शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

सेवा हाच ध्यास मनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 15:00 IST

सेवाकार्याला नवा परिमाण आणि परिभाषा ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’ आणि त्यांच्या सेवाभावी कार्यकर्त्यांनी दिली आहे.

मिलिंद कुलकर्णीसेवा हाच ध्यास मनीतैसेची कर्म जीवनीवर्णू तयांची कौतुकेपरंपरेचे पाईक होऊनीहे ब्रीद ठेवत कार्य करणाऱ्या जळगावच्या केशवस्मृती प्रतिष्ठान आणि जळगाव जनता सहकारी बँकेनेतर्फे गेल्या ७ वर्षांपासून सेवाकार्य करणाºया व्यक्ती आणि संस्थांचा डॉ.आचार्य ‘अविनाशी सेवा’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. सेवाभावी वृत्तीने कार्य करणाºया सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असलेल्या दोन्ही संस्थांनी सेवाकार्याचे मुकुटमणी असलेल्या डॉ.अविनाश आचार्य यांची स्मृती जपण्यासाठी सुरु केलेला हा पुरस्कार हा खºया अर्थाने सेवाकार्याचा सन्मान आहे. यापूर्वी हा पुरस्कार आरोग्यदूत रामेश्वर नाईक, समतोल फाऊंडेशनचे विजय जाधव, नगरच्या स्रेहालयचे गिरीष कुळकर्णी यांच्यासारख्या समर्पित कार्यकर्त्यांना देण्यात आला. त्यामुळे अल्पावधीत या पुरस्काराची उंची वाढली आहे. या दोन्ही संस्थांचे वैशिष्टय असे की, कोणतेही अर्ज, शिफारसी न मागवता संबंधितांचे कार्य पाहून, खातरजमा करुन पुरस्कारार्र्थींची निवड केली जाते. स्वत:चे २० ते २५ सेवा प्रकल्प सुरु असतानाही पुरस्कारप्राप्त मंडळींच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन, त्यांच्या मार्गदर्शनाने तसा प्रकल्प जळगावात सुरु करण्याचा पायंडा हा प्रशंसनीय आणि अनुकरणीय असाच आहे. ‘समतोल’च्या विजय जाधव यांच्यापासून प्रेरणा घेत जळगावातही रेल्वे स्टेशनवर फिरणाºया मुलांना सुखरुपपणे घरी पोहोचविण्याचा प्रकल्प सुरु झाला. ‘स्नेहालय’ची प्रेरणा घेत मतिमंद मुलांसाठी ‘आश्रय’ नावाचे केंद्र सुरु केले. ‘आनंदाश्रम’ नावाच्या केंद्रात घरातील अडचणींमुळे वृध्दांना काही काळ याठिकाणी ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. सुमारे १००-१२५ ज्येष्ठ नागरिक काही काळानंतर परत आपल्या घरी गेलेले आहेत. सेवाकार्याला नवा परिमाण आणि परिभाषा ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’ आणि त्यांच्या सेवाभावी कार्यकर्त्यांनी दिली आहे.यंदाचे पुरस्काराथीदेखील तितक्याच तोलामोलाचे आहेत. नियती किंवा निष्ठुर समाजाने टाकून दिलेल्या अनाथ बालकांचे संगोपन आणि दत्तक पध्दतीने हक्काचे घर मिळवून देण्याचे कार्य करणाºया औरंगाबादच्या ‘साकार’ या संस्थेला गौरविले गेले. संस्थेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असून यावर्षी होणाºया सन्मानाला विशेष महत्त्व आहे. आतापर्यंत ३३२ बालकांना हक्काचे घर मिळवून देण्यात आले. डॉ.पानट यांच्यासह समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत महिलांनी पुढाकार घेत ही संस्था चालविली आहे. समाजातील ही अनिष्ठ प्रथा बंद झाली तर ‘साकार’ संस्थेला कुलूप लावायला आम्हाला आनंद होईल. तो सुदिन लवकर येवो, अशी प्रांजळ भावना डॉ.पानट यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. त्यातून समाजातील हे भीषण वास्तव आणि या क्षेत्रात कार्य करीत असलेल्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावना यानिमित्ताने समाजासमोर आल्या.गेवराई (जि.बीड) येथील सहारा अनाथालय, बालग्रामचे संतोष गर्जे हे दुसरे पुरस्कारार्थी होते. संवेदनशील हृदयाच्या संतोष गर्जे यांना बहिणीच्या मृत्यूनंतर अनाथ झालेल्या भाचीची हेळसांड अस्वस्थ करीत होती. त्यातच वडील परागंदा झाले. कुटुंबाची जबाबदारी अंगावर आली असताना भाचीसह अशीच अवस्था असलेल्या इतर बालकांसासाठी अनाथालय सुरु केले. अवघ्या १९ व्या वर्षी हे कार्य करणाºया गर्जे यांनी आतापर्यंत १८० मुलांचे पुनर्वसन केले आहे. तर सध्या ९० मुले त्यांच्या ‘बालग्राम’ मध्ये राहात आहेत. दोन्ही पुरस्कारार्र्थींचा यथोचित गौरव आणि त्यांची हृदयाला हात घालणारी मनोगते ऐकून जळगावकर भावविभोर झाले.रा.स्व.संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जळगावात प्रचारक म्हणून कार्य केलेल्या जोशी यांनी आयोजक संस्था, डॉ.आचार्य यांचे कर्तृत्व याविषयी गौरव करीत असताना मातृहृदयी व्यक्तीच चांगले सेवाकार्य उभे करु शकतात असे म्हणत पुरस्कारार्र्थींच्या कार्याचा सन्मान केला.

टॅग्स :Jalgaonजळगाव