांच्या २०२०च्या आकडेवारीनुसार दुचाकी अपघातात तरुणांचा सर्वाधिक बळी गेला आहे. एकूण अपघाती मृत्यूंपैकी २० ते ३४ या वयोगटातील तरुणांचे प्रमाण ५७ टक्के आहे. हे मृत्यू टाळण्यासाठी वाहतूक नियमांच्या अंमलबजावणी सोबतच जनजागृतीची गरज आहे. 

मुंबईत सर्वाधिक अपघाती मृत्यूमुंबईत २०१५ ते २०२० या पाच वर्षांत १६६ दुचाकीस्वारांनी जीव गमावला. त्यानंतर १४८ पादचारी, २२ वाहनचालक, ६ सायकलस्वारांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आपण मास्क घालायला लागलो; पण ज्या देशात १.५ लाख लोक रस्ते अपघातामुळे मरण पावतात, त्या देशात लोक हेल्मेट कधी घालणार. - संदीप गायकवाड, वाहतूक अभ्यासक, परिसर संस्था 

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र