शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

बळी शासकीय बेपर्वाईचे

By admin | Updated: June 22, 2014 13:48 IST

पोलीस भरतीची प्रक्रिया चालू असताना ५ युवकांचा बळी जावा, ही अत्यंत शरमेची आणि धक्कादायक गोष्ट आहे. मुळात भरतीसाठी युवकांना ५ किलोमीटर धावायला लावण्याची कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून निघाली, ते तपासून पाहायला हवे.

भीष्मराज बाम

 
पोलीस भरतीची प्रक्रिया चालू असताना ५ युवकांचा बळी जावा, ही अत्यंत शरमेची आणि धक्कादायक गोष्ट आहे. मुळात भरतीसाठी युवकांना ५ किलोमीटर धावायला लावण्याची कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून निघाली, ते तपासून पाहायला हवे. मी नाशिकमध्ये राहतो. इथे देवळालीत शिपायांसाठी सैन्य भरती होते, तिच्यामध्येसुद्धा फक्त १६00 मीटर म्हणजे १.६ किलोमीटर धावावे लागते. आपली शासकीय खाती मुळीच विचार न करता परदेशी वापरले जाणारे निकष आपल्याकडे लावून टाकतात. युवा वर्गाचा आरोग्याचा निर्देशांक कसा वाढेल याची गेल्या ५0/६0 वर्षांत कोणीही काहीही चिंता केलेली नाही. योगाकडे संपूर्ण दुर्लक्ष! खेळांचा विकास तर सोडाच; पण खेळाडूंना खेळणे, सराव करणे, स्पर्धेतील भाग अवघड करण्याकडेच कल जास्त. जीवघेण्या महागाईमुळे सकस आहारही उपलब्ध नाही. अशा स्थितीत युवकांची तंदुरुस्ती राहणे कसे शक्य आहे? मग पोलीस भरतीसाठी लावलेले निकष इतके अवघड करण्याची काय गरज?
पोलिसांकडे परेड करायलाच पुरेशी मैदाने नाहीत; तिथे धावण्याचे ट्रॅक कोठून असणार? मग भरतीसाठी धावण्याच्या चाचण्या रस्त्यावरच घेतल्या गेल्या. रस्त्यांची हालत नेहमीसारखीच खराब आणि पायात घालायला अनेकांजवळ बूटसुद्धा नाहीत. मग त्यांनी तसेच धावायचे. पहाटे चार वाजता आलेले लोक आठ-दहा तास ताटकळत बसलेले. त्यांना प्यायला पाणी नाही की संडास/लघवीची सोय नाही. खाण्या- पिण्याचा तर प्रश्नच नाही. उन्हात उघड्यावर बसून राहायचे, आणि मग नाव पुकारले गेले, की स्पर्धा सुरू होण्याच्या रेषेवर जाऊन उभे राहायचे. इतके लांबचे अंतर धावायचे असतानासुद्धा वॉर्मअप वगैरे काही न करता सरळ धावायला सुरुवात. चांगले तयार असलेले खेळाडूसुद्धा पार आडवे होतील. मग बिचार्‍या भरतीसाठी आलेल्या पोरांची वाट लागली तर त्यात काय नवल?
मुंबईच्या एरवीच्या साध्या उकाड्यात, न धावणार्‍यांच्यासुद्धा घामाच्या धारा वाहून डिहायड्रेशन होत असेल. मग आता मॉन्सूनपूर्वीच्या जबरदस्त वाढलेल्या तापमानात भर उन्हात धावावे लागले तर त्यांची काय अवस्था झाली असेल? प्रतिकूल हवामानाशी जुळवून घ्यायला आपल्या शरीरयंत्रणेला बराच वेळ लागतो. आपण या हवामानातून हिमालयात गेलो तर प्रत्येक टप्प्यावर त्या-त्या हवामानाची सवय होईपयर्ंत विश्रांती घ्यायला लावतात. इथे बरोबर उलट परिस्थिती होती. पाणीसुद्धा न देता उन्हातान्हातून या पोरांना धावायला लावण्याचा काय उद्देश असावा? जगले वाचले तर मायबाप सरकार जी नोकरी देणार, ती याच प्रकारच्या छळणुकीची असेल हे त्यांना जाणवून द्यावे, असा विचार होता काय? आता ५ बळी गेल्यावर पुढल्या भरती प्रक्रिया या हिवाळ्यात घेतल्या जातील, असे जाहीर करणे म्हणजे त्या बळींच्या नातेवाइकांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे.
हवामानातले बदल सहन करता येण्यासाठी शरीर प्रकृती उत्तम असायला हवी. जे दुबळे असतील ते असे बदल सहन करू शकत नाहीत. म्हणून तर दर वेळी थंडीची किवा उष्माघाताची लाट आली तर त्यात अनेक बळी जातात. पण ते बहुतेक सगळे रुग्ण किंवा म्हातारेकोतारे असतात. हे बळी युवकांचे होते, आणि भरती वेळच्या वेळी झाली असती तर इतक्या घाईत मोठय़ा प्रमाणावर करावी लागली नसती. राज्यात सगळीकडे मॅराथॉन धावण्याच्या स्पर्धा होतात. त्या वेळी जागोजागी पिण्याच्या पाण्याची आणि वैद्यकीय पथकाची व्यवस्था असते, तशी या भरतीच्या वेळी का केली गेली नाही?
या पाच बळींमुळे होणार्‍या जनक्षोभाला घाबरून शासनाने ५ किलोमीटरऐवजी ३ किलोमीटरची चाचणी जाहीर केली आहे; पण ती पुढल्या भरतीपासून. जर या घेतल्या जात असणार्‍या चाचणीला काही शास्त्रीय पाया असेल, तर हा बदल का करण्यात येत आहे? आणि जर अंतर कमी करायचेच असले तर १६00 मीटर का नाही? आणि हिवाळ्यात भरती घेण्याचा निर्णयसुद्धा असाच घाईघाईने घेण्यात येत आहे. म्हणजे चौकशी होण्यापूर्वीच शासनाने आपण या भरतीमध्ये अक्षम्य अशा चुका केल्याचे कबूलच करून टाकल्याचे दिसते. पोलिसांची संख्या वाढवत जाऊन त्यांना कामच करू न देण्याची सध्याची पद्धत अवलंबिली जात राहिली तर समाजाला या पोलिसांचा फारसा उपयोग होणार नाही. समाज आणि पोलीस यांच्यातली दरी वाढतेच आहे आणि त्याचीही जबाबदारी संपूर्णपणे शासनाचीच आहे. 
(लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)