शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

…पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 06:05 IST

खरं सांगतो, अशक्तपणा खूप होता तरीही गृह विलगीकरणाची ते पंधरा दिवस मी मनमुराद जगून घेतले !

ठळक मुद्देया धावपळीच्या जीवनात आपण स्वतःला कुठे तरी हरवून बसलो आहोत. या दिवसात स्वतःसोबत घालवलेला वेळ कायम माझ्या स्मरणात राहील.

अभिषेकधात्रक, नांदेड

एप्रिलचा महिना. प्रचंड उकाडा जाणवत होता म्हणून कूलर दुरुस्तीचे सामान आणायला बाजारात गेलो आणि सामानासोबत कोरोनाला घेऊन आलो. त्याच रात्री ताप आणि कणकण जाणवायला सुरुवात झाली. ११ एप्रिल रोजी केलेली रॅपिड अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि सुरु झाला कोरोना सोबतचा १५ दिवसांचा वनवास... एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती तर दुसरीकडे मृत्यूचे तांडव चालू होतं. अशा नकारात्मकतेच्या गर्द छायेत सकारात्मक राहणं हे एक आव्हानच होतं माझ्यासाठी. आणि आता सुरु झाली १५ दिवसांच्या वनवासाची कहाणी .

सर्वात आधी मला ‘आनंद’ सिनेमातल्या राजेश खन्ना साहेबांच्या डायलॉगची आठवण झाली-

‘बाबूमोशाय, ज़िन्दगी और मौत उपरवाले के हाथ है ! जहाँपनाह उससे न तोह आप बदल सकते हैं न मैं, हम सब तो रंगमंच की कठपुतलियाँ हैं. जिनकी डोर उपरवाले की उंगलियों में बंधी हैं ! कब, कौन, कैसे उठेगा यह कोई नहीं बता सकता है ! हा, हा, हा.’

- म्हणून मरणाचा विचार न करता, मन प्रसन्न ठेवण्यासाठी भरपूर सिनेमे, वेबसीरिज,माहितीपट पाहिले. कॉमेडी शोज, स्टॅंड अप कॉमेडी बघून सतत स्वतःचं मनोरंजन करत होतो. महत्वाचं म्हणजे यात कुणाचा व्यत्यय नव्हता. नाही तर आपलं ‘आवाज कमी कर, पाण्याची टाकी भरली का बघ, दळण घेऊन ये...’ हेच चालू असतं.

या १५ दिवसांत बातम्या, सोशल मीडिया, वर्तमानपत्र सर्वांना कात्री लावली. पूर्णवेळ आराम एके आराम फक्त एवढंच केलं. कधी कधी तर आरामानेच थकवा येईल असं वाटायचं.

सुरुवातीचे ४-५ दिवस जरा कठीण गेले. अशक्तपणा आणि ताप असल्याकारणाने चक्कर आल्यासारखं वाटायचं. औषधं भरपूर असल्यामुळे खाती घेतली, की काही वेळातच झोप यायची. पण नंतर हळूहळू बरं वाटायला लागलं .

वाफ घ्या, योगा करा, प्राणायाम करा, गरम पाणी प्या... घरचे दिवसभर ह्या गोष्टींचा भडीमार करायचे. परंतु यातल्या कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊ दिला नाही. सर्व काही योग्य प्रमाणात ठेवलं. आणि खरं सांगू का? अशक्तपणामुळे एवढं गळून गेल्यासारखं वाटायचं की बसायची इच्छा होत नव्हती. योगा, प्राणायाम वगैरे ते तर दूरच राहिले. दुसऱ्याला सांगायला बरं वाटतं की हे कर ते कर, आपल्यावर वेळ आली की कळतं सगळं.

- याउलट माझ्याकडे माऊथ ऑर्गन होता तर बसल्या बसल्या मी तो वाजवायचो त्यामुळे दीर्घ श्वसनाचा व्यायाम कदाचित नकळत झाला असेल. अनावश्यक सिटीस्कॅन केला नाही. डॉक्टरांनी सांगितलेले नियम काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न केला.

माझ्या आईला पाककलेची खूप हौस. रोज नवीन काही तरी खायला द्यायची पण काही चव नव्हती तोंडाला. रोज फलाहार असायचा. जेवणात अंडी, पालेभाज्या, पराठे, शेवग्याचं वरण असे जिन्नस खात होतो. रात्री हळदीचं दूध !

संध्याकाळ झाली की कॉफीचा कप घेऊन गच्चीवर थंड हवेत एक तास येरझरा मारणे, निवडक मित्रांसोबत फोनवर गप्पा मारणे हा माझा दिनक्रम ठरलेला होता. शाहरुख खान, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांचे टॉक शोज, मुलाखती पहिल्या. यूट्यूबवर शिमला, मनाली, कोकणाची travel vlogs बघितले. एकंदरीत हा काळ मी जगलो असे म्हणायला काही हरकत नाही.

बघता बघता १५ दिवसांचा वनवास कधी संपला कळला देखील नाही. या दिवसांत एक जाणवलं की एकांतात माणसाची productivity वाढते. स्वतःला वेळ देता आला. काही प्रश्नांची उत्तरं नकळत मिळाली. या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःला कुठे तरी हरवून बसलो आहोत. या दिवसात स्वतःसोबत घालवलेला वेळ कायम माझ्या स्मरणात राहील. आणि हो, सकारात्मक राहण्याकरिता बाह्य घटकांची काहीही गरज नसते. आपल्या स्वतःला ते सहज शक्य आहे फक्त गरज आहे ती इच्छाशक्तीची. शेवटी १ मे महाराष्ट्र दिनी माझा गृहप्रवेश झाला. जाता जाता इतकंच सांगतो, " अगर end में सबकुछ ठीक ना हो, तो picture अभी बाकी है मेरे दोस्त".

abhishekdhatrak000@gmail.com