शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

इंधनाचे वेगळे पर्याय शोधायला हवेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 07:00 IST

शासनाने जट्रोफा पिकाला उत्तेजन देण्यासाठी आणि इंधन अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. शेतक-यानाही त्यामुळे एक वेगळा पर्याय उपलब्ध होईल.

- व्ही. पी. जोशी, कोल्हापूर

लोकमतच्या ‘मंथन’ पुरवणीत अलीकडे काही उत्कृष्ट लेख वाचनात आले. त्यातून बरीच माहिती मिळाली आणि योग्यायोग्यतेचं भानही आलं. जट्रोफा पिकाची लागवड सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यात झाली आणि तेही विनायक पाटील यांच्यासारख्या माजी मंत्र्यांकडून! त्यांच्याच प्रयत्नांमुळे जट्रोफा सातासमुद्रापार गेला, त्यावर वेगवेगळे प्रयोग झाले. जट्रोफाच्या तेलावर त्यावेळी वाहनं चालवण्याचाही प्रयोग झाला. आणि आता पुन्हा जट्रोफाच्या इंधनावर विमान चालवण्यात आलं. जट्रोफातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म तर त्यामुळे कळलेच, पण जट्रोफा पीक सध्या शेतक-यासाठी किफायतशीर नाही, हेही त्यांनी अतिशय मुद्देसुदपणे आणि प्रामाणिकपणे मांडले. अन्यथा जट्रोफाचे इतके फायदे आहेत, हे कळल्यावर शेतक-यानी या पिकाच्या लागवडीसाठी धाव घेतली असती. मात्र विनायक पाटील यांनी सावधानतेचा सल्ला दिल्यामुळे शेतकरी वेळीच सावध झाले. परंतु शासनाने या पिकाला उत्तेजन देण्यासाठी आणि इंधन अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. शेतक-यानाही त्यामुळे एक वेगळा पर्याय उपलब्ध होईल.

केरळमध्ये नुकत्याच आलेल्या पुरावरून तिथे जी आपत्ती ओढवली आणि तिथल्या लोकांचा नेमका प्रश्न काय आहे, त्यांना कशाची गरज आहे, याचं नेमकं आणि अचूक वर्णन योगेश गायकवाड यांनी केलं. निसर्गाची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला की निसर्गही योग्यवेळी आपला प्रताप दाखवतो. माणसाला विकास आवश्यक आहे, हे निसंशय खरं; पण त्यासाठी आपण निसर्गाला शत्रूच समजायला पाहिजे असं नाही, याचा योग्य तो धडा आपण केरळच्या घटनेवरून घेतला पाहिजे. 

शाळकरी मुलांना दुधाच्या भुकटीऐवजी दूध दिले पाहिजे, याबाबत हेरंब कुलकर्णी यांचा लेख अभ्यासपूर्ण होता. दुधाचा प्रश्न नेमका काय आहे, दुधाचा योग्य वापर केला तर मुलांचे पोषण होईलच; पण शेतक-याचे जीवनमान उंचावण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो, हे त्यांचे निरीक्षण अचूक आहे. मात्र शाळकरी मुलांकडे लक्ष देताना गर्भवती मातांचीही काळजी घेतली पाहिजे. दूध उपयुक्त आहे हे खरं, पण त्यात क जीवनसत्त्व, लोहतत्त्व नसते. कणीस, मका, ऊस. हे पदार्थही पाचवीच्या पुढच्या विद्यार्थ्यांना देता आले तर पाहायला हवे. गाजर, केळी, टमाटे हे पदार्थ तुलनेनं स्वस्त, पौष्टिक, अधिक उत्पादन देणारे आहेत, मुलं आणि गर्भवती माता यांच्यासाठी काही वेगळे पर्याय वापरता आले तर सकस अन्नाचा प्रश्न सुटू शकेल.