शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

Term insurance: लग्न झाले नसेल तरीही टर्म इन्शुरन्स आवश्यकच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 09:52 IST

Term insurance: टर्म इन्शुरन्स फक्त विवाहित लोकांसाठीच आहे, असे बहुतेक लोकांना वाटते. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात हे खरे असले तरीही अविवाहित असतानाही टर्म इन्शुरन्स घेण्याची अनेक कारणे आहेत. अविवाहितांनी टर्म इन्शुरन्स का घ्यावा, याची महत्त्वाची कारणे जाणून घेऊ...

- चंद्रकांत दडस, उपसंपादक

टर्म इन्शुरन्स फक्त विवाहित लोकांसाठीच आहे, असे बहुतेक लोकांना वाटते. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात हे खरे असले तरीही अविवाहित असतानाही टर्म इन्शुरन्स घेण्याची अनेक कारणे आहेत. अविवाहितांनी टर्म इन्शुरन्स का घ्यावा, याची महत्त्वाची कारणे जाणून घेऊ...

तुमच्या कुटुंबाची काळजी कोण घेणार?तुम्ही अविवाहित असला तरीही तुमचेही एक कुटुंब असते, जे तुमच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहे. विचार करा, तुम्हाला मुले आहेत. तुमचे पालक निवृत्त होणार आहेत किंवा तुमच्या उत्पन्नावर लहान भावंडे अवलंबून आहेत. जर अशा वेळी तुमचा अपघात झाला आणि तुम्ही हे जग सोडून गेलात तर तुमच्या कुटुंबाची काळजी कोण घेणार?

...म्हणून टर्म इन्शुरन्स खरेदी करातुमच्यामागे कुटुंबाला कोणत्या आर्थिक त्रासातून जावे लागेल ते तुम्ही समजू शकता? तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही आर्थिक अडचणीतून जावे लागू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही टर्म इन्शुरन्स खरेदी करणे आवश्यक आहे. तो तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देईल.

कुटुंबाला तणावपूर्ण परिस्थितीपासून वाचवेलतुम्ही लहान भावंडांसाठी गृहकर्ज किंवा शैक्षणिक कर्ज घेतले असेल तर तुमच्या निधनानंतर त्याचा संपूर्ण भार तुमच्या कुटुंबीयांवर पडेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी तणाव आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो. टर्म इन्शुरन्स तुमच्या कुटुंबाला अशा तणावपूर्ण परिस्थितीपासून वाचवेल.

पालक होण्यासोबतच जबाबदाऱ्याही वाढतातपालक या नात्याने, तुमच्या मुलांचे भविष्य चांगले व्हावे आणि त्यांना उत्तम शिक्षण मिळावे अशी तुमची इच्छा नक्की असेल. तुम्हाला तुमच्या मुलांची सर्व स्वप्ने पूर्ण करावीशी वाटत असतील. या स्वप्नांमध्ये चांगले शिक्षण आणि प्रशिक्षणही समाविष्ट असेल. या प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या मुलांसोबत असालच असे नाही. त्यामुळे टर्म इन्शुरन्स घ्या.

टॅग्स :Investmentगुंतवणूक