शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट सक्तीचं करायचं काय? एका शहराला एक न्याय आणि दुसऱ्या शहराला दुसरा न्याय!

By नितीन जगताप | Updated: June 12, 2022 06:04 IST

गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी मुंबईत दुचाकी चालविणाऱ्या व्यक्तीसोबतच आता मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेटची सक्ती केली आहे. हेल्मेट सक्तीचा विषय निघाला

नितीन जगताप, प्रतिनिधी, मुंबई

गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी मुंबईत दुचाकी चालविणाऱ्या व्यक्तीसोबतच आता मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेटची सक्ती केली आहे. हेल्मेट सक्तीचा विषय निघाला की, राज्यातील विविध शहरांत त्याचे वेगवेगळे सूर ऐकायला येतात. पुण्यासारख्या शहरात तर हेल्मेट सक्ती लोकांनी झुगारून दिलेली आहे. कायदा जर सर्वांसाठी समान आहे, तर एका शहराला एक न्याय आणि दुसऱ्या शहराला दुसरा न्याय, हे कसे चालेल?  हेल्मेटला विरोध करून नेमके आपण काय साधतो, आपल्या सुरक्षेपेक्षा आपला हेल्मेटविरोध मोठा आहे का? 

कोरोनामुळे मानवी आयुष्य फार झपाट्याने बदलले आहे. प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र बदल दिसून येत आहेत. लोकांच्या आरोग्यविषयक सवयी बदललेल्या आहेत. सतत २० सेकंद साबणाने हात धुणे, हाताच्या बोटांचा डोळ्याला/तोंडाला स्पर्श होऊ न देणे, घसा कोरडा राहणार नाही, याची काळजी घेणे. विशेष म्हणजे, व्यक्ती बाहेर जात असेल तर मास्कचा नियमित वापर करणे. लोकांनी मास्क वापरणे किती कमी कालावधीत स्वीकारले आहे. मग हेच हेल्मेटच्या बाबतीत दुचाकीस्वारांकडून का होत नाही? ‘मास्क घालू नका, न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडा’, असे कोणी म्हणत आहेत का? एकट्या पुण्यात मागील १५ वर्षांत किमान ८-१० वेळा हेल्मेट सक्तीची कारवाई झाली; पण लोकांनी ती हाणून पाडली. 

२०१८ मध्ये हेल्मेट न घातल्यामुळे दुचाकीस्वारांनी गमावला जीव ४३,६१४ - भारत५,२५२ - महाराष्ट्र  

जर त्यांनी हेल्मेट घातले असते, तर त्यापैकी ४०% लोकांचा जीव नक्कीच वाचला असता. तरुणांचे सर्वाधिक बळी मुंबई वाहतूक पोलिसांच्या २०२०च्या आकडेवारीनुसार दुचाकी अपघातात तरुणांचा सर्वाधिक बळी गेला आहे. एकूण अपघाती मृत्यूंपैकी २० ते ३४ या वयोगटातील तरुणांचे प्रमाण ५७ टक्के आहे. हे मृत्यू टाळण्यासाठी वाहतूक नियमांच्या अंमलबजावणी सोबतच जनजागृतीची गरज आहे. 

मुंबईत सर्वाधिक अपघाती मृत्यूमुंबईत २०१५ ते २०२० या पाच वर्षांत १६६ दुचाकीस्वारांनी जीव गमावला. त्यानंतर १४८ पादचारी, २२ वाहनचालक, ६ सायकलस्वारांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आपण मास्क घालायला लागलो; पण ज्या देशात १.५ लाख लोक रस्ते अपघातामुळे मरण पावतात, त्या देशात लोक हेल्मेट कधी घालणार. - संदीप गायकवाड, वाहतूक अभ्यासक, परिसर संस्था 

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र