शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

RK Studio on auction : फिर भी रहेंगी निशानियाँ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 13:12 IST

आर. के. स्टुडिओ हा ग्रेट शोमॅन राज कपूरचं केवळ ‘स्मारक’च नव्हे, चित्रपटांच्या सुवर्णयुगाचा तो साक्षीदारही आहे. एकाहून एक सरस सिनेमे इथे तयार झाले. अनेक अभिनेत्यांच्या अभिनयाला कसदार वळसे याच ठिकाणी पडले.

- अजय परचुरे

आर. के. स्टुडिओ हा ग्रेट शोमॅन राज कपूरचं केवळ ‘स्मारक’च नव्हे, चित्रपटांच्या सुवर्णयुगाचा तो साक्षीदारही आहे. एकाहून एक सरस सिनेमे इथे तयार झाले. अनेक अभिनेत्यांच्या अभिनयाला कसदार वळसे याच ठिकाणी पडले. पण काळाची पावलं या स्टुडिओला ओळखता आली नाहीत, स्टुडिओची रया गेली, गेल्या वर्षी लागलेल्या आगीत तर त्याच्या सुवर्णयुगानं अक्षरश: काजळी धरली.चित्रीकरण बंद पडलं, तो चालवणं अवघड झालं. कपूर खानदानानं आता तो विकायचा निर्णय घेतलाय..हा स्वप्नमहाल रसिकांच्या मनातूनपुसला जाणं मात्र अशक्य आहे.

हम ना रहेंगे, तुम ना रहोगे.. फिर भी रहेगी निशानियाँ.. श्री ४२० सिनेमातील राज कपूर आणि नर्गिस यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं. योगायोगाची गोष्ट म्हणजे या गाण्याच्या ओळी पडद्यावर सुरू असताना पावसात भिजत जाणारी तीन लहान मुलं पडद्यावर येतात. पडद्यावरच्या या लहान मुलांत राज कपूरचा लाडका मुलगा ऋषी कपूरही होता. आर.के. स्टुडिओ विकण्यावरून सध्या जो काही बातम्यांचा महापूर आलाय, त्यात हे गाणं सतत आठवतंय. सध्या आर.के. स्टुडिओची जबाबदारी ऋषी कपूरच सांभाळतोय हाही एक योगायोग. इतक्या वर्षांपूर्वी चित्रित झालेल्या या गाण्यात राज कपूर जणू ऋषी कपूरला गाण्यातून सांगतोय की, मी राहणार नाही; पण मी जागवलेली ही विशाल स्वप्नं, माझा स्टुडिओ याची निशाणी मात्र पुसू नकोस. मात्र परिस्थिती बदललीय. सिनेमाचं स्वरूप बदललंय आणि एकेकाळी सुवर्णकाळ पाहिलेला आर.के. स्टुडिओ कपूर कुटुंबीयांकडून आता व्यावसायिक हातात दिला जातोय...

ग्रेट शोमॅन राज कपूर म्हणजे रूपेरी पडद्यावरील जादूगार. त्याने नुसतीच स्वप्नं दाखवली नाहीत तर तो स्वत: पडद्यावर ती स्वप्नं जगला. त्याच्या निळ्या डोळ्यांतील भाबडेपणा, ओठांवरील करुण हास्य तर कधी शृंगारातील आक्रमक धसमुसळेपणा पाहताना थिएटरच्या अंधारात बाह्य जगाचा विसर पडत असे. या स्वप्नांच्या बादशाहाने आग आणि बरसात या सुपरहिट सिनेमांची निर्मिती केल्यानंतर १९४८मध्ये मुंबईपासून दूर असणाऱ्या चेंबूरमध्ये दोन एकर जागेवर आर.के. स्टुडिओचा घाट घातला. त्या काळी चेंबूर हा वनराई आणि जंगलाने व्यापलेला सुनसान भाग होता. मात्र राज कपूरने अत्यंत मेहनतीने इथे आपल्या स्वप्नांचा महाल बांधला आणि आपल्या भात्यातून याच स्टुडिओमधून नंतर एकाहून एक सरस सिनेमे तयार केले. या स्टुडिओने काय नाही पाहिलं? सिनेमाच्या सुवर्णकाळातील सर्व गोष्टींचा आर. के. स्टुडिओ साक्षीदार आहे. होळीचा सण आर. के. स्टुडिओमध्ये जितका रंगला तितका क्वचितच नंतर या चंदेरी दुनियेत नंतरच्या सिताºयांनी अनुभवला असेल. पण या रूपेरी महालाला नेमकं आता असं चित्र का दिसतंय की कपूर कुटुंबीयांना या रूपेरी वास्तूला आता विकायची वेळ आली आहे. नेमकी काय कारणं असतील यामागे याचा शोध घेणं महत्त्वाचं आहे.

आर. के. समोरील अडचणीकपूर कुटुंबातील भावी पिढीमध्ये संपत्तीच्या वाटणीवरून कायदेशीर लढाई होऊ नये हा विचार समोर ठेवून हा निर्णय कपूर कुटुंबाने एकमताने घेतला आहे. या निर्णयाला राज कपूर यांची तीन मुले रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर यांच्यासह त्यांच्या दोन मुली रीमा जैन आणि रितू नंदा यांचीही सहमती मिळाली आहे. आर. के. स्टुडिओ विकला जाणार आहे, मात्र याबाबतची निश्चित तारीख ठरलेली नाही. मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवहार करणाºया एका कंपनीकडे हे काम देण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.स्टुडिओला का लागली

उतरती कळा?अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण याच स्टुडिओमध्ये झाले आहे. अलीकडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टीव्ही मालिकांचे चित्रीकरणही चालत होते. मात्र गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या स्टुडिओमध्ये भीषण आग लागली. या आगीत स्टुडिओचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपूर कुटुंबाने या संकटातून पुन्हा ताकदीनिशी उभे राहून आर.के.चे गतवैभव पुन्हा निर्माण करण्याचा निर्धार केला होता. मात्र त्यात त्यांना अडचणी येऊ लागल्या. आग लागल्यापासून स्टुडिओमधील चित्रीकरणही बंद पडले होते. त्यामुळे कुठलाही आर्थिक स्रोत नसल्यामुळे अखेर हा स्टुडिओ विकण्याच्या अंतिम निर्णयावर हे कुटुंब आले आहे.

जेव्हा स्टुडिओ गहाण ठेवावा लागला..राज कपूर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक गाजलेले चित्रपट निर्माण केले. मात्र त्यांनाही अशा काही प्रसंगाला सामोरे जावे लागले होते की, ज्यामुळे त्यांना हा स्टुडिओ गहाण ठेवावा लागला होता. राज कपूर यांनी ‘मेरा नाम जोकर’ हा अजरामर चित्रपट बनविला. त्यासाठी त्यांना भरपूर पैसा खर्च करावा लागला होता. या चित्रपट निर्मितीसाठीच त्यांना हा स्टुडिओ गहाण ठेवावा लागला होता. तरीही या चित्रपटातून त्यांना म्हणावा तितका आर्थिक फायदा झाला नाही. त्याचा मोठा धक्का राज कपूरना बसला होता. त्यानंतर त्यांनी आपला मुलगा ऋषी कपूर यांना बॉबी चित्रपटातून पडद्यावर आणले आणि या चित्रपटाच्या तुफान यशानंतर या आर.के. स्टुडिओचे कर्ज फेडण्यात आले.

काळाची पावलं ओळखता आली नाहीत..‘सबकुछ सीखा हमने ना सीखी होशियारी..’ राज कपूरनी हे गाणं सिनेमात स्वत:वर चित्रित केलं असलं तरी त्याच्या वारसांना ही होशियारी पुढे जाऊन स्टुडिओमध्ये आणता आली नाही. आर.के. स्टुडिओसमोर उभ्या राहिलेल्या इतर स्टुडिओमध्ये बदलत्या सिनेमाप्रमाणे प्रगत तंत्रज्ञान आलं. अत्याधुनिक बदल करण्यात आले. मात्र आर.के. स्टुडिओत हे तंत्रज्ञान आणण्यात कपूर खानदानने फारसं स्वारस्य दाखवलं नाही. वर्षभरापूर्वी आग लागल्याने स्टुडिओची रयाच गेली. मुंबईतील फिल्मसिटी, मढ या भागात पूर्णपणे विस्तारलेल्या सिनेमा जगताला एकेकाळचं वैभव असलेला चेंबूरचा हा स्टुडिओ दुसरं टोक वाटू लागला आणि स्टुडिओमधील चित्रीकरण पूर्णपणे थांबलं.ज्या शोमॅनने सिनेमा अक्षरश: जगला, जगवला त्याच्या स्वप्नांना आज त्याचेच कुटुंबीय आर्थिक तोट्यापायी आपली वास्तू व्यावसायिकाच्या हातात सोपवतायत. सिनेमाचा पोत बदललाय, त्याची रीत बदललीय. लाखों, कोटींचं बजेट अब्जोंमध्ये गेलंय; पण जीना यहाँ मरना यहाँ.. इसके सीवा जाना कहाँ.. हे उत्कटतेने म्हणणारा राज कपूर आणि त्याच्या या स्वप्नाचा महाल चिरकाल लक्षात राहील...कारण.. फिर भी रहेगी निशानियाँ...

(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत. ajay.natak@gmail.com)

टॅग्स :Raj Kapoorराज कपूरbollywoodबॉलिवूड