शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कसा पाहता येईल जेतेपदासाठीचा ऐतिहासिक सामना?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

…पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 06:05 IST

खरं सांगतो, अशक्तपणा खूप होता तरीही गृह विलगीकरणाची ते पंधरा दिवस मी मनमुराद जगून घेतले !

ठळक मुद्देया धावपळीच्या जीवनात आपण स्वतःला कुठे तरी हरवून बसलो आहोत. या दिवसात स्वतःसोबत घालवलेला वेळ कायम माझ्या स्मरणात राहील.

अभिषेकधात्रक, नांदेड

एप्रिलचा महिना. प्रचंड उकाडा जाणवत होता म्हणून कूलर दुरुस्तीचे सामान आणायला बाजारात गेलो आणि सामानासोबत कोरोनाला घेऊन आलो. त्याच रात्री ताप आणि कणकण जाणवायला सुरुवात झाली. ११ एप्रिल रोजी केलेली रॅपिड अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि सुरु झाला कोरोना सोबतचा १५ दिवसांचा वनवास... एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती तर दुसरीकडे मृत्यूचे तांडव चालू होतं. अशा नकारात्मकतेच्या गर्द छायेत सकारात्मक राहणं हे एक आव्हानच होतं माझ्यासाठी. आणि आता सुरु झाली १५ दिवसांच्या वनवासाची कहाणी .

सर्वात आधी मला ‘आनंद’ सिनेमातल्या राजेश खन्ना साहेबांच्या डायलॉगची आठवण झाली-

‘बाबूमोशाय, ज़िन्दगी और मौत उपरवाले के हाथ है ! जहाँपनाह उससे न तोह आप बदल सकते हैं न मैं, हम सब तो रंगमंच की कठपुतलियाँ हैं. जिनकी डोर उपरवाले की उंगलियों में बंधी हैं ! कब, कौन, कैसे उठेगा यह कोई नहीं बता सकता है ! हा, हा, हा.’

- म्हणून मरणाचा विचार न करता, मन प्रसन्न ठेवण्यासाठी भरपूर सिनेमे, वेबसीरिज,माहितीपट पाहिले. कॉमेडी शोज, स्टॅंड अप कॉमेडी बघून सतत स्वतःचं मनोरंजन करत होतो. महत्वाचं म्हणजे यात कुणाचा व्यत्यय नव्हता. नाही तर आपलं ‘आवाज कमी कर, पाण्याची टाकी भरली का बघ, दळण घेऊन ये...’ हेच चालू असतं.

या १५ दिवसांत बातम्या, सोशल मीडिया, वर्तमानपत्र सर्वांना कात्री लावली. पूर्णवेळ आराम एके आराम फक्त एवढंच केलं. कधी कधी तर आरामानेच थकवा येईल असं वाटायचं.

सुरुवातीचे ४-५ दिवस जरा कठीण गेले. अशक्तपणा आणि ताप असल्याकारणाने चक्कर आल्यासारखं वाटायचं. औषधं भरपूर असल्यामुळे खाती घेतली, की काही वेळातच झोप यायची. पण नंतर हळूहळू बरं वाटायला लागलं .

वाफ घ्या, योगा करा, प्राणायाम करा, गरम पाणी प्या... घरचे दिवसभर ह्या गोष्टींचा भडीमार करायचे. परंतु यातल्या कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊ दिला नाही. सर्व काही योग्य प्रमाणात ठेवलं. आणि खरं सांगू का? अशक्तपणामुळे एवढं गळून गेल्यासारखं वाटायचं की बसायची इच्छा होत नव्हती. योगा, प्राणायाम वगैरे ते तर दूरच राहिले. दुसऱ्याला सांगायला बरं वाटतं की हे कर ते कर, आपल्यावर वेळ आली की कळतं सगळं.

- याउलट माझ्याकडे माऊथ ऑर्गन होता तर बसल्या बसल्या मी तो वाजवायचो त्यामुळे दीर्घ श्वसनाचा व्यायाम कदाचित नकळत झाला असेल. अनावश्यक सिटीस्कॅन केला नाही. डॉक्टरांनी सांगितलेले नियम काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न केला.

माझ्या आईला पाककलेची खूप हौस. रोज नवीन काही तरी खायला द्यायची पण काही चव नव्हती तोंडाला. रोज फलाहार असायचा. जेवणात अंडी, पालेभाज्या, पराठे, शेवग्याचं वरण असे जिन्नस खात होतो. रात्री हळदीचं दूध !

संध्याकाळ झाली की कॉफीचा कप घेऊन गच्चीवर थंड हवेत एक तास येरझरा मारणे, निवडक मित्रांसोबत फोनवर गप्पा मारणे हा माझा दिनक्रम ठरलेला होता. शाहरुख खान, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांचे टॉक शोज, मुलाखती पहिल्या. यूट्यूबवर शिमला, मनाली, कोकणाची travel vlogs बघितले. एकंदरीत हा काळ मी जगलो असे म्हणायला काही हरकत नाही.

बघता बघता १५ दिवसांचा वनवास कधी संपला कळला देखील नाही. या दिवसांत एक जाणवलं की एकांतात माणसाची productivity वाढते. स्वतःला वेळ देता आला. काही प्रश्नांची उत्तरं नकळत मिळाली. या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःला कुठे तरी हरवून बसलो आहोत. या दिवसात स्वतःसोबत घालवलेला वेळ कायम माझ्या स्मरणात राहील. आणि हो, सकारात्मक राहण्याकरिता बाह्य घटकांची काहीही गरज नसते. आपल्या स्वतःला ते सहज शक्य आहे फक्त गरज आहे ती इच्छाशक्तीची. शेवटी १ मे महाराष्ट्र दिनी माझा गृहप्रवेश झाला. जाता जाता इतकंच सांगतो, " अगर end में सबकुछ ठीक ना हो, तो picture अभी बाकी है मेरे दोस्त".

abhishekdhatrak000@gmail.com