शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

बावीस राजभाषांचे इतिहास लेखन- साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:25 IST

भाषा, लिपीकडे लक्ष न दिल्याने अथवा त्यांचा वापर न केल्याने देशातील २०० भाषा मरून गेल्याचे एका अभ्यासातून पुढे आले आहे. भाषा, लिपी व साहित्याच्या समृद्धीकडे आपण लक्ष दिले नाही तर भारतीय भाषा व साहित्याची ओळख राहणार नाही, हा धोका ओळखून डॉ. लवटे यांनी बावीस राजभाषांचा इतिहास लेखनाचे शिवधनुष्य उचलले आहे....

ठळक मुद्दे तेथील लोकांना, स्थानिक साहित्य-संस्थाना, भाषेच्या अभ्यासकांना ते भेटणार आहेत. ही एका अर्थाने भाषिक आणीबाणीकडे आपली वाटचाल सुरू असल्याचे डॉ. लवटे यांचे म्हणणे आहे.

भाषा, लिपीकडे लक्ष न दिल्याने अथवा त्यांचा वापर न केल्याने देशातील २०० भाषा मरून गेल्याचे एका अभ्यासातून पुढे आले आहे. भाषा, लिपी व साहित्याच्या समृद्धीकडे आपण लक्ष दिले नाही तर भारतीय भाषा व साहित्याची ओळख राहणार नाही, हा धोका ओळखून डॉ. लवटे यांनी बावीस राजभाषांचा इतिहास लेखनाचे शिवधनुष्य उचलले आहे....

भारतातील २२ राजभाषांच्या गेल्या ५० वर्षांतील इतिहासलेखनाचे काम येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी हाती घेतले आहे. भाषा, साहित्य व लिपी यांची त्या-त्या भाषांतील सद्य:स्थिती काय आहे व ती समृद्ध करण्यासाठी काय करायला हवे, अशा व्यापक परिघामध्ये हे इतिहासलेखनाचे काम होणार आहे. खरे तर ते इतिहासलेखन कमी आणि वास्तव लेखनच जास्त असणार आहे. म्हणजेच या २२ भाषांची सद्य:स्थिती काय आहे, हेच या अभ्यासातून पुढे येणार आहे.

डॉ. लवटे हे हिंदी साहित्यिक असल्याने ते हे सगळे लेखन हिंदीत करणार आहेत. दिल्लीच्या राजकमल प्रकाशन समूहाने त्याच्या प्रकाशनाचीही जबाबदारी घेतली आहे. साधारणपणे भाषा, साहित्य व लिपी यांचा प्रत्येकी सातशे पानांचा एक ग्रंथ होईल, एवढे लेखन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी डॉ. लवटे यांनी सारा देश पालथा घालायला सुरुवात केली आहे. तेथील लोकांना, स्थानिक साहित्य-संस्थाना, भाषेच्या अभ्यासकांना ते भेटणार आहेत.

भाषा, लिपी व साहित्यातील स्थित्यंतरे मांडताना त्यांचे समाजजीवनावरील परिणाम मांडणे हाच या लेखनाचा मुख्य हेतू आहे. हिंदी खंडाचे काम २०२० पर्यंत पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यात २०२२ पूर्वी मराठी व इंग्रजीमध्ये त्यांचे भाषांतर करण्यात येणार आहे.

डॉ. गणेश देवी यांनी लोकभाषा सर्व्हेक्षण करून त्या आधारे भारतात भाषा, साहित्य व लिपी यांचा अभ्यास केला. त्याचे ५० खंड लिहिले. भाषा, लिपीकडे लक्ष न दिल्याने अथवा त्यांचा वापर न केल्याने देशातील २०० भाषा मरून गेल्याचे या अभ्यासातून पुढे आले; कारण इंग्रजी शिक्षणाच्या हव्यासापोटी भारतीय भाषांच्या वापराकडे व अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. आताची पिढी घरी मराठीत बोलते, शाळेत इंग्रजी शिकते व बाहेर हिंदी-इंग्रजी मिश्र बोलते. त्यांना कोणत्याच भाषेतील व्याकरण येत नाही. चिन्हांचे अर्थ कळत नाहीत. पूर्णविराम व प्रश्नचिन्ह यांतील अंतर कळत नाही. ही एका अर्थाने भाषिक आणीबाणीकडे आपली वाटचाल सुरू असल्याचे डॉ. लवटे यांचे म्हणणे आहे.

भारतीय भाषा व साहित्याचा अभ्यास करताना त्यांच्या असे लक्षात आले की, भाषा व लिपी टिकायच्या असतील तर त्या बोलल्या पाहिजेत, लिहिल्या पाहिजेत व वाचल्या पाहिजेत; परंतु नेमक्या या तिन्ही कसोट्यांवर भाषांचे मरण सुरू आहे. माणसाच्या जगण्याला मूल्यांची जोड हवी असेल तर मूल्यशिक्षण देणाऱ्या साहित्याची गरज आहे. परंतु आज तो साहित्याचा व्यवहारच राहिलेला नाही. साहित्य अकादमी व नॅशनल बुक ट्रस्टमार्फत भाषा संवर्धनाचे काम चालते; परंतु त्यावरही मर्यादा आहेत.या आहेत २२ राजभाषाआसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, मैथिली, नेपाळी, उडिया, पंजाबी, संथाली, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू.भारतात ८८० भाषा बोलल्या जातात. प्रत्येक जनगणनेत व भाषा सर्वेक्षणात भाषांची संख्या घटताना दिसते. गेल्या ५० वर्षांत भारतातील २२० भाषा लुप्त झाल्या आहेत. भारतात आज १० लाखांपेक्षा अधिक लोक बोलतात, अशा भाषांची संख्या २९ आहे. राज्यघटनेने आठव्या परिशिष्टात २२ भाषांना ‘राजभाषा’ म्हणून मान्यता दिली आहे.

टॅग्स :Article 35 Aकलम 35-एhistoryइतिहास