शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

कथकची राणी

By admin | Updated: November 29, 2014 14:12 IST

कथक म्हणजे सितारादेवी आणि सितारादेवी म्हणजे कथक, हे समीकरण कायमचे रूढ झाले होते व आहे. कथक क्वीन सितारादेवी यांनी आपले एक अढळ स्थान निर्माण केले होते. अशा या ज्येष्ठ व श्रेष्ठ कलावंताचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयीच्या आठवणींना दिलेला हा उजाळा..

 पं. नंदकिशोर कपोते

 
भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीचे अकरा प्रकार आहेत. उत्तर भारतातील कथक, तमिळनाडूचे भरतनाट्यम, केरळचे कथकली, मणिपूरचे मणिपुरी, ओरिसाचे ओडिसी, केरळचे मोहिनीअट्टम, आंध्र प्रदेशातील कुचीपुडी, बिहारचे छाऊ, सत्रिय, गौदिया व थांबता. महाराष्ट्रात यांपैकी प्रचलित लोकप्रिय शैली आहेत कथकनृत्य व भरतनाट्यम्. त्याखालोखाल ओडिसी.
उत्तर प्रदेशातील कथकनृत्य शैली ही एक नैसर्गिक अर्थात सर्वांगसुंदर नृत्त, नृत्य, नाट्य यांनी परिपूर्ण अशी शैली आपले एक खास वेगळेपण टिकवून आहे. नृत्त, नृत्य, नाट्य अर्थात् पदन्यास (लय-ताल), तोडे-तुकडे, गत विकास, अभिनय अशा सर्व शृंगाराने नटलेले, बहरलेले हे कथकनृत्य. आणि ज्या वेळी कथकनृत्य समोर येते, त्या वेळी आठवतात लय व अभिनयाच्या राणी कथक क्वीन सितारादेवी. त्यांनी कथकविश्‍वात आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे. कथकचा प्रचार व प्रसार करण्यात या ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकाराचे मोलाचे योगदान आहे, हे एक निर्विवाद सत्य आहे. कथक म्हणजे सितारादेवी व सितारादेवी म्हणजे कथक, हे समीकरण कायमचे रूढ झाले होते व आहे.
 सितारादेवी यांचे निधन झाले, यावर अजून विश्‍वासच बसत नाही. सप्टेंबर महिन्यात सितारादीदींनी मला फोन केला होता व म्हणाल्या होत्या, ‘ मुझे तुम्हारे पास बुलाओ। मैं १0-१५ दिन तुम्हारे पास रहूँगी, तुम्हे मैं मेरे बनारस घरानें का कथक सिखानेवाली हूँ। मेरे पास कम टाइम है, मेरा व्हिडिओ तुम करो।’ आणि खरोखरच ‘कम टाइम है।’ हे त्यांचे शब्द  खरे ठरले.   
पद्मश्री सितारादेवी या खरोखरच कथकच्या राणी शोभत होत्या. केवळ दोन महिन्यांपूर्वीपर्यंत सोळा वर्षांच्या असल्याप्रमाणे कथकचा साज चढवून कथकनृत्य प्रदर्शनास तयार होत्या. कथक नृत्यातील पद्न्यास (ना धिं धिं धा) व अभिनयावरील प्रभुत्व ही सितारादीदींच्या नृत्याची खास वैशिष्ट्ये! त्यांचा विलोभनीय सर्वांगसुंदर अभिनय रसिक प्रेक्षकांना सदैव भुरळ घालत असे. दीदी पायाद्वारे खड्या पायांचा ना धिं धिं ना अतिशय स्पष्टपणे काढत असत. त्यात एक गोडवा व मोहकता असे. असा इतका सुंदर ना धिं धिं धा मी कधीच कुठल्या कथकनर्तकाला काढताना पाहिल्याचे आठवत नाही.
कथक नृत्यात लखनौ, बनारस, जयपूर व रायगड ही चार घराणी. यांपैकी महत्त्वाचे बनारस घराणे. याच्या सितारादेवी मुख्य प्रचारक व प्रसारक होत्या. सितारादेवी  या पं. सुखदेवमहाराज मिश्रा यांच्या कन्या. प्राचीन काळी कथकनृत्य हे केवळ पुरुषच करीत असत. स्त्रियांना नृत्य करण्याची परवानगी नव्हती. एखाद्या स्त्रीने नृत्य करण्याचा प्रयत्न केला तर त्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहिले जायचे. अशा काळात बनारस घराण्याचे मुख्य प्रवर्तक पं. सुखदेवमहाराज यांनी आपल्या तीन कन्या अलकनंदादेवी, तारादेवी (स्व. पं. गोपीकृष्ण यांच्या आई) व सितारादेवी यांना समाजाची पर्वा न करता कथकनृत्य शिकविण्यास सुरुवात केली होती हे विशेष. सितारादीदींनी अशा प्रकारे बनारस घराण्याचे शिक्षण आपले वडील पं. सुखदेवमहाराज यांच्याकडे पूर्ण केले, तर लखनौ घराण्याचे शिक्षण गुरू स्व. पं. अच्छन महाराज (पं. बिरजूमहाराजांचे वडील), तसेच  पं. शंभूमहाराज व  पं. लच्छूमहाराज यांच्याकडे घेतले.
सितारादेवी या नटराज गोपीकृष्ण यांच्या मावशी. सितारादीदींचा जन्म १९२२ मध्ये बनारस येथे दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी झाला. सितारादीदींनी याविषयी मला एक सुंदर गमतीशीर किस्सा सांगितला, की ‘धनत्रयोदशीच्या दिवशी माझा वाढदिवस असल्यामुळे अभिनेते दिलीपकुमार मला ‘धन्नो’ या नावाने हाक मारायचे. त्यामुळे चित्रपट क्षेत्रात मला सगळे कलाकार ‘धन्नो’ या नावानेच ओळखायला लागले’. 
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक के. आसिफ यांच्या सितारादेवी या पत्नी. सितारादेवींनी अनेक हिंदी चित्रपटांत नायिकाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्या काळात कथक नर्तिका व हिंदी चिटपट नायिका म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शनही केले होते. वयाच्या १६व्या वर्षी सितारादेवींनी गुरुवर्य पं. रवींद्रनाथ टागोर यांच्यासमोर सुंदर कथकनृत्य सादर केले. सितारादेवींचे सुरेख नृत्य पाहून पं. रवींद्रनाथ टागोर भारावून गेले व त्यांनी सितारादेवींना‘कथकक्वीन’ उपाधी (पदवी) दिली. पुढेसितारादीदींना कथकक्वीन म्हणूनच ओळखले जाऊ लागले. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी कथक नृत्यास लोकप्रियता मिळवून दिली. सितारादीदींनी कथकनृत्य घराघरांत पोहोचवले. त्यांच्यामुळे कथकनृत्य क्षेत्रात मुली मोठय़ा प्रमाणात आल्या. सितारादीदी मुंबईत स्थायिक होत्या. त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू आहेत. दीदी परखड (स्पष्टवक्त्या) होत्या.  त्या जेवढय़ा कडक होत्या, तेवढय़ाच प्रेमळ होत्या. दीदींचा कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रमामधून उठून जायची कुणाचीही हिम्मत नसे, इतका त्यांचा दरारा होता. त्यामुळे सितारादीदींचा कथकनृत्याचा प्रत्येक कार्यक्रम म्हणजे  रसिकांना एक आगळावेगळा अनुभव रसिकांना देऊन जात असे. तर सौंदर्यपूर्ण अंग, जोरकस पदलालित्य व अभिनयावरील प्रभुत्व त्यामुळे सितारादेवींचे नृत्य सदैव कलाप्रेमींना मेजवानीच ठरत होते.
 पुण्यात प्रथमच सन २00२ मध्ये सितारादीदी माझ्याकडे आल्या. त्यामुळे केवळ कथकप्रेमीच नव्हे, तर सर्व पुणेकर त्यांना पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी आतुरले होते. माझी संस्था नंदकिशोर कल्चरल सोसायटी व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कथक महायज्ञ’ नावाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.  सितारादीदींचे स्वागत आम्ही शाही थाटात केले. सर्व पुणेकर ८0 व्या वर्षी सितारादेवींचे अप्रतिम नृत्य पाहून धन्य धन्य झाले. 
मला आठवते, २0१२ मध्ये पुण्यात सितारादेवींचे नृत्य होते. मी रंगमंचावर गायक वादकासमवेत बसलो होतो. दीदींनी कथकनृत्य पेश करून रंगमंचावर मला जवळ बोलावले व दीदींनी आपला कंबरपट्टा (सितारादीदींनी स्वत:च्या हातांनी तयार केलेला हे विशेष) हजारो प्रेक्षकांच्या समक्ष माझ्या कंबरेला बांधला व ‘ही माझी भेट आहे, जपून ठेव’ असे म्हणाल्या. हा मला मिळालेला सर्वांत मोठा पुरस्कार आहे. अशा महान कलाकाराकडून भेट मिळणे हा माझ्यासाठी सुवर्णक्षण होता. 
 या वयातही त्यांनी आपले सौंदर्य टिकवून ठेवले होते. माणसाने सुंदर कसे राहावे, हे सितारादेवींकडून शिकावे. सितारादीदींचे जगण्यावर खूप प्रेम होते. त्यामुळेच दीदी आयुष्य आनंदात जगल्या.
माझ्या घरी त्या पुण्यात (१५ फेब्रुवारी २0१४) सर्व घरात, देवघरात देखील फिरल्या आणि सितारादीदी मला म्हणाल्या, ‘नंदकिशोर, देखो मैंने पुरे घर में मेरे पैर रख के मेरी निशानी तुम्हारे पास छोड. दी है। मेरी सारी यादें तुम्हें सौंप दी हैं।’ हे ऐकून मला गहिवरून आले व सितारादीदींना मी म्हणालो, ‘दीदी, आपको सौं साल पुरे होने के बाद भी मेरे पास आना है और तब आपका जनमदिन मैं धुमधाम से मनाऊँगा।’
 त्यांच्या निधनाने कथक विश्‍वात जी 
पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरून न येणारी आहे. सर्व कलाकारांचा आधारस्तंभ हरवला आहे. कथक विश्‍वातील सितारादीदी प्रकाशमान तारा आहेत. काळाच्या पडद्याआड सितारादीदी गेल्या असल्या, तरी कथकनृत्य रूपाने त्या सदैव आपल्यात असणार आहेत. ज्या वेळी कथकनृत्याचे नाव 
घेतले जाईल, त्या त्या वेळी त्यांचे अखंड स्मरण 
होत राहील..
(लेखक कथक नर्तक आहेत.)