शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्र डागले, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

इंधनाचे वेगळे पर्याय शोधायला हवेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 07:00 IST

शासनाने जट्रोफा पिकाला उत्तेजन देण्यासाठी आणि इंधन अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. शेतक-यानाही त्यामुळे एक वेगळा पर्याय उपलब्ध होईल.

- व्ही. पी. जोशी, कोल्हापूर

लोकमतच्या ‘मंथन’ पुरवणीत अलीकडे काही उत्कृष्ट लेख वाचनात आले. त्यातून बरीच माहिती मिळाली आणि योग्यायोग्यतेचं भानही आलं. जट्रोफा पिकाची लागवड सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यात झाली आणि तेही विनायक पाटील यांच्यासारख्या माजी मंत्र्यांकडून! त्यांच्याच प्रयत्नांमुळे जट्रोफा सातासमुद्रापार गेला, त्यावर वेगवेगळे प्रयोग झाले. जट्रोफाच्या तेलावर त्यावेळी वाहनं चालवण्याचाही प्रयोग झाला. आणि आता पुन्हा जट्रोफाच्या इंधनावर विमान चालवण्यात आलं. जट्रोफातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म तर त्यामुळे कळलेच, पण जट्रोफा पीक सध्या शेतक-यासाठी किफायतशीर नाही, हेही त्यांनी अतिशय मुद्देसुदपणे आणि प्रामाणिकपणे मांडले. अन्यथा जट्रोफाचे इतके फायदे आहेत, हे कळल्यावर शेतक-यानी या पिकाच्या लागवडीसाठी धाव घेतली असती. मात्र विनायक पाटील यांनी सावधानतेचा सल्ला दिल्यामुळे शेतकरी वेळीच सावध झाले. परंतु शासनाने या पिकाला उत्तेजन देण्यासाठी आणि इंधन अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. शेतक-यानाही त्यामुळे एक वेगळा पर्याय उपलब्ध होईल.

केरळमध्ये नुकत्याच आलेल्या पुरावरून तिथे जी आपत्ती ओढवली आणि तिथल्या लोकांचा नेमका प्रश्न काय आहे, त्यांना कशाची गरज आहे, याचं नेमकं आणि अचूक वर्णन योगेश गायकवाड यांनी केलं. निसर्गाची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला की निसर्गही योग्यवेळी आपला प्रताप दाखवतो. माणसाला विकास आवश्यक आहे, हे निसंशय खरं; पण त्यासाठी आपण निसर्गाला शत्रूच समजायला पाहिजे असं नाही, याचा योग्य तो धडा आपण केरळच्या घटनेवरून घेतला पाहिजे. 

शाळकरी मुलांना दुधाच्या भुकटीऐवजी दूध दिले पाहिजे, याबाबत हेरंब कुलकर्णी यांचा लेख अभ्यासपूर्ण होता. दुधाचा प्रश्न नेमका काय आहे, दुधाचा योग्य वापर केला तर मुलांचे पोषण होईलच; पण शेतक-याचे जीवनमान उंचावण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो, हे त्यांचे निरीक्षण अचूक आहे. मात्र शाळकरी मुलांकडे लक्ष देताना गर्भवती मातांचीही काळजी घेतली पाहिजे. दूध उपयुक्त आहे हे खरं, पण त्यात क जीवनसत्त्व, लोहतत्त्व नसते. कणीस, मका, ऊस. हे पदार्थही पाचवीच्या पुढच्या विद्यार्थ्यांना देता आले तर पाहायला हवे. गाजर, केळी, टमाटे हे पदार्थ तुलनेनं स्वस्त, पौष्टिक, अधिक उत्पादन देणारे आहेत, मुलं आणि गर्भवती माता यांच्यासाठी काही वेगळे पर्याय वापरता आले तर सकस अन्नाचा प्रश्न सुटू शकेल.