शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

अध्यात्मिक; देशाच्या प्रतिष्ठेसाठी सुसज्ज रहायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 08:00 IST

दोन प्रवृत्तीत युद्ध होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने शिष्टाईची सर्वतोपरी शिकस्त केली. परंतु यश आले नाही. शेवटी युद्ध हाच एक पर्याय ठरला. याचा अर्थ हाच की, सख्खा भाऊ जरी अन्याय करीत असेल तरी त्याचा प्रतिकार आपण केलाच पाहिजे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजसंकलन: बाबा मोहोडमित्रहो! वास्तविक तुम्ही गुरुजनांच्या अत्यंत जवळ आहात. परंतु असे असूनही बरेच वर्षानंतर आपल्या भेटीचा योग आला. आपल्या भेटीने मला आनंद झाला. सध्याचे दिवसच असे आहेत की यावेळी भारतीय माणसाचे मन स्थिर नाही. तो उत्सवात असला तरीही त्याच्या मनात फार मोठी चिंता व्यापून राहिली आहे. सध्या आपल्यावर पाकिस्तानने केलेल्या आक्रमणाला तोंड कसे द्यावे, याच विचाराने प्रत्येक भारतीय माणूस काळजीत पडला आहे.आपला देश एक स्वतंत्र देश आहे. कोणत्याही स्वतंत्र देशाला एक वेगळी प्रतिष्ठा असते. आपल्याही देशाला ती आहे. तिचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. प्रसंगी पडेल ती किंमत देऊनही देशाची प्रतिष्ठा टिकविण्यासाठी आपण सुसज्ज राहिले पाहिजे.आपली परंपरा : आपला देश एक जगावेगळा देश आहे. जगात पुष्कळ देश आहेत. पण ते सारे एकेका धर्माचे आहेत. पण ज्यांत अनेक धर्म, वंश आणि पक्ष आहेत असा भारत हा एकच देश आहे. एखाद्या प्रसन्न बगिचासारखे त्याचे स्वरूप आहे. नीती, न्याय हा आमचा आधार आहे. आम्ही कोणाचाही अन्याय सहन करणार नाही आणि कोणावर आक्रमणही करणार नाही. जर कोणी आमच्याशी प्रेमाने राहत असेल तर तो आमचा मित्र आहे. आम्ही कोणाचाही द्वेष करीत नाही. कोणत्याही धर्माच्या, पक्षाच्या माणसाशी आमचे नाते जुळते. त्याच्यासाठी आम्ही आमचे सर्व काही अर्पण करू शकतो.मित्रहो, ज्या-ज्या वेळी भारत युद्धासाठी उभा राहिला त्या-त्या वेळी भारतामागे धर्माची, पक्षाची व जातीची भावना नव्हती. शिवाजी महाराज हा येथला एक वीरपुरुष. त्याने देशभर युद्ध केले. परंतु ते कोणाही धर्माविरुद्ध, जातीविरुद्ध नव्हते. अन्यायाविरुद्ध ते युद्ध होते. शिवाजीच्या सैन्यात अनेक मुसलमान होते. शिवाजीने अनेक देशद्रोही हिंदूंना नेस्तनाबूद केले होते. आता आता महात्मा गांधींनीही असेच केले. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी जन्मभर इंग्रजांशी लढा दिला परंतु अनेक इंग्रज त्यांचे मित्र राहिले. माझी लढाई इंग्रजांशी नसून इंग्रजी सत्तेशी आहे असे ते म्हणत. याचा अर्थ एवढाच की, भारत कोणालाही गुलाम करू इच्छित नाही आणि तो कोणाचाही गुलाम राहू इच्छित नाही.भारतीय विचार :- भगवान श्रीकृष्णांनी महाभारत निर्माण केले. ते एका कुटुंबातच निर्माण झाले आहे. त्या सर्वांची जात, धर्म आणि वंश एकच आहे. पण त्यांच्यातही घनघोर युद्ध झाले. कारण एकच, एका बाजूला न्याय आणि एका बाजूला अन्याय अशी तिथे स्थिती होती. एकीकडे पांडव पाच गावावर समाधान मानण्यास तयार होते. तर दुसरीकडे कौरव सुईच्या टोकावर राहील एवढी जमीनही देण्यास तयार नव्हते. अशा दोन प्रवृत्तीत युद्ध होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने शिष्टाईची सर्वतोपरी शिकस्त केली. परंतु यश आले नाही. शेवटी युद्ध हाच एक पर्याय ठरला. याचा अर्थ हाच की, सख्खा भाऊ जरी अन्याय करीत असेल तरी त्याचा प्रतिकार आपण केलाच पाहिजे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक