शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

काजवे आणि फुलपाखरं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:05 IST

वन्यजीव संवर्धन सप्ताहानिमित्त शाळेनं  अनेक उपक्रम आयोजित केले होते. सर्वाेत्तम निबंधाला मोठं बक्षीस होतं. हुशार विद्यार्थ्यांनीही त्यासाठी  झटून तयारी केली होती; पण ज्यांच्याकडून काहीच अपेक्षा नव्हती, त्यांनाच बक्षिसं मिळाली! असं का झालं?..

ठळक मुद्देधड ना लहान, धड ना मोठे अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’

- गौरी पटवर्धनआज शेवटी बक्षीस समारंभाचा दिवस उजाडला. शाळेतली माध्यमिक विभागाची एकूण पंधराशे मुलं मैदानात रांगेत बसली होती. त्यांच्या शाळेने एका स्थानिक स्वयंसेवी संस्थेसह आयोजित केलेल्या वन्यजीव संवर्धन सप्ताहाचा आज शेवटचा दिवस होता. या सप्ताहामध्ये वन्यजीव संवर्धन या विषयावर अनेक उपक्रम शाळेत राबवले होते. मुलांना फिल्म्स दाखवल्या होत्या, भाषणं दिली होती आणि विविध स्पर्धांही आयोजित केल्या होत्या. त्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ आज होता.शाळेतल्या शिक्षिका बक्षीस मिळालेल्या एकेका मुलाचं नाव पुकारत होत्या आणि तो मुलगा किंवा मुलगी व्यासपीठावर जाऊन बक्षीस घेऊन येत होती. पाचवी ते सातवीच्या लहान गटाची बक्षिसं देण्याचा कार्यक्र म चालू असताना नववी ‘अ’मधला चार-पाच मुला-मुलींचा गट आपापसात दबक्या आवाजात चर्चा करत होता. ही पाचही मुलं वर्गातली अत्यंत हुशार मुलं होती. अभ्यासाव्यतिरिक्त होणार्‍या सगळ्या उपक्रमांमध्ये कायम सहभागी होणारी होती. त्यातले दोघं वक्तृत्व स्पर्धांमधून कायम ढाल घेऊन यायचे. याही वेळी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या स्पर्धेचं बक्षीस त्यांच्यापैकीच कोणाला तरी मिळणार याची त्यांना खात्नी होती.यावेळी आयोजकांनी निबंध स्पर्धेसाठी सगळ्यात मोठं बक्षीस ठेवलं होतं, आणि ते म्हणजे जवळचं अभयारण्य आईबाबांबरोबर बघायला जाण्यासाठीचं तिकीट. ते बक्षीस आपल्यापैकीच कोणाला तरी मिळालं पाहिजे हे त्यांचं ठरलं होतं. त्यात आयोजकांनी विषय अगदीच सोपा ठेवला होता, ‘आपल्या परिसरातील वन्यजीव संवर्धनासाठी आपण काय कराल?’निबंध लिहून द्यायला तीन दिवसांचा वेळ होता. त्यामुळे या सगळ्या हुशार गॅँगने इंटरनेट आणि लायब्ररी या दोन्हीचा पुरेपूर वापर करून अतिशय अभ्यासपूर्ण निबंध लिहिले होते. त्यातही त्यांनी आपापसात स्ट्रॅटेजी आखून वेगवेगळ्या उपविषयांवर निबंध लिहिले होते. एकीने व्याघ्रसंवर्धन या विषयावर निबंध लिहिला होता. बिबट्या कुठल्या कुठल्या भूप्रदेशात आढळतो, त्याच्या सवयी काय असतात, तो माणसांवर हल्ला करतो का, कुठल्या परिस्थितीत करतो, अशी सगळी माहिती देऊन माणूस आणि बिबट्या यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो याची यादी देऊन तिने तो निबंध संपवला होता. पण जर का आपल्याला बक्षीस मिळालं तर आपलं तिकीट दादाला देऊन टाकायचं आणि त्याबदल्यात त्याच्याकडून त्याचा मोबाइल वापरायला मिळवायचा हे तिचं ठरलेलं होतं. कारण तिला सगळ्याच प्राण्यांची भयंकर भीती वाटायची. आणि उघड्या जीपमध्ये बसून जाताना जर समोर बिबट्या आला तर आपल्याला तिथेच हार्ट अटॅक येईल याबद्दल तिची खात्नी होती. म्हणजे निबंध लिहिण्याच्या निमित्ताने तिला आता हे समजलं होतं, की असा बिबट्या समोर आला तर आपण काय करावं आणि काय करू नये; पण तरी बिबट्या समोर येईल अशा ठिकाणी आपण जायचंच कशाला, असा तिला प्रामाणिक प्रश्न होता.दुसर्‍या एका मुलाने हत्ती आणि माणूस यांच्यातील संघर्षाबद्दल लिहिलं होतं. तिसर्‍याने जंगलातील परिसंस्था कशी वाचवावी असा विषय घेतला होता. चौथ्या मुलीने झाडं वाचवली तर एकूणच निसर्गाचा समतोल कसा राखला जातो आणि त्यामुळे वन्यजीवांचं अपोआप संवर्धन होतं असा मुद्दा मांडला होता, तर पाचव्याने माणूस कसा निसर्गाचं नुकसान करतो, त्यामुळे सगळ्या गोष्टींचा समतोल कसा बिघडतो आहे असा काहीसा व्यापक विषय घेतला होता.त्या पाचही जणांच्या निबंधांमध्ये भरपूर आकडेवारी होती, अनेक उदाहरणं होती, मोठय़ा-मोठय़ा पर्यावरणतज्ज्ञांची वाक्यं उद्धृत केलेली होती. सगळ्यांनी एकमेकांचे निबंध वाचले होते. आणि आपल्यापैकीच कोणाला तरी बक्षीस मिळणार याची त्यांना खात्नी होती. प्रश्न एवढाच होता, की कोणाला?एव्हाना मोठय़ा, आठवी ते दहावीच्या गटाचा बक्षीस समारंभ सुरू झाला होता. बाईंनी इतर स्पर्धांची बक्षिसं जाहीर केली आणि म्हणाल्या,‘आता या सप्ताहातल्या सगळ्यात महत्त्वाच्या स्पर्धेचे विजेते कोण आहेत हे आपण बघूया. आयोजकांनी मुद्दाम निबंध स्पर्धेसाठी मोठी बक्षिसं जाहीर केली आहेत. कारण त्यानिमित्ताने, तुम्ही वाचावं, माहिती शोधावी, विचार करावा आणि ती माहिती सुसूत्नपणे मांडावी असं आयोजकांना आणि आपल्या शाळेला वाटतं. कारण तुमचे विचार तुमच्या कृतीत उतरण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे.. तर, आता आपण वळूया आपल्या पहिल्या विजेत्याकडे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळतंय आठवी ‘ब’मधील निकिताला..’पाचही जणांनी एकमेकांकडे आश्चर्याने बघितलं. कारण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे तीनही बक्षिसं त्यांनाच मिळायला पाहिजे होती. पण अजून दुसरं आणि पहिलं बक्षीस बाकी होतं. मात्र दुसरं बक्षीसही दुसर्‍याच कोणाला तरी मिळालं. आता पहिलं मात्न आपल्यालाच मिळायला पाहिजे असा विचार करत ते पाचही जण उठायच्या तयारीत बसले होते आणि बाईंनी जाहीर केलं, ‘पहिलं बक्षीस आणि अभयारण्याचं तिकीट जिंकणार्‍या विद्यार्थ्यांचं नाव आहे, विशाल, नववी क.’ अगदी मागे बसलेला विशाल उठून बक्षीस घ्यायला निघाला. त्याच्या सकट संपूर्ण शाळेला त्याला पहिलं बक्षीस मिळाल्याचं आश्चर्य वाटलं होतं. बक्षीस समारंभासाठी आलेले संस्थेचे अध्यक्ष म्हणाले, ‘मला या मुलाच्या निबंधाबद्दल दोन शब्द बोलायचे आहेत.’ त्यांनी विशालला स्टेजवर उभं केलं आणि म्हणाले,‘या स्पर्धेत तुमच्या शाळेतल्या अनेक मुलांनी भाग घेतला. तुम्ही सगळ्यांनीच खरोखर खूप अभ्यास करून, माहिती शोधून निबंध लिहिले आहेत. वन्यजीव संवर्धन या विषयावर यानिमित्ताने तुम्ही इतका विचार केलात ही फार छान गोष्ट आहे; पण मग इतके सगळे निबंध चांगले असताना या मुलाच्या निबंधाला पहिलं बक्षीस का दिलं, हा प्रश्न मला तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यात दिसतो आहे. त्याचंच उत्तर द्यायला मी इथे उभा आहे. या निबंधाला पहिलं बक्षीस मिळालं कारण, तो निबंध  खरा  आहे. म्हणजे मी एकच उदाहरण सांगतो, या मुलाने असं लिहिलंय की मी माझ्या आजूबाजूला कोणी भिंगाचे किडे किंवा काजवे पकडून काड्यापेटीत ठेवत असेल तर त्यांना तसं करू देणार नाही. किंवा कोणी मुलं फुलपाखराच्या पायाला दोरा बांधून उडवत असतील तर मी त्यांना तसं करण्यापासून थांबवीन. कारण वाघ आणि हत्तीसारखं फुलपाखरू आणि भिंगाचा किडापण वन्यजीवच असतो; पण आपण त्यांना पाळत नाही. वाघ आणि हत्तींसाठी मी काही करू शकत नाही; पण माझ्या आजूबाजूला कोणी खाण्यासाठी तितर मारत असेल, तर मी त्याला थांबवीन.’एवढं बोलून अध्यक्षांनी विशालला जवळ बोलावलं आणि म्हणाले, ‘हे बक्षीस निबंध चांगला लिहिण्यासाठीच नाहीये. हे बक्षीस स्वत:च्या र्मयादा ओळखून त्या र्मयादेत आपण जे सर्वोत्तम करू शकतो त्याचा विचार करण्यासाठीचं आहे. तू नक्कीच खूप मोठा होशील. पण कितीही मोठा झालास तरी हा खरेपणा मात्न जपून ठेव.’संपूर्ण शाळेने टाळ्यांचा कडकडाट केला. कारण विशालला मिळालेलं बक्षीस योग्य होतं हे सगळ्यांनाच पटल होतं. lpf.internal@gmail.com(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)