शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

प्रकाशवाट दाखवणारी माणसे कुठे गेली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 06:05 IST

खाप्रूमाम पर्वतकर, पं. रामकृष्णबुवा वझे यांच्यासारख्या माणसांनी संगीतावर गारुड केलं. अशी माणसं संगीताचा ठेवा आहेत.

ठळक मुद्देज्यांच्या गुणसूत्रांमध्ये फक्त तालाच्या मात्रांचे हिशेब आणि स्वरांचे अंदाज हेच नोंदवलेले आहे, असे कलाकार ही फक्त एका काळाची मक्तेदारी होती की काय, ठाऊक नाही.

- वंदना अत्रेज्यांच्या गुणसूत्रांमध्ये फक्त तालाच्या मात्रांचे हिशेब आणि स्वरांचे अंदाज हेच नोंदवलेले आहे, असे कलाकार ही फक्त एका काळाची मक्तेदारी होती की काय, ठाऊक नाही. शोध घेताना गेल्या शतकातील असे कलाकार भेटतात जे वास्तवातून नाही तर निव्वळ दंतकथेतून उतरले आहेत असे वाटावे. एरवी, रुपये, पैसे, आणे याचा कोणताही हिशोब ज्यांना आयुष्यभर करता आला नाही, असा खाप्रूमामसारखा एखादा कलाकार  एका हाताने एक ताल, दुसऱ्या हाताने दुसरा, दोन्ही पायांनी दोन वेगवेगळे ताल, तोंडाने पाचवा ताल आणि तबल्यावर सहावा ताल वाजवत, शिवाय सर्वांची सम हमखास एकत्र आणण्याचे अशक्य गणित साधत होता यावर विश्वास बसणे कठीण!

एखाद्या अव्वल दर्जाच्या  गणिती डोक्यालासुद्धा अनाकलनीय वाटावे असे मात्रांचे हे हिशोब हा जेमतेम साक्षर असलेला कलाकार सहज मांडत असे. हे कुठून आले असेल? संगीतसृष्टीतील महान कोडे अशा शब्दात खाँसाहेब अल्लादियाखाँ ज्यांचा उल्लेख करीत ते लयभास्कर खाप्रूमाम पर्वतकर हे तबला, मृदंग आणि सारंगी यावर जणू सत्ता गाजवणारे कलाकार. तोच त्यांचा चरितार्थ. पण हळूहळू लय आणि तिचे अनंत बारकावे या अभ्यासाचा इतका ध्यास लागला की वादन किंवा साथसंगत या गोष्टी त्यांच्यासाठी अगदी दुय्यम झाल्या. थोडक्यात खिशात चार पैसे पडण्याची शक्यता जरा अवघडच ! त्या काळजीपोटी मग मित्राने एकदा विचारले, ‘आपल्या हातातील विद्येवर पैसे मिळवण्याची सूतराम शक्यता दिसत नसताना तुमचा प्रपंच चालतो कसा?’ यावर क्षणार्धात ते म्हणाले, ‘तुमचा जसा प्रपंच चालतो तसाच देवाच्या कृपेने माझाही चालतो. तुम्ही पैसे मिळवता म्हणून जेवढे आनंदी आहात त्याच्या लक्षपटीने मी पैसे मिळवत नाही म्हणून आनंदी असतो...!’ डोक्यात अखंड मात्रांचे अतिसूक्ष्म गणित असताना व्यवहाराच्या मैदानात उतरणे हे त्यांच्यासाठी जणू महापापच..!  जगणे म्हणजे जेव्हा फक्त संगीत असते तेव्हा केवळ व्यवहाराचा नाही तर व्यथेचाही विसर पडतो... ही गोष्ट गायनाचार्य पंडित रामकृष्णबुवा वझे यांची..

सारंगीनवाझ उस्ताद बुंदू खाँ यांचे एक शिष्य पुण्यात बुवांना भेटण्यासाठी गेले तेव्हा बुवा आसन्नमरण अवस्थेत होते. उस्तादांनी बुवांना अगदी आर्जवपूर्वक विनंती केली, ‘आप बडे विद्वान है.. आप इजाजत दे तो शामको घंटा आधा घंटा आपको कुछ सुनाना चाहता हूँ... बडी तमन्ना है आपकी सेवा करनेकी...’ बुवांनी मनापासून संमती दिली. संध्याकाळी खाँसाहेबांनी सारंगीवादनास सुरुवात केली. बुवा अंथरुणावर पडून ऐकत होते. तासभर सारंगीवादन झाले. उस्ताद सारंगी खाली ठेवत असताना बुवा एकदम ताडकन उठले आणि शिष्यांना म्हणाले, ‘तंबोरे काढा..’ सगळे दचकले. कदाचित घरी आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार करण्याचा एवढा एकच मार्ग जणू बुवांना ठाऊक असावा. शिवाय समोर स्वरांची झुळझुळ गंगा वाहत असताना आपल्या व्यथेला कवटाळून काठावर बसणे त्यांना अगदी मान्य नव्हते!  खाँसाहेब अजीजीने म्हणाले, ‘आप बीमार है, आप तकलीफ मत उठायीये..’ यावर बुवा म्हणाले, ‘आपके उस्ताद मेरे दोस्त है. आप मेरे लिये खास घर आये और अपनी सारंगी सुनानेकी तकलीफ उठायी. तो मेरा भी कर्तव्य बनता है, आपको अपना गाना जरूर सुनाऊ...’ बुवांनी श्री चा ख्याल सुरू केला.  त्यानंतर तासभर मैफलीत गावे तसे ते मोठ्या तडफेने गात होते. आजार विसरून...! गाणे संपताक्षणी ते पुन्हा रुग्ण शय्येवर पडले. अर्थात, या आजारातून ते पुन्हा कधीच उठले नाहीत. खाप्रूमामना एकदा कोणीतरी एक प्रश्न विचारला होता, ‘लयीची एवढी अवघड, अशक्य वाटणारी गणिते आपण कशी इतक्या सहज सोडवता?’ ते म्हणाले, ‘लयीचा विचार करताना मला आत स्वच्छ प्रकाश दिसू लागतो. त्या प्रकाशात मला सर्व काही स्पष्ट दिसू लागते. तुम्ही अभ्यास करा, तुम्हालाही हे सर्व काही करता येईल...’ कुठे गेली हा प्रकाश दाखवणारी माणसे आता?(लेखिका संगीत आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)vratre@gmail.com