शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Term insurance: लग्न झाले नसेल तरीही टर्म इन्शुरन्स आवश्यकच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 09:52 IST

Term insurance: टर्म इन्शुरन्स फक्त विवाहित लोकांसाठीच आहे, असे बहुतेक लोकांना वाटते. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात हे खरे असले तरीही अविवाहित असतानाही टर्म इन्शुरन्स घेण्याची अनेक कारणे आहेत. अविवाहितांनी टर्म इन्शुरन्स का घ्यावा, याची महत्त्वाची कारणे जाणून घेऊ...

- चंद्रकांत दडस, उपसंपादक

टर्म इन्शुरन्स फक्त विवाहित लोकांसाठीच आहे, असे बहुतेक लोकांना वाटते. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात हे खरे असले तरीही अविवाहित असतानाही टर्म इन्शुरन्स घेण्याची अनेक कारणे आहेत. अविवाहितांनी टर्म इन्शुरन्स का घ्यावा, याची महत्त्वाची कारणे जाणून घेऊ...

तुमच्या कुटुंबाची काळजी कोण घेणार?तुम्ही अविवाहित असला तरीही तुमचेही एक कुटुंब असते, जे तुमच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहे. विचार करा, तुम्हाला मुले आहेत. तुमचे पालक निवृत्त होणार आहेत किंवा तुमच्या उत्पन्नावर लहान भावंडे अवलंबून आहेत. जर अशा वेळी तुमचा अपघात झाला आणि तुम्ही हे जग सोडून गेलात तर तुमच्या कुटुंबाची काळजी कोण घेणार?

...म्हणून टर्म इन्शुरन्स खरेदी करातुमच्यामागे कुटुंबाला कोणत्या आर्थिक त्रासातून जावे लागेल ते तुम्ही समजू शकता? तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही आर्थिक अडचणीतून जावे लागू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही टर्म इन्शुरन्स खरेदी करणे आवश्यक आहे. तो तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देईल.

कुटुंबाला तणावपूर्ण परिस्थितीपासून वाचवेलतुम्ही लहान भावंडांसाठी गृहकर्ज किंवा शैक्षणिक कर्ज घेतले असेल तर तुमच्या निधनानंतर त्याचा संपूर्ण भार तुमच्या कुटुंबीयांवर पडेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी तणाव आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो. टर्म इन्शुरन्स तुमच्या कुटुंबाला अशा तणावपूर्ण परिस्थितीपासून वाचवेल.

पालक होण्यासोबतच जबाबदाऱ्याही वाढतातपालक या नात्याने, तुमच्या मुलांचे भविष्य चांगले व्हावे आणि त्यांना उत्तम शिक्षण मिळावे अशी तुमची इच्छा नक्की असेल. तुम्हाला तुमच्या मुलांची सर्व स्वप्ने पूर्ण करावीशी वाटत असतील. या स्वप्नांमध्ये चांगले शिक्षण आणि प्रशिक्षणही समाविष्ट असेल. या प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या मुलांसोबत असालच असे नाही. त्यामुळे टर्म इन्शुरन्स घ्या.

टॅग्स :Investmentगुंतवणूक