शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

असा पाऊस गाताना...

By admin | Updated: June 14, 2014 20:10 IST

आभाळ गच्च होतं... दिवसाउजेडी काळोख दाटून येतो... वारा थांबतो, हवेतला उष्मा वाढतो... आणि मग एक टपोरा थेंब येतो... त्याच्या पाठोपाठ दुसरा येतो... मग तिसरा... मृद्गंध सुटतो... सुरू होतं पावसाचं गाणं...

 ना. धों. महानोर

मी शेतकरी आहे. मला विचारलं, तुमचा सगळ्यात आनंददायी दिवस कुठला? तर मी सांगेन ‘आभाळ भरून आलेलं, ढगांचे ढोल वाजताहेत, विजेचं तांडवनृत्य आभाळभर आहे आणि मृग नक्षत्रात पाऊस पडतोय.’ 
चौफेर आभाळभर पाऊस.. शिवारभर. सर्वत्र पावसाच्या धारा.. आभाळभर चिवचिव. चोचीनं गीत गाऊन स्वागत करणारे, अनेक रंगांचे घिरट्या घालणारे पक्षी, व्याकूळ तृष्णेने मरगळलेली झाडवेली, न्हाऊन धुवून तजेलदार झालेली, तेही झुलतं हिरवं गाणं गाणारी आणि सर्वत्र दूरदूरवर अवघ्या सृष्टीला तजेलदार करणारा, दु:ख झटकून टाकणारा मृद्गंध. पहिल्या पावसानंतरचा नांगराचा भुईचा मृद्गंध वर्षातून फक्त एकदाच सृष्टीला उभारी देणारा. 
पक्ष्यांचे लक्ष थवे। 
गगनाला पंख नवे। 
वार्‍यावर गंधभार। 
भरलेले ओचे झाडातून 
लदबदले बहर कांचनाचे। 
घन वाजत गाजत 
ये थेंब अमृताचे. 
अशा ओळी विश्‍वाच्या साक्षात्काराच्या या क्षणी ओठांवर येतात. कोणीही कितीही बलवंत मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो. पाऊस वेळेवर नसला, घनगंभीर पाण्यापावसानं नदीनाले, शेतं, धरणं यांना नवं चैतन्य देणारा, भक्कम नसला, तर त्याचा कार्यभाग शून्यावरच राहील. शेतीवाडी-पिकं-झाडं-वनश्री-धरण-पाटबंधारे यातून दर वर्षी निर्माण होणारं नवं चैतन्य, विश्‍वाच्या अन्नाचा घास व जीवन संपूर्ण उभं करणारा फक्त एकच ईश्‍वर... पाऊस! स्वाती नक्षत्रांना वेढा घालून मृगापासून, तर उत्तरा, पूर्वा नक्षत्रांनंतरही रिमझिम बरसणारा, मदमस्त बरसणारा पाऊस हवा. शेतकरीच नव्हे, तर सगळीच, लहान-मोठा-खेड्यांचा-शहरांचा-पशुपक्षी चराचर यांचा, देशाचा, समृद्ध अर्थव्यवहार उभं राहाणं, पाऊस नसला तर मोडू शकतं आणि चार महिने छान बरसला, तर संपूर्ण जोडूही शकतं. म्हणूनच तर शब्द येतात-
‘बरस रे राजा रोज बरस स्वातीला
बरस स्वातीला भेटे आभाळ मातीला.
पाऊस छान पडला. बाईनं आंघोळ करून नवं नेसून धान्याची ओटी भरली. घुंगरांचा साज चढवून बैलांना कुंकवाचा टिळा लावून तिफणीवर धनधान्य पेरलं जातं. हा नव्या साक्षात्काराचा, सृजनाचा क्षण. शेतकर्‍याची, खेड्यांची आनंदयात्रा, जगाच्या कल्याणासाठी. तो मोडला, तर देश मोडेल. म्हणून तर सकलांनी पर्जन्यस्तोत्र, प्रार्थना, गाणी कंठ भरून म्हणावी, विश्‍वाकार पावसाची.. 
या नभाने या भुईला दान द्यावे। 
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला। 
जोंधळ्याला चांदणे लखडून यावे.
पावसानंतरचा भुईचा प्रत्येक दाणा-शंभर दाणे देतो, हा केवढा चमत्कार. 
रुजे दाणा दाणा। ज्येष्ठाचा महिना। 
पाखरांचे पंख आम्हा आभार पुरंना। 
ही पावसाची आनंदयात्रा
नवी लवलव कोंबांची 
नवी पालवी झाडांना
चिंब कोकिळेचा स्वर, 
असा पाऊस गाताना
आषाढाला पाणकळा 
सृष्टी लावण्याचा मळा
दु:ख भिर्कावून शब्द येती माहेरपणाला.
वारंवार येणारे दुष्काळ, मोडलेला संसार, गणगोत, लहरीपणानं वर्षभर न येणारा दुष्काळाचा सोबती आणि विक्राळपणानं शेती, घरं, संसार उद्ध्वस्त करणारा, वादळी गारांचा भरडून टाकणारा पाऊस आणि एअर कंडिशन सभागृहात बोलघेवड्या कळवळय़ानं दुष्काळात तोंडाला पाने पुसणारा स्वत:च्या सावलीपुरताच राजकारणी समाज. थेट काळोख्या रस्त्यानं जाणार्‍यांना थोपवू शकत नाही.
मोडला गेला संसार तरी 
मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून 
फक्त लढ म्हणा।
ही शेतकर्‍यांची भावना आहे. आज कोणाच्याही विश्‍वासावर नाही, फक्त एका, फक्त एका पावसाच्या विश्‍वासावर ‘मी येतो, भरभक्कम येतो, तू काळजी करू नकोस. नवे नवे प्रयोग करून तुझ्या कष्टानं हे भरडलेलं विश्‍व नांदू दे. तू नांगर, तिफण हाती घे राजा, मी येतोय.’
बालकवी, बा. भ. बोरकर, ना. घ. देशपांडे, इंदिरा संत, ग्रेस किती शंभर-दोनशेपेक्षा कवींना श्रेष्ठ अशा पावसाची कविता छान लिहिताना, ओठांवर, संगीतावर गाताना, दु:ख विसरून नवं चैतन्य येतं. 
‘सरीवर सरी आल्या गं’पासून, तर ‘नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी, माझं घर चंद्रमौळी - नको नकोरे पावसा.’ ‘जलधारात तारा छेडत आला श्रावण छंदी फंदी, त्याची चढते गीत धुंदी अशी रुसून मुकी बसून नको आवरू तुझा आज ओला विस्कटलेला साज,’ ‘हा श्रावण गळतो दूर नदीला पूर तरूवर पक्षी’ ‘आला आषाढ श्रावण आला, पावसाच्या सरी किती चातक चोचीनं प्यावा वर्षाऋतू तरी’.
‘मेघदूता’पासून मराठी कवितेला पाऊस- पावसाच्या कवितेनं अधिक समृद्ध केलं. ती पुन्हा पुन्हा वाचावी... गावी अन् दु:ख हलकं करून टाकावं. रानात, पावसात तिला घट्ट बिलगून थरथरताना जवळ घेताना छत्रीतल्या, पावसातल्या नर्गिस-राज कपूरच्या बिलगण्याची गोड आठवण येते. अशा खूप कवितेतल्या प्रसन्न गोष्टी. केवळ पाऊस त्याच्या रिमझिम.. भक्कम बरसण्यामुळे असा पाऊस भल्ता चावट धसमुसळा, लुब्रा, स्त्री-पुरुषांच्या मिलनाला- भुई आकाशाच्या एकसंघ मिठीला गहिरेपण देऊन जगणं चैतन्यमयी करणारा. देशाचा खरा उद्धारकर्ता - कर्ता करविता- फक्त पाऊस.
(लेखक ज्येष्ठ कवी व साहित्यिक आहेत.)