शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नयनमनोहर बदामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:45 IST

कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बदामी शहर हे एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. शिल्पकला, गुहा, लेणी, धार्मिकस्थळ आणि व्यापारी पेठ अशा अनेकविध अंगांनी बदामीचा लौकिक वाढतच आहे.

- डॉ. सुभाष देसाई -कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बदामी शहर हे एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. शिल्पकला, गुहा, लेणी, धार्मिकस्थळ आणि व्यापारी पेठ अशा अनेकविध अंगांनी बदामीचा लौकिक वाढतच आहे.चालुक्यांच्या काळात बदामीला वातापी असे म्हणत. पूर्वी ग्रीक भूगोलतज्ज्ञ टॉलेमी या व्यापारी केंद्राला बदाममी असे म्हणत. येथील मलप्रभा नदीच्या काठावर प्राचीन संस्कृतीच्या अनेक खुणा सापडतात.चालुक्य सम्राटाचा काळ हा इ. स. ६३१ ते ७४१चा. त्यावेळची भाषा कानडी आणि तेलुगू. बारा आणि तेराव्या शतकानंतर त्या दोन स्वतंत्र भाषा झाल्या. राजा मंगलेशचा काळ ६०२चा होता. या राजाचा उल्लेख कवी कालिदासाच्या रघुवंशात येतो. अहिवोलाच्या टेकडीवरील मंदिरात कालिदास व भार्गव या दोन कवींचा उल्लेख आढळतो. इ. स. ४५५ ते ४६७ मध्ये कालिदास सम्राट विक्रमादित्याच्या दरबारात होता. पाटलीपुत्र म्हणजे बिहार येथील गुप्त वंशाच्या राजाशी हे घराणे संबंधित होते. बदामीचा राजा पुलकेशीने उत्तर प्रदेशमधल्या हर्षवर्धन राजाचा पराभव केला. त्या विजयाप्रीत्यर्थ अहिवोलाला शिवमंदिर उभारले आहे. मागुती मंदिरात शिलालेखाचा उल्लेख आढळतो. कर्नाटकात शक युग बदामीच्या चालुक्य राजवटीने सुरू केले. खास बदामीच्या संग्रहालयात तसा शिलालेख आढळतो.

इ. स. ५४३मध्ये गुरुवार हा बृहस्पतीवार आहे असा उल्लेख दुसरा पुलकेशी राजाने सर्वप्रथम केला. राजा विक्रमादित्याने इ. स. ६९२ मध्ये शनिवार हे नाव प्रथम वापरल्याचा उल्लेख शिमोगा येथील शिलालेखावर केला आहे. तमिळनाडूचा पल्लव वंशाच्या नरसिंहाने इ. स. ६४२ मध्ये बदामी जिंकली. या युद्धात पुलकेशी दुसरा बदामीचा राजा मारला गेला. (त्याने ६१० ते ६४२ या काळात राज्य केले). त्याचा बदला विक्रमादित्य दुसरा याने (७३३ ते ७४४) कांचीपूरम जिंकून घेतला. त्या काळाची माहिती येथील मंदिराच्या दगडी स्तंभांवर कोरलेली आहे. यापूर्वी बदामीला मी दहा-बारा वेळा गेलो आहे; परंतु खालचे शिवमंदिर आणि वरचे शिवमंदिर मी पाहिलेले नव्हते. या योगायोगाला आमचे मित्र डॉक्टर विजय चव्हाण हे प्रसिद्ध भूलतज्ज्ञ आहेत. त्यांच्या पत्नी डॉक्टर रश्मी चव्हाण या दोघांनी बदामीचीे सहल अचानक ठरवली. त्यांच्या विनंतीनुसार मी जॉईन झालो. बरोबर अजिंक्य पाटीलही होते.

बदामीला शाकंभरी यात्रा सुरू होती. त्यामुळे बनशंकरी देवीच्या मंदिरात लाखोंनी भाविक जमलेले होते. मंदिराच्या परिसरातून जाऊन आलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे पाच-सहाला उठून बदामी गुफेंच्या दिशेने निघालो. अंधार अजूनही होता तोपर्यंत समोरच्या टेकडीवरील शिव मंदिराची वाट चालू लागलो. अतिशय सुंदर आणि त्यातून बदामीचे दृश्य फारच सुंदर दिसत होते. तिथून आम्ही खाली उतरलो. एखाद्या इंग्लिश चित्रपटातील दृश्याप्रमाणे वेगळाच निसर्ग, वेगळी रंगसंगती असणारे प्रचंड दगड आणि त्यातून जाणारी वाट हे पाहून मन प्रसन्न होते. तेथून शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना ठरावा अशी लेणी बघत निघालो.

पूर्वी चांदोबाच्या मासिकांमध्ये दिसणारी चित्रे या भागातील असावीत असे वाटू लागते. शेवटचे लेणी हे जैन धर्मीयांचे दैवत भगवान महावीरांच्या वर आहे. याठिकाणी एक यमसल्लेखना घेऊन मोक्ष मिळवलेल्या स्त्रीचे शिल्प आहे. त्यानंतर पट्टदखल आणि तिथून अहिवोल येथे जाऊन शिल्पकलेची अनेक मंदिरे पाहिली. आपण जा आणि आनंद लुटा. कोल्हापूरपासून फक्त २३५ किलोमीटर अंतरावर साडेचार तासांचा कारचा प्रवास आहे. येथे निवासाची उत्तम सोय आहे. कोल्हापूर-संकेश्वर- गोकाक-यरगट्टी आणि बदामी असा रस्त्याचा मार्ग आहे.(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)