शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

इंधनाचे वेगळे पर्याय शोधायला हवेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 07:00 IST

शासनाने जट्रोफा पिकाला उत्तेजन देण्यासाठी आणि इंधन अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. शेतक-यानाही त्यामुळे एक वेगळा पर्याय उपलब्ध होईल.

- व्ही. पी. जोशी, कोल्हापूर

लोकमतच्या ‘मंथन’ पुरवणीत अलीकडे काही उत्कृष्ट लेख वाचनात आले. त्यातून बरीच माहिती मिळाली आणि योग्यायोग्यतेचं भानही आलं. जट्रोफा पिकाची लागवड सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यात झाली आणि तेही विनायक पाटील यांच्यासारख्या माजी मंत्र्यांकडून! त्यांच्याच प्रयत्नांमुळे जट्रोफा सातासमुद्रापार गेला, त्यावर वेगवेगळे प्रयोग झाले. जट्रोफाच्या तेलावर त्यावेळी वाहनं चालवण्याचाही प्रयोग झाला. आणि आता पुन्हा जट्रोफाच्या इंधनावर विमान चालवण्यात आलं. जट्रोफातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म तर त्यामुळे कळलेच, पण जट्रोफा पीक सध्या शेतक-यासाठी किफायतशीर नाही, हेही त्यांनी अतिशय मुद्देसुदपणे आणि प्रामाणिकपणे मांडले. अन्यथा जट्रोफाचे इतके फायदे आहेत, हे कळल्यावर शेतक-यानी या पिकाच्या लागवडीसाठी धाव घेतली असती. मात्र विनायक पाटील यांनी सावधानतेचा सल्ला दिल्यामुळे शेतकरी वेळीच सावध झाले. परंतु शासनाने या पिकाला उत्तेजन देण्यासाठी आणि इंधन अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. शेतक-यानाही त्यामुळे एक वेगळा पर्याय उपलब्ध होईल.

केरळमध्ये नुकत्याच आलेल्या पुरावरून तिथे जी आपत्ती ओढवली आणि तिथल्या लोकांचा नेमका प्रश्न काय आहे, त्यांना कशाची गरज आहे, याचं नेमकं आणि अचूक वर्णन योगेश गायकवाड यांनी केलं. निसर्गाची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला की निसर्गही योग्यवेळी आपला प्रताप दाखवतो. माणसाला विकास आवश्यक आहे, हे निसंशय खरं; पण त्यासाठी आपण निसर्गाला शत्रूच समजायला पाहिजे असं नाही, याचा योग्य तो धडा आपण केरळच्या घटनेवरून घेतला पाहिजे. 

शाळकरी मुलांना दुधाच्या भुकटीऐवजी दूध दिले पाहिजे, याबाबत हेरंब कुलकर्णी यांचा लेख अभ्यासपूर्ण होता. दुधाचा प्रश्न नेमका काय आहे, दुधाचा योग्य वापर केला तर मुलांचे पोषण होईलच; पण शेतक-याचे जीवनमान उंचावण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो, हे त्यांचे निरीक्षण अचूक आहे. मात्र शाळकरी मुलांकडे लक्ष देताना गर्भवती मातांचीही काळजी घेतली पाहिजे. दूध उपयुक्त आहे हे खरं, पण त्यात क जीवनसत्त्व, लोहतत्त्व नसते. कणीस, मका, ऊस. हे पदार्थही पाचवीच्या पुढच्या विद्यार्थ्यांना देता आले तर पाहायला हवे. गाजर, केळी, टमाटे हे पदार्थ तुलनेनं स्वस्त, पौष्टिक, अधिक उत्पादन देणारे आहेत, मुलं आणि गर्भवती माता यांच्यासाठी काही वेगळे पर्याय वापरता आले तर सकस अन्नाचा प्रश्न सुटू शकेल.