शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

…पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 06:05 IST

खरं सांगतो, अशक्तपणा खूप होता तरीही गृह विलगीकरणाची ते पंधरा दिवस मी मनमुराद जगून घेतले !

ठळक मुद्देया धावपळीच्या जीवनात आपण स्वतःला कुठे तरी हरवून बसलो आहोत. या दिवसात स्वतःसोबत घालवलेला वेळ कायम माझ्या स्मरणात राहील.

अभिषेकधात्रक, नांदेड

एप्रिलचा महिना. प्रचंड उकाडा जाणवत होता म्हणून कूलर दुरुस्तीचे सामान आणायला बाजारात गेलो आणि सामानासोबत कोरोनाला घेऊन आलो. त्याच रात्री ताप आणि कणकण जाणवायला सुरुवात झाली. ११ एप्रिल रोजी केलेली रॅपिड अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि सुरु झाला कोरोना सोबतचा १५ दिवसांचा वनवास... एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती तर दुसरीकडे मृत्यूचे तांडव चालू होतं. अशा नकारात्मकतेच्या गर्द छायेत सकारात्मक राहणं हे एक आव्हानच होतं माझ्यासाठी. आणि आता सुरु झाली १५ दिवसांच्या वनवासाची कहाणी .

सर्वात आधी मला ‘आनंद’ सिनेमातल्या राजेश खन्ना साहेबांच्या डायलॉगची आठवण झाली-

‘बाबूमोशाय, ज़िन्दगी और मौत उपरवाले के हाथ है ! जहाँपनाह उससे न तोह आप बदल सकते हैं न मैं, हम सब तो रंगमंच की कठपुतलियाँ हैं. जिनकी डोर उपरवाले की उंगलियों में बंधी हैं ! कब, कौन, कैसे उठेगा यह कोई नहीं बता सकता है ! हा, हा, हा.’

- म्हणून मरणाचा विचार न करता, मन प्रसन्न ठेवण्यासाठी भरपूर सिनेमे, वेबसीरिज,माहितीपट पाहिले. कॉमेडी शोज, स्टॅंड अप कॉमेडी बघून सतत स्वतःचं मनोरंजन करत होतो. महत्वाचं म्हणजे यात कुणाचा व्यत्यय नव्हता. नाही तर आपलं ‘आवाज कमी कर, पाण्याची टाकी भरली का बघ, दळण घेऊन ये...’ हेच चालू असतं.

या १५ दिवसांत बातम्या, सोशल मीडिया, वर्तमानपत्र सर्वांना कात्री लावली. पूर्णवेळ आराम एके आराम फक्त एवढंच केलं. कधी कधी तर आरामानेच थकवा येईल असं वाटायचं.

सुरुवातीचे ४-५ दिवस जरा कठीण गेले. अशक्तपणा आणि ताप असल्याकारणाने चक्कर आल्यासारखं वाटायचं. औषधं भरपूर असल्यामुळे खाती घेतली, की काही वेळातच झोप यायची. पण नंतर हळूहळू बरं वाटायला लागलं .

वाफ घ्या, योगा करा, प्राणायाम करा, गरम पाणी प्या... घरचे दिवसभर ह्या गोष्टींचा भडीमार करायचे. परंतु यातल्या कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊ दिला नाही. सर्व काही योग्य प्रमाणात ठेवलं. आणि खरं सांगू का? अशक्तपणामुळे एवढं गळून गेल्यासारखं वाटायचं की बसायची इच्छा होत नव्हती. योगा, प्राणायाम वगैरे ते तर दूरच राहिले. दुसऱ्याला सांगायला बरं वाटतं की हे कर ते कर, आपल्यावर वेळ आली की कळतं सगळं.

- याउलट माझ्याकडे माऊथ ऑर्गन होता तर बसल्या बसल्या मी तो वाजवायचो त्यामुळे दीर्घ श्वसनाचा व्यायाम कदाचित नकळत झाला असेल. अनावश्यक सिटीस्कॅन केला नाही. डॉक्टरांनी सांगितलेले नियम काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न केला.

माझ्या आईला पाककलेची खूप हौस. रोज नवीन काही तरी खायला द्यायची पण काही चव नव्हती तोंडाला. रोज फलाहार असायचा. जेवणात अंडी, पालेभाज्या, पराठे, शेवग्याचं वरण असे जिन्नस खात होतो. रात्री हळदीचं दूध !

संध्याकाळ झाली की कॉफीचा कप घेऊन गच्चीवर थंड हवेत एक तास येरझरा मारणे, निवडक मित्रांसोबत फोनवर गप्पा मारणे हा माझा दिनक्रम ठरलेला होता. शाहरुख खान, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांचे टॉक शोज, मुलाखती पहिल्या. यूट्यूबवर शिमला, मनाली, कोकणाची travel vlogs बघितले. एकंदरीत हा काळ मी जगलो असे म्हणायला काही हरकत नाही.

बघता बघता १५ दिवसांचा वनवास कधी संपला कळला देखील नाही. या दिवसांत एक जाणवलं की एकांतात माणसाची productivity वाढते. स्वतःला वेळ देता आला. काही प्रश्नांची उत्तरं नकळत मिळाली. या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःला कुठे तरी हरवून बसलो आहोत. या दिवसात स्वतःसोबत घालवलेला वेळ कायम माझ्या स्मरणात राहील. आणि हो, सकारात्मक राहण्याकरिता बाह्य घटकांची काहीही गरज नसते. आपल्या स्वतःला ते सहज शक्य आहे फक्त गरज आहे ती इच्छाशक्तीची. शेवटी १ मे महाराष्ट्र दिनी माझा गृहप्रवेश झाला. जाता जाता इतकंच सांगतो, " अगर end में सबकुछ ठीक ना हो, तो picture अभी बाकी है मेरे दोस्त".

abhishekdhatrak000@gmail.com