शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

भाषाभ्यास...अनास्था का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 13:03 IST

मध्यंतरी एक चित्रपट आला होता हिचकी, त्यामध्ये हिचकी म्हणजे न आवडणारी न जमणारी एखादी गोष्ट ही प्रतीकात्मक संकल्पना छानच ...

मध्यंतरी एक चित्रपट आला होता हिचकी, त्यामध्ये हिचकी म्हणजे न आवडणारी न जमणारी एखादी गोष्ट ही प्रतीकात्मक संकल्पना छानच रंगविली होती. तसेच खालच्या वगार्तील मुलांना अभ्यासात रस निर्माण करून कसे शिकवता येईल याच्या मनोरंजक क्लृप्त्याही दाखविल्या होत्या. त्यावेळी माझ्या मनात सहजच प्रश्न निर्माण झाला की यामध्ये केवळ गणित आणि विज्ञानच विषयांचा ऊहापोह कसा? बरोबरच आहे ‘जो बिकता है वो दिखाते है’ अहो! प्रत्येकच विद्यार्थी विज्ञान आणि गणितातच पुढे कसे बरे जाऊ शकतो? परवा एका विद्यार्थ्याला घेऊन पालक आले त्यांनी त्याचे शाळेतील घटक चाचणीचे गुण सांगितले तर त्याला भाषा आणि समाजशास्त्र यामध्ये जवळपास ५०% ते ६०% गुण होते पण गणित आणि विज्ञानात मात्र १०% ते २०% एवढेच गुण होते. तो विद्यार्थी शाळेत आणि शिकवणी वगार्ला नियमित जातो. त्याला या दोन्ही विषयात गती असेल तर त्याने अभ्यास केला नाही तरी त्याला १०% गुण मिळायला नको का? पण खरा गंभीर प्रश्न पुढेच आहे तो म्हणजे त्याच्या आईच्या मतानुसार त्याला विज्ञान शाखेतच प्रवेश घ्यायचा आहे. अक्षरश: आपण किती वेड्यासारखे गर्दीच्या मागे फिरणार आहोत. होमी भाभा ही विज्ञानाची प्रतिष्ठित परीक्षा देणाऱ्या विद्याथ्यार्ला रघुनाथ माशेलकर, विजय भटकर कोण आहेत हे ठाऊक नाही. मला तरी वाटते की गणित विज्ञान शिकविणाºया शिक्षकांचे, वाचनाचे पाठ न देणाºया शिक्षकांचे दुर्दैव म्हटले पाहिजे अजून काय? या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची स्थिती कस्तुरी मृगसाराखीच झाली आहे ‘तूज आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी.‘जुलै महिन्यात जरा सगळ्या महाविद्यालयातील प्रवेशाचा विचार केला की कळते अरे दिल्लीचे स्कूल आॅफ इकोनोमिक्स ९८% एवढ्या गुणांवर प्रवेश बंद झाले. अमार्त्य सेनसारखे दिग्गज लोक तिथे शिकले. एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला भाषा खूप छान येतात, त्यांचे वाचन खूप चांगले आहे, त्यांचा भावनिक भाग चांगला आहे. अहो पण नाही ना! ते काहीही असू देत पालकांच्या दृष्टीने त्याच्यासाठी दोनच करिअर या दुनियेत आहे ते म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनिअर .....सॉरी सॉरी इंजिनिअर नाही आयआयटी! जगाच्या पाठीवर तिसरं करिअर नाही, हे केलं नाही तर भविष्य अंधकारमय होऊन जाईल असे त्यांना वाटते. हेच करायचं म्हणता म्हणता त्याचे पाचवी पासून क्लासेस वगैरे सुरु होतात, त्या क्लासला इयत्ता बारावीपर्यंत जात राहतात आणि ‘याचसाठी केला होतं अट्टाहास’ असा तो निकालाचा दिवस जेव्हा उजाडतो तेव्हा कळतं ‘अरे देवा एकच मुलगा झाला का हो सर क्लीअर.....आता काय?’ ....कोणीतरी सांगतात एवढे आठ वर्षे (पाचवी ते बारावी) गेलेच की अजून एक द्यायला काय हरकत आहे करू द्या की रिपीट! पुन्हा ये रे माज्या मागल्या.....आता याचा अजून एक गंभीर परिणाम आपल्याला भोगावा लागतो आहे, आयआयटी आपले काम नाही हे जेव्हा कळतंय तेव्हा आता ती संख्या रोडावते आहे मग चला आता मेडिकल करू कारण त्यामध्ये परिश्रमाने गुण मिळवता येतात म्हणजे हे असंच झालं की या सिनेमाचं तिकीट मिळालं नाही तर दुसरा बघू. शिवाय ते जुनिअर कॉलेजवाले त्यांच्या इथे इलेक्ट्रोनिक्स नाही म्हणून आपल्या मुलांना जनरल घ्यायला सांगतात. अकरावीतल्या विद्यार्थ्यांचे वय काय....त्यांच्या आजूबाजूचे वातावरण काय? सतत मोबाईलमध्ये डोकं खुपसलेला तो मुलगा पीसीएमबीशिवाय मराठी आणि इंग्रजी एवढ्या विषयांचा अभ्यास कसा करेल? त्यावर एक खूप छान स्पष्टीकरण असते ते म्हणजे नीट देणाºयांना फिजिक्समध्ये गणिताची मदत लागते. ठीक आहे! मग त्याला गणित शिकू द्या त्यासाठी गणित घेण्याची गरज काय? बरं मग पीसीएमवाल्यांनी जीवशास्त्र कशासाठी शिकायचं तर मग समजा त्याला जेइइ जमलं नाही तर असो..असा सारा खेळखंडोबा .प्रत्येक मुल हे वेगळ आहे, त्याच्यामध्ये काहीतरी कमी अधिक आहे, हे शिक्षकाला पालकांना एकदा का कळल ना की त्या अधिक काहीतरीला फुंकर घाला आणि मग बघा विस्तव कसा मस्त पेट घेतो ते! त्याला बारावी विज्ञान किंवा नीट आणि जेईई जमलं नाही की मग आपण फर्गुसन महाविद्यालयाचा विचार करतोच की! मग आधीच इंग्रजी साहित्याचा अकरावीपासून अभ्यास त्याला करू द्या. इयत्ता दहावीत एक प्रतिष्ठित परीक्षा आहे. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा किती पालक आणि शिक्षक त्या परीक्षेची तयारी इयत्ता पाचवीपासून आपल्या मुलांकडून करून घेतात. त्याचे प्रमाण फार कमी आहे. त्याची तयारी पाचवीपासून करून घेतली तर शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र क्रांती होईल. काही शिक्षक तर मुलांना हेसुद्धा सांगतात ‘काय कामाची ती भाषा, समाजशास्त्र पासिंग गुण मिळाले तरी ठीक आहे. दहावी नंतर तुम्हाला बहुपर्यायी प्रश्नच येणार आहेत. ‘विद्यार्थी त्याने आळशी होतो. आठवीपासून त्याला दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे लिहिणे कंटाळवाणे वाटते. तो बहुपर्यायी परीक्षेत बर्याचदा अंदाज बांधतो आणि ठोकतो उत्तर. एक शिक्षक म्हणून मी त्यांना मार्क्सवादी बनवतो आहे. विषयावर आंतरिक प्रेम करायला शिकवले पाहिजे.आपण मुलांचा भावनिक मेंदू आपण चालूच दिला नाही.. हे माहित आहे का आपणास? अच्युत गोडबोले आयआयटी झाले पण भाषेच्या कृपेने उत्तम साहित्य लिहिले ना त्यांनी! समाजात डॉक्टर, इंजिनिअर म्हणून नाव कमवायचे आणि समाज शास्त्रच ठाऊक नाही? हे कधी कळणार. भाषा आणि समाजशास्त्र यासारख्या विषयाची आपल्याला हिचकी येत कामा नये. आपल्या पाल्याला, आपल्या विद्यार्थ्यांना ‘विषय कोणताही असू देत, त्यावर आंतरिक प्रेम कर. ज्यात आनंद मिळतो ती शक्ती, तो विषय ओळख’ ही शिकवण देण्याची गरज आहे.आठ समंदर अपना अम्बरखोज ले अब तू अपने दम परफूँक मारके धूल झाड़ लेछोड़ छाड़ के सारे छप्परखोल दे पर रटी रटाई सारीछोडो भी दुनियादारीबाघी तेवर जो तेरे बोलेंगे सब अनारीसबको मनाने की तेरी नहीं जिÞम्मेदारीऊँचे आसमानो पे लिख दे तू हिस्सेदारी!

- सीमा बक्षी

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक