शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

प्रकाशवाट दाखवणारी माणसे कुठे गेली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 06:05 IST

खाप्रूमाम पर्वतकर, पं. रामकृष्णबुवा वझे यांच्यासारख्या माणसांनी संगीतावर गारुड केलं. अशी माणसं संगीताचा ठेवा आहेत.

ठळक मुद्देज्यांच्या गुणसूत्रांमध्ये फक्त तालाच्या मात्रांचे हिशेब आणि स्वरांचे अंदाज हेच नोंदवलेले आहे, असे कलाकार ही फक्त एका काळाची मक्तेदारी होती की काय, ठाऊक नाही.

- वंदना अत्रेज्यांच्या गुणसूत्रांमध्ये फक्त तालाच्या मात्रांचे हिशेब आणि स्वरांचे अंदाज हेच नोंदवलेले आहे, असे कलाकार ही फक्त एका काळाची मक्तेदारी होती की काय, ठाऊक नाही. शोध घेताना गेल्या शतकातील असे कलाकार भेटतात जे वास्तवातून नाही तर निव्वळ दंतकथेतून उतरले आहेत असे वाटावे. एरवी, रुपये, पैसे, आणे याचा कोणताही हिशोब ज्यांना आयुष्यभर करता आला नाही, असा खाप्रूमामसारखा एखादा कलाकार  एका हाताने एक ताल, दुसऱ्या हाताने दुसरा, दोन्ही पायांनी दोन वेगवेगळे ताल, तोंडाने पाचवा ताल आणि तबल्यावर सहावा ताल वाजवत, शिवाय सर्वांची सम हमखास एकत्र आणण्याचे अशक्य गणित साधत होता यावर विश्वास बसणे कठीण!

एखाद्या अव्वल दर्जाच्या  गणिती डोक्यालासुद्धा अनाकलनीय वाटावे असे मात्रांचे हे हिशोब हा जेमतेम साक्षर असलेला कलाकार सहज मांडत असे. हे कुठून आले असेल? संगीतसृष्टीतील महान कोडे अशा शब्दात खाँसाहेब अल्लादियाखाँ ज्यांचा उल्लेख करीत ते लयभास्कर खाप्रूमाम पर्वतकर हे तबला, मृदंग आणि सारंगी यावर जणू सत्ता गाजवणारे कलाकार. तोच त्यांचा चरितार्थ. पण हळूहळू लय आणि तिचे अनंत बारकावे या अभ्यासाचा इतका ध्यास लागला की वादन किंवा साथसंगत या गोष्टी त्यांच्यासाठी अगदी दुय्यम झाल्या. थोडक्यात खिशात चार पैसे पडण्याची शक्यता जरा अवघडच ! त्या काळजीपोटी मग मित्राने एकदा विचारले, ‘आपल्या हातातील विद्येवर पैसे मिळवण्याची सूतराम शक्यता दिसत नसताना तुमचा प्रपंच चालतो कसा?’ यावर क्षणार्धात ते म्हणाले, ‘तुमचा जसा प्रपंच चालतो तसाच देवाच्या कृपेने माझाही चालतो. तुम्ही पैसे मिळवता म्हणून जेवढे आनंदी आहात त्याच्या लक्षपटीने मी पैसे मिळवत नाही म्हणून आनंदी असतो...!’ डोक्यात अखंड मात्रांचे अतिसूक्ष्म गणित असताना व्यवहाराच्या मैदानात उतरणे हे त्यांच्यासाठी जणू महापापच..!  जगणे म्हणजे जेव्हा फक्त संगीत असते तेव्हा केवळ व्यवहाराचा नाही तर व्यथेचाही विसर पडतो... ही गोष्ट गायनाचार्य पंडित रामकृष्णबुवा वझे यांची..

सारंगीनवाझ उस्ताद बुंदू खाँ यांचे एक शिष्य पुण्यात बुवांना भेटण्यासाठी गेले तेव्हा बुवा आसन्नमरण अवस्थेत होते. उस्तादांनी बुवांना अगदी आर्जवपूर्वक विनंती केली, ‘आप बडे विद्वान है.. आप इजाजत दे तो शामको घंटा आधा घंटा आपको कुछ सुनाना चाहता हूँ... बडी तमन्ना है आपकी सेवा करनेकी...’ बुवांनी मनापासून संमती दिली. संध्याकाळी खाँसाहेबांनी सारंगीवादनास सुरुवात केली. बुवा अंथरुणावर पडून ऐकत होते. तासभर सारंगीवादन झाले. उस्ताद सारंगी खाली ठेवत असताना बुवा एकदम ताडकन उठले आणि शिष्यांना म्हणाले, ‘तंबोरे काढा..’ सगळे दचकले. कदाचित घरी आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार करण्याचा एवढा एकच मार्ग जणू बुवांना ठाऊक असावा. शिवाय समोर स्वरांची झुळझुळ गंगा वाहत असताना आपल्या व्यथेला कवटाळून काठावर बसणे त्यांना अगदी मान्य नव्हते!  खाँसाहेब अजीजीने म्हणाले, ‘आप बीमार है, आप तकलीफ मत उठायीये..’ यावर बुवा म्हणाले, ‘आपके उस्ताद मेरे दोस्त है. आप मेरे लिये खास घर आये और अपनी सारंगी सुनानेकी तकलीफ उठायी. तो मेरा भी कर्तव्य बनता है, आपको अपना गाना जरूर सुनाऊ...’ बुवांनी श्री चा ख्याल सुरू केला.  त्यानंतर तासभर मैफलीत गावे तसे ते मोठ्या तडफेने गात होते. आजार विसरून...! गाणे संपताक्षणी ते पुन्हा रुग्ण शय्येवर पडले. अर्थात, या आजारातून ते पुन्हा कधीच उठले नाहीत. खाप्रूमामना एकदा कोणीतरी एक प्रश्न विचारला होता, ‘लयीची एवढी अवघड, अशक्य वाटणारी गणिते आपण कशी इतक्या सहज सोडवता?’ ते म्हणाले, ‘लयीचा विचार करताना मला आत स्वच्छ प्रकाश दिसू लागतो. त्या प्रकाशात मला सर्व काही स्पष्ट दिसू लागते. तुम्ही अभ्यास करा, तुम्हालाही हे सर्व काही करता येईल...’ कुठे गेली हा प्रकाश दाखवणारी माणसे आता?(लेखिका संगीत आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)vratre@gmail.com