शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

विचारसूत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 06:05 IST

विचारांची ही सूत्रं आपल्या  जगण्याला बळ, विचारांना प्रेरणा देतील.  निराशेत आशेची ज्योत,  तर अंधारात प्रकाश दाखवतील.

ठळक मुद्दे‘गंध अंतरीक्षाचा’, ‘स्मितलहरी’, ‘लॉकडाऊनच्या वेळेत’, ‘पुष्पांजली परमेशाला’ अशा चार भागांत विभागलेली ही विचारसूत्रे खूपच वाचनीय आहेत.

डॉ. आशुतोष रारावीकर हे एक नामांकित अर्थतज्ज्ञ. रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियात ते संचालकपदावर कार्यरत आहेत. आर्थिक विषयांवर त्यांनी उदंड लेखन केले आहे. त्याबद्दल त्यांना बरेच पुरस्कारही मिळाले आहेत. नुकतेच त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तकही आर्थिक विषयांवरच असेल, असे आपल्याला वाटेल; पण एका अतिशय वेगळ्या विषयावर त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. रारावीकर यांना योगाभ्यास, अध्यात्म, साहित्य, संस्कृत, पर्यटन, आणि संगीत यात विशेष रुची आणि गती आहे. डॉ. रारावीकर आपल्या मनोगतात सांगतात, ‘माझे वडील प्रा. डॉ. यशवंत रारावीकर हे ख्यातनाम अर्थतज्ञ होते. ते सात्विकतेची आणि करुणेची मूर्तिमंत प्रतिमा होते. माझी आई प्रा. डॉ. सौ. अरुणा रारावीकर ही एक अध्यात्ममूर्ती संस्कृततज्ञ आणि साहित्यिक होती. अर्थशास्त्र हा माझा श्वास आहे, तर अध्यात्म हा माझा प्राण आहे. इतकी वर्षे मी वडिलांची म्हणजे अर्थशास्त्राची भाषा बोललो. या पुस्तकातून मी आता आईची भाषा बोलतो आहे.’त्यांच्या वडिलांचं नाव यशवंत आणि आईचं माहेरचं नाव पुष्पा. म्हणून या पुस्तकाचं नाव ‘यशपुष्प’. डॉ. रारावीकर यांना शेजारीच राहणार्‍या कुसुमाग्रजांचा प्रदीर्घ सहवास लाभला होता. त्याचबरोबर दोन अध्यात्मिक भाग्यगुरू नारायणकाका ढेकणे महाराज आणि योगगुरू डॉ. एच. आर. नागेंद्रजी तसेच विष्णुमहाराज पारनेरकर यांच्या इश्वरी छायेत त्यांचा अध्यात्माचा प्रवास सुरू झाला.आजवरच्या आयुष्यात डॉ. आशुतोष रारावीकर यांनी ज्या जीवनसूत्रांचा अवलंब केला, विचारांची, जीवनाची जी सूत्रं त्यांना सापडली, ती शब्दरूपात, सुविचारांच्या रूपात त्यांनी गुंफली आहेत. वाचकांसाठी ती प्रेरणादायी आहेत. विचारांची ही सूत्रं आपल्या जगण्याला बळ, विचारांना प्रेरणा देतील. निराशेत आशेची ज्योत, तर अंधारात प्रकाश दाखवतील. भक्ती, शक्ती आणि युक्तीचा संगम या विचारपुष्पांत झाला आहे. एकाच वेळी हे विचार आपले डोळे खाडकन उघडून वास्तवाची वाट दाखवतात, तर लगेच अध्यात्माचाही मार्ग दाखवतात. आपलं बोट धरून वाट दाखवताना आपोआपच चिंतन, आत्मपरीक्षण ते करायला लावतात.‘नैराश्यानं भरलेली प्रत्येक रात्र सूर्याचा लख्ख प्रकाश घेऊन येते आणि एका सोनेरी पहाटेला जन्म देते हे चिरंतन सत्य आहे.’ तसेच ‘काळजी ही घेण्याची गोष्ट आहे, करण्याची नाही’, ‘डोळे उघडे ठेवले तर आपल्याला सगळं ‘ऐकू’ येतं’. ही सूत्रं आपल्याला विचार करायला लावतात, तर ‘विवाह हे एक महाकाव्य आहे. सुरुवातीला रामायण, नंतर महाभारत!’, ‘जिथे बसायला जागा नाही, तिथे झोपायच्या गोष्टी करू नये’ - असं जीवनाचं तत्त्वज्ञानही ते सहज सांगून जातात. ‘हे गुपित कोणाला सांगू नकोस, कारण ते सगळ्यांना माहीत आहे’, ‘तो रिव्हर्स गिअर टाकतो आणि तरीही गाडी पुढे का जात नाही याचा विचार करत बसतो’, अशा प्रकारची सूत्रं सहजपणे आपली फिरकीही घेतात. निद्रावस्थेत जागृतीची अनुभूती असणं हाच चैतन्याचा साक्षात्कार’, असा उजेडाचा साक्षात्कारही ते आपल्याला घडवतात. ‘गंध अंतरीक्षाचा’, ‘स्मितलहरी’, ‘लॉकडाऊनच्या वेळेत’, ‘पुष्पांजली परमेशाला’ अशा चार भागांत विभागलेली ही विचारसूत्रे खूपच वाचनीय आहेत.यशपुष्प : डॉ. आशुतोष रारावीकरई-पुस्तक आवृत्ती, पाने : 260ई-पुस्तक संरचना : शैलेश खडतरेप्रकाशक : ईबु पब्लिकेशन्स