शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
5
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
6
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
7
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
8
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
9
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
10
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
11
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
12
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
13
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
14
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
15
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
16
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
17
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
18
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
19
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
20
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार

शांती-सुख समाधान

By admin | Updated: April 29, 2014 15:28 IST

योग हे ‘शास्त्र’ आहे आणि ते आचरण्याचे ‘शास्त्र’ आहे. कोणतेही शास्त्र हे जीवनाच्या आयुष्यमानात पूर्णत: समजणे हे अशक्य असते, हे लक्षात घेणे आवश्यक असते. ?

योग हे ‘शास्त्र’ आहे आणि ते आचरण्याचे ‘शास्त्र’ आहे. कोणतेही शास्त्र हे जीवनाच्या आयुष्यमानात पूर्णत: समजणे हे अशक्य असते, हे लक्षात घेणे आवश्यक असते.?

योगशास्त्रातील सातवे ‘ध्यान’ याविषयी ओळख करून घेतल्यावर आता आठवे अंग म्हणजे समाधी होय. याविषयी समजून घेण्यापलीकडे वेगळे काही सांगता येईल असे वाटत नाही; कारण सामान्यत: याविषयी आवड व ओढ फारच कमी लोकांना असते.सर्वसामान्य लोकांना आवश्यक असते ती शांती, सुख व समाधान. समाधी याचा अर्थ या तिन्हींचा समावेशक म्हणून समाधान असे मानले जाते. आज समाजाचे चित्र आपल्यासमोर आहे, त्यात या तिन्हींचा अभावच आढळतो. विचारांती असे लक्षात येते, की जे काही गुन्हेगारीचे वातावरण दिसते आहे किंवा पुण्य-पापादी संकल्पनांना डावलून भयानक व दु:खदायी कृत्ये केली जातात, त्यामागील जी मानसिकता आहे, ती वासना, असंतुष्टता आणि असमाधान यांमध्येच आहे. एकमेकांवर अवलंबून असलेले हे तिन्ही घटक तसे वेगवेगळे नाहीत आणि तसेच ते वरवर दिसतही नाहीत. कोणतीही व्यक्ती स्वत:तील अज्ञान, वासना, असंतुष्टता व असमाधान ओळखण्याची वा पारखण्याची इच्छा बाळगत नाही. इतरांमधील दोष मात्र चटकन लक्षात येतात व स्वत:मधील दोष अजिबात दिसत नाहीत. ते अज्ञान आणि अस्मिता यांच्या पांघरुणाखाली दडलेले असतात. इतरांच्या चुका डोळ्यांत तेल घालून धुंडाळणे ही अजब मानसिकता सर्वांमध्येच दिसत असते; परंतु आपल्यात चुका वा दोष कुठे आहेत, हे सहजगत्या दृष्टिगोचर होत नाही; लक्षात येत नाही. काही वेळा ते सोयीस्कररीत्या दुर्लक्षिलेदेखील जातात; म्हणूनच ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे म्हटले आहे. कुणी दोष दाखवून दिले, तर दोषपरिहारही शोधता येतो. दुरुस्ती करता येते; अन्यथा अहंकार जोर धरतो.प्रथमत: योग हे एक दर्शन आहे. तत्त्वदर्शन हा त्याचा उद्देश आहे. दर्शन हे आरशासारखे आहे. आरशात जसे आपले प्रतिबिंब, आहे तसेच दिसते; त्याचप्रमाणे या योगदर्शनात डोकावले असताना आपले स्वत:चे प्रतिबिंब आहे तसे दिसते. तत्त्वज्ञान हा जीवनाचा केवळ आदर्श नव्हे, तर ते ‘तत्त्व’ धुंडाळण्याचे काम असते. ते तत्त्व समजण्यासाठी जे अ-तत्त्व आहे, अ-सत्त्व आहे, निर्थक आहे, असत्य आहे म्हणजेच असत् आहे ते सर्वच निवडून बाजूला करण्याइतकी विवेकजागृती होणे आवश्यक असते. ते या योगाभ्यासाने साधायचे आहे आणि तदनुषंगाने पुढले पाऊल टाकायचे आहे.या जागृत विवेकामुळे दृष्टी तशी सृष्टी न राहता, भोवतालची सृष्टी बदललेली जाणवते; किंबहुना बदलता येते. यालाच म्हणतात ‘समाधान’. योगाभ्यासाने दोष जेव्हा कमी होत जातात, तेव्हाच समाधान ही वृत्ती बळावत जाते. वासनेचा क्षय होत गेला, की समाधान ही स्थिती प्राप्त होते; म्हणून समाधी म्हणजे समाधान, हाही एक अर्थ आहे. चित्त विचलित न होता समस्थितीत असते. या समस्थितीत द्वंद्वस्थितीला जागा नसते.समाधी याचा आणखी एक अर्थ म्हणजे समबुद्धी व स्थिरबुद्धी होय. भावनेच्या भरात बुद्धी चंचल होता कामा नये; बुद्धीचे पतनही होता कामा नये. बुद्धीची स्थिरता महत्त्वाची होय. अष्टांग योगाची साधना करताना साधकाची वर्तणूक, समज यांत योग्य बदल घडणे आवश्यक असते. समाधी ही अगोदरच्या सप्तांगांचा परिणाम म्हणून संभवते. नीतियुक्त वर्तणूक, बुद्धियुक्त समज, त्यागयुक्त कर्माची जाण, आसक्तिरहित कर्मवृत्ती, कर्मबंधातून मुक्त राहण्याची संवेदनशीलता, निश्‍चयात्मक बुद्धिप्रवाह, चित्ताची सत्त्वशीलता, सुख-दु:खांत अथवा प्राप्ती-अप्राप्तीच्या संदर्भात चित्त समत्व स्थिती ठेवण्याची कुशलता इत्यादी गुण साधकाने संपादावे लागतात. समाधीसाठी आत्मसंतुष्टी, अनुद्विगन्ता, स्थिरबुद्धी, समत्व बुद्धी, रागद्वेषादींपासून मुक्त होत ममत्त्वाचा मोह सोडत जगण्याची प्रवृत्ती समृद्ध करावी लागते, तेव्हाच सप्तांगांचा अभ्यास वैराग्याच्या दृष्टिकोनातून अर्थपूर्णरीत्या म्हणजे सरावाच्या पाट्या न टाकता, स्वत:मध्ये होत असणार्‍या चित्तपरिवर्तनावर लक्ष ठेवत समाधीकडे वळावे लागते.प्राणायाम, प्रत्याहार, धारणा व ध्यान ही एक सात्त्विक चौकड आहे. या चारही अंगांमधील अंगभूत सांगड लक्षात घेणे आवश्यक असते, तरच समाधीत प्रवेश मिळू शकतो; अन्यथा नाही. तेव्हा समाधीसाठी पूर्वतयारी ही प्राणायामापासून होत असते. स्वामी रामदास म्हणतात त्याप्रमाणे यम, नियम, आसन, प्राणायामाने प्रापंचिक संसार नेटका केला गेला, की या सात्त्विक चौकडीच्या आधाराने आध्यात्मिक संसार थाटता येतो.आता, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. सर्वसामान्य मनुष्य योगाभ्यास करतो ते आरोग्य मिळावे, शारीरिक रोग संभवू नयेत, मन:शांती लाभावी व रोगमुक्त व्हावे यासाठी होय. ही आरोग्याविषयी जागृती असणेही रास्त आहे. यापेक्षा खोलवर योगविषयात शिरणे सर्वसामान्यांना शक्य नसते. याविषयी पूर्वीदेखील सांगून झालेले आहे. तेव्हा आपल्यापुरते आपणास काय हवे आहे, हे उचलण्याची मुभा योगशास्त्राने दिली आहे. तसेच, सरतेशेवटी योग हे ‘शास्त्र’ आहे आणि ते आचरण्याचे ‘शास्त्र’ आहे. कोणतेही शास्त्र हे जीवनाच्या आयुष्यमानात पूर्णत: समजणे हे अशक्य असते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तेव्हा योगाभ्यास करणारे सर्व जण समाधीपर्यंत पोहोचतातच असे नाही, तसे अपेक्षितही नाही; पण समजून घेता मात्र निश्‍चित येते. त्यासाठी निराश होणेदेखील अयोग्य होय. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.तेव्हा ते समजून घेणे, प्रयत्न करणे, त्या दिशेने वाटचाल करणे साधकाचे काम आहे. तसेच, जेव्हा ते जमत नाही, समजत नाही, उमजत नाही, तेथवर मजल जात नाही हे लक्षात येते, तेव्हा उंच उडी घेणे अथवा आकाशी उडणेदेखील चुकीचे होय. अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षा यांतील फरक लक्षात घेणे येथे योग्य ठरेल. आसन आणि प्राणायाम ही दोन अंगे या दृष्टीने महत्त्वाची होत आणि सर्वसामान्यांना या दोन अंगांचा अभ्यास, जीवनाच्या मार्गावर सुरळीत व सुरक्षित जाण्यास निश्‍चितच योग्य होय. ही दोन्ही अंगे माणसाचे पाय जमिनीवर ठेवण्यास भाग पाडतात. यामधून पुढील अंगाकडे जाण्यास आवश्यक असलेल्या गुणांचे संवर्धन करण्यास मात्र येथे निश्‍चितच मदत होते. चित्तावर योग्य संस्कार घडत जातात. त्यातून सुख, शांती व समाधान लाभल्यास त्यापेक्षा वेगळे असे आजच्या युगात काय पाहिजे आहे?तेव्हा समाधी म्हणजे काय, हे जाणण्यापूर्वी साधनेत आपण कुठवर उंची गाठली आहे, हे लक्षात घेणे आवश्यक असते.लेखक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगाचार्य, लेखिका योगसाधनेचे तत्त्वज्ञान मांडणार्‍या विचारवंत आहेत.)