शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

अस्तित्वाच्या शोधात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 06:42 IST

अजिंठा चित्रशिल्पांच्या रिस्टोरेशनचं माझं काम सुरू झालं तेव्हा माझ्याजवळ फक्त बुद्ध होते. त्या डोळे मिटलेल्या मूर्तीसमोर बसत माझा संवाद नि ध्यान सुरू झालं. या कामाचा आवाका फार मोठा व दीर्घ पल्ल्याचा आहे.

- प्रसाद पवारअजिंठा चित्रशिल्पांच्या रिस्टोरेशनचं माझं काम सुरू झालं तेव्हा माझ्याजवळ फक्त बुद्ध होते. त्या डोळे मिटलेल्या मूर्तीसमोर बसत माझा संवाद नि ध्यान सुरू झालं. या कामाचा आवाका फार मोठा व दीर्घ पल्ल्याचा आहे. विविध कला व संशोधनातले जगभरातले २०० मास्टर्स आता या प्रकल्पाशी जोडले गेलेत. कामाशी इतक्या खोलात जाऊन संवेदनेने कनेक्ट झाल्यामुळं असं काहीतरी घडतंय की लोक येऊन भेटताहेत. प्रोजेक्ट पुढे जातोय. इच्छाशक्तीच्या बळावर लोक पोहोचताहेत व पाठबळ देताहेत. त्यांचा संबंध मोबदल्याशी नाही आहे.

कातळात गुंफा खोदत त्यावर चित्रं आणि शिल्पं यांच्या माध्यमातून दिसणारी जातककथांची सूक्ष्म रेखाटनं, भिंत आणि छतावरच्या पानाफुलांच्या भौमितिक आकृत्या, आधुनिक त्रिमितीय वास्तुरचना, लाकडावरील नक्षीकाम, मौल्यवान दगडी खांब व त्याच्या गोलाईवरील नक्षी, सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही अशा अंधारातील अन्य काम, वेशभूषेतील जाडेभरडे व पारदर्शक रेशमी कपडे, अंगठीपासून मुकुटापर्यंतचं अलंकरण, विविध पक्षी-प्राण्यांचं जीवनातलं स्थान असं बरंच काही या चित्रांमध्ये आहे जे आजघडीला संपण्याच्या मार्गावर निघालं आहे. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत बुद्ध यांच्या जन्माच्या कथा इथं आहेत ज्या आपल्याला आपलं अस्तित्व शोधायला भाग पाडतात.

भारतीय कला २००० वर्षांपूर्वी अतिशय प्रगत होती. उदाहरणच द्यायचं तर, इथल्या गुंफेतला पूर्णा नावाचा प्रसंग पहा. पूर्णा बोटीतून व्यापार करायचा. त्याची बोट चितारलीय. बोटीत पिण्याच्या पाण्याचे घडे भरून ठेवलेत. म्हणजे प्रवास दूरचा आहे. त्याला जलराक्षसाने घेरलंय व बोट पुढे जात नाहीये. तो भगवानांची प्रार्थना करतोय असं दृश्य आहे. त्या चित्रात ‘जहाजा’चं १८० डिग्रीत चालणारं सुकाणू, अत्याधुनिक वाटणारे वल्हे, किडल दिसतं. केवळ चार महिने नदीला पाणी असणाºया अजिंठ्यातल्या कलाकारानं जहाज कधी बघितलं असेल? आपला इतिहास सांगतो, दर्यावर्दी असणाºया पोर्तुगीज आणि ब्रिटिश आल्यावर आपण जहाज पाहिलं. मग हे जलराक्षस नदीतले की समुद्रातले? आपल्याला पडणाºया प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न चित्रकारांनी केलाय. अशा कितीतरी कथा. या कथांमधले उडून भुकटी झालेले भाग पुरावे प्रमाणित करत जिवंत करणं हे फार वेळखाऊ नि खर्चिक काम आहे.

जेव्हा मी भगवान बुद्धांच्या जातककथेच्या अगदी जवळ असतो आणि छदंत नावाचं जातक वाचतो, त्यामध्ये भगवान बुद्ध पांढºया हत्तीच्या रूपाने जन्माला आलेत आणि त्यांना सहा दात होते. सहा दातांचा हा राजबिंडा हत्ती त्याच्या परिवारासह ज्या प्रदेशात राहात होता त्या प्रदेशातील राजाच्या राणीने याचं देखणं रूप बघितलं आणि राजाला सांगितलं की, मला दागिने घडवण्यासाठी याचे दात हवेत! राजा समजावतो, दात काढले तर हत्ती मृत्यू पावेल. राणी स्त्रीहट्ट धरून अन्नपाणी सोडते, आजारी पडते. राजा निरूपायाने हत्तीसाठी शिकारी पाठवतो. शिकारी बाण रोखतो. हत्तीच्या रूपातील बुद्धांच्या लक्षात येतं की आपला अवतार संपवायची वेळ आलीय. ते शिकाºयाला विचारतात, तुला काय हवंय? मग म्हणतात, ‘दातच हवेत ना? मग मला मारून तुम्ही पाप नका घेऊ अंगावर. मी तुम्हाला दात काढून देतो.’ शेवटचा दात तोडताना शिकाºयाच्या लक्षात येतं की हा कुठलातरी पवित्र आत्मा दिसतोय जो स्वत:हून दात काढून देत मृत्यूच्या दिशेनं चालला आहे. प्रत्येक जन्मात कुणातरीसाठी तुम्ही त्याग करा असं शिकवलं जातं. हे जातक याचंच उदाहरण. या कथेतील भागाचं डिजिटल रिस्टोरेशन करून मी संगणक खोलीतून बाहेरच्या जगात येतो तेव्हा लक्षात येतं की, तुम्ही जन्माला आलाय तर प्रचंड पैसा कमवा, प्रसिद्ध व्हा, यासाठी मोठाली महाविद्यालयं, क्लासेस असतात. ते हजारो रुपये घेऊन तुम्हाला यश कशात मानायचं याचे धडे देतात. तेव्हा मी विचार करतो की दोन हजार वर्षांपूर्वी यश कशाला म्हणायचं नि जगण्याची सार्थकता कशात याचं ‘त्याग’ हे उत्तर आपण सोबत काय नेतो याचं भान देणारं आहे. त्यामुळं आजच्या काळात जगताना धीर व विचार मिळतो.

आज अथक काम करून १४,४०० स्क्वेअर इंचांच्या संशोधनातून ५२ चित्रांचं प्रदर्शन दिल्लीत होऊ शकलं. चार फेजपैकी एका फेजचं म्हणजे दोन लाख २३ हजार २०० स्क्वेअर इंचाचं काम संशोधनासाठी टेबलवर आहे. एक स्क्वेअर इंच काम पूर्ण करायला १५ हजार खर्च येतो. त्या एका इंचाला प्रमाणित करण्यासाठी त्या त्या वेळी स्पॉटला जाऊन फोटो काढावे लागतात, प्रवास करावा लागतो, पुरावे मिळत नाहीत तोवर शोध व संशोधन गरजेचं बनतं. अखेर हे आपल्या येणा-या पिढ्यांकरता आहे.

म्हणून हा माझा किंवा स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कष्टणाºया ‘फाउण्डेशन’च्या नीलेश बोथरेसारख्या रिसर्च फोटोग्राफर व रमेश साळवेसारख्या प्रगतिशील मित्रांचाच फक्त प्रकल्प नाहीच. ‘प्रसाद पवार फाउण्डेशन’ आजवर हे प्रचंड खर्चिक काम करतेय. आता सक्रिय जनाधार हवा आहे. जगभरातल्या शंभर कोटी लोकांपर्यंत भारताचा हा देदीप्यमान इतिहास जावा असं मनात आहे. सांस्कृतिक मंत्रालय यासाठी पुढे झालंय; पण सर्वसामान्यांपासून सगळेच हात याला लागायला हवेत. अखेर आपण माणूस म्हणून कुठं येऊन पोहोचलोय याचं, आत्म्याबद्दलचं विधान यातून पोहोचतं आहे. बुद्धाच्या आदिम कणवेपर्यंत हा प्रवास आहे.