शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

…पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 06:05 IST

खरं सांगतो, अशक्तपणा खूप होता तरीही गृह विलगीकरणाची ते पंधरा दिवस मी मनमुराद जगून घेतले !

ठळक मुद्देया धावपळीच्या जीवनात आपण स्वतःला कुठे तरी हरवून बसलो आहोत. या दिवसात स्वतःसोबत घालवलेला वेळ कायम माझ्या स्मरणात राहील.

अभिषेकधात्रक, नांदेड

एप्रिलचा महिना. प्रचंड उकाडा जाणवत होता म्हणून कूलर दुरुस्तीचे सामान आणायला बाजारात गेलो आणि सामानासोबत कोरोनाला घेऊन आलो. त्याच रात्री ताप आणि कणकण जाणवायला सुरुवात झाली. ११ एप्रिल रोजी केलेली रॅपिड अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि सुरु झाला कोरोना सोबतचा १५ दिवसांचा वनवास... एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती तर दुसरीकडे मृत्यूचे तांडव चालू होतं. अशा नकारात्मकतेच्या गर्द छायेत सकारात्मक राहणं हे एक आव्हानच होतं माझ्यासाठी. आणि आता सुरु झाली १५ दिवसांच्या वनवासाची कहाणी .

सर्वात आधी मला ‘आनंद’ सिनेमातल्या राजेश खन्ना साहेबांच्या डायलॉगची आठवण झाली-

‘बाबूमोशाय, ज़िन्दगी और मौत उपरवाले के हाथ है ! जहाँपनाह उससे न तोह आप बदल सकते हैं न मैं, हम सब तो रंगमंच की कठपुतलियाँ हैं. जिनकी डोर उपरवाले की उंगलियों में बंधी हैं ! कब, कौन, कैसे उठेगा यह कोई नहीं बता सकता है ! हा, हा, हा.’

- म्हणून मरणाचा विचार न करता, मन प्रसन्न ठेवण्यासाठी भरपूर सिनेमे, वेबसीरिज,माहितीपट पाहिले. कॉमेडी शोज, स्टॅंड अप कॉमेडी बघून सतत स्वतःचं मनोरंजन करत होतो. महत्वाचं म्हणजे यात कुणाचा व्यत्यय नव्हता. नाही तर आपलं ‘आवाज कमी कर, पाण्याची टाकी भरली का बघ, दळण घेऊन ये...’ हेच चालू असतं.

या १५ दिवसांत बातम्या, सोशल मीडिया, वर्तमानपत्र सर्वांना कात्री लावली. पूर्णवेळ आराम एके आराम फक्त एवढंच केलं. कधी कधी तर आरामानेच थकवा येईल असं वाटायचं.

सुरुवातीचे ४-५ दिवस जरा कठीण गेले. अशक्तपणा आणि ताप असल्याकारणाने चक्कर आल्यासारखं वाटायचं. औषधं भरपूर असल्यामुळे खाती घेतली, की काही वेळातच झोप यायची. पण नंतर हळूहळू बरं वाटायला लागलं .

वाफ घ्या, योगा करा, प्राणायाम करा, गरम पाणी प्या... घरचे दिवसभर ह्या गोष्टींचा भडीमार करायचे. परंतु यातल्या कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊ दिला नाही. सर्व काही योग्य प्रमाणात ठेवलं. आणि खरं सांगू का? अशक्तपणामुळे एवढं गळून गेल्यासारखं वाटायचं की बसायची इच्छा होत नव्हती. योगा, प्राणायाम वगैरे ते तर दूरच राहिले. दुसऱ्याला सांगायला बरं वाटतं की हे कर ते कर, आपल्यावर वेळ आली की कळतं सगळं.

- याउलट माझ्याकडे माऊथ ऑर्गन होता तर बसल्या बसल्या मी तो वाजवायचो त्यामुळे दीर्घ श्वसनाचा व्यायाम कदाचित नकळत झाला असेल. अनावश्यक सिटीस्कॅन केला नाही. डॉक्टरांनी सांगितलेले नियम काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न केला.

माझ्या आईला पाककलेची खूप हौस. रोज नवीन काही तरी खायला द्यायची पण काही चव नव्हती तोंडाला. रोज फलाहार असायचा. जेवणात अंडी, पालेभाज्या, पराठे, शेवग्याचं वरण असे जिन्नस खात होतो. रात्री हळदीचं दूध !

संध्याकाळ झाली की कॉफीचा कप घेऊन गच्चीवर थंड हवेत एक तास येरझरा मारणे, निवडक मित्रांसोबत फोनवर गप्पा मारणे हा माझा दिनक्रम ठरलेला होता. शाहरुख खान, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांचे टॉक शोज, मुलाखती पहिल्या. यूट्यूबवर शिमला, मनाली, कोकणाची travel vlogs बघितले. एकंदरीत हा काळ मी जगलो असे म्हणायला काही हरकत नाही.

बघता बघता १५ दिवसांचा वनवास कधी संपला कळला देखील नाही. या दिवसांत एक जाणवलं की एकांतात माणसाची productivity वाढते. स्वतःला वेळ देता आला. काही प्रश्नांची उत्तरं नकळत मिळाली. या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःला कुठे तरी हरवून बसलो आहोत. या दिवसात स्वतःसोबत घालवलेला वेळ कायम माझ्या स्मरणात राहील. आणि हो, सकारात्मक राहण्याकरिता बाह्य घटकांची काहीही गरज नसते. आपल्या स्वतःला ते सहज शक्य आहे फक्त गरज आहे ती इच्छाशक्तीची. शेवटी १ मे महाराष्ट्र दिनी माझा गृहप्रवेश झाला. जाता जाता इतकंच सांगतो, " अगर end में सबकुछ ठीक ना हो, तो picture अभी बाकी है मेरे दोस्त".

abhishekdhatrak000@gmail.com