शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
5
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
6
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
7
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
9
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
10
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
11
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
12
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
13
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
14
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
15
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
16
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
17
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
18
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
20
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार

भाषाही हिरवीगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 09:01 IST

बळ बोलीचे : जमाना पार बदलला. सवयी बदलल्या. खाणे बदलले. ‘जीभ जागेवरच; पण चवी मात्र प्रचंड बदलल्या...’ ‘गावरान’ हा शब्द पाटी लावून, ओरडूनच सांगण्याचे दिवस आता जीव जाळत राहतात. 

- प्रा. केशव सखाराम देशमुख

ग्रामीण माणसांची सौष्ठवता आणि पुष्टता दूधदुभत्यामुळं आणि शेतात पिकणाऱ्या बहुधान्य तसेच बहुरानमेव्यामुळं सबळ टिकून होती. आज कालमान बदललं आणि चवीसह जगण्यातही भेसळ होऊन बसली. सोन्याचा धूर निघणारे दिवस मावळले. दुष्काळानं तर शेतीवर आघात सुरू केले. संकटांच्या मालिकांनी गाव आणि तेथील माणूस खऱ्या अर्थानं ‘बेजार’ झाला!

म्हणजे असे की, जे मातीखालून येते, पिकते ते खाण्याची सुंदर संस्कृती जगाला शेतांनी दिली हे खरे! आता मॉल हीच शेती; पण गाव-शहरात भेदाची रेघ ओढणारी. पैशाचे पाकीट किंवा बँकांची कार्डे मशीनच्या तोंडात खुपसून पाहिजे ते मॉलमध्ये आता तयार! आता, ‘शेतात पिकण्याची वाट कोण पाहतो?’ जमाना पार बदलला. सवयी बदलल्या. खाणे बदलले. ‘जीभ जागेवरच; पण चवी मात्र प्रचंड बदलल्या...’ ‘गावरान’ हा शब्द पाटी लावून, ओरडूनच सांगण्याचे दिवस आता जीव जाळत राहतात. तेव्हा सगळी रानफळं आणि शेतभाज्या गावात मिळत. आजपण मिळतात; पण त्यांचा ‘बाजार’ होऊन बसला. पिढीपालट झाला. मात्र, ‘ते’ भाज्यांचं चैतन्य उरलं नाही.

पिकांतच एक ‘तास’ (रांग) भाज्यांची ठेवण्याची शेती-रीत होती. या रांगेला ‘पाटा’ म्हणत. याला कोथिंबीर म्हणजेच ‘संबार’ असायचा. शेंदाडाचे ‘येल’ भुईला धरून, पसरून असायचे. येलाला ‘वाळकं’ लगडून यायचं. वाळकांच्या पाठीवर हिरव्या-काळपट-पिवळ्या पट्ट्यांचं सौंदर्य असतं. जणू वाळकांची पिलं म्हणजे छोटी वाळकंच जशी. त्यांना ‘शेलन्या’ म्हणतात. या फळांच्या बिया टचटचीत जाणवतातच. याच ‘पाट्याला’ (तासाला, रांगेला) भेंडीची झाडे असायची. त्यांना ‘बोंडं/भेडरं’ असापण शब्द आहे. मधे-मधे पाट्यात ज्वारीचे धांडे असत. या धांड्यांवर चवळीचे वेल वर चढत. वेलाला चवळीच्या शेंगाचे घोष असतात. त्याला ‘बरबटी’ असं ध्वन्यानुकारी नाव आहे.

कलिंगडाला - देवडांगर किंवा कलांगडू म्हणतात. कलांगडांचे वेल गावात, झोपड्यांवर किंवा जनावरांच्या गोठ्यांच्या वर सगळं घर व्यापून गडद सावलीसारखा हा ‘हंगामी’ वेल घरावर ‘गार सावली’ स्थापित करीत असायचा. फळभाज्या घरी आणून त्या ‘पत्रावर’ (टीन) उन्हात चिरून ‘फोडी’ करून वाळू घालत. म्हणजे हे ‘ड्रायफ्रूट’ पुढं सालभर भाजी म्हणून वापरत. 

एकेका फळाचे, पदार्थाचे, भाजीचे तेच नाव जनभाषेत येताना अधिक ‘चवदार’ होऊन येते. जसे- भोयमुंग, आल्लू, बैंगन, कलांगडू, तमाटे, कोथमीर, संबार, बोडं, वाळकं, शेन्न्या, कºहाळू, ‘धावड्या’ (म्हणजे- काळे तीळ), जांब (पेरू), हरभऱ्याच्या हिरव्या पानांची भाजी वा चटणी (म्हणजे ‘घोळाना’) किती शब्दही छान; घोळानाही चवदार. हा पदार्थच आता दुर्मिळ होऊ पाहत आहे! शेंगांमध्येपण पुष्कळ भाज्यांची गर्दी आहे. त्यात ‘आवऱ्याच्या शेंगा’ ही एक शेंगवर्गीय भाजी आहे.

‘रताळू, गाजरं’ या मातीखालच्या कंदवर्गीय फळभाज्या आहेत. त्या टिकून आहेत अजून. ‘तरोठा’, ‘कुरडू’, ‘घोळ’ अशा काही रानभाज्या म्हणजे मजा!! पण फळभाज्या चिरणे, फोडी करणे, वाळू घालणे हा एक सुंदर कार्यक्रम असायचा, तो बंदच झाला आहे.  जंगल हिंडले म्हणजे किंवा माळरान तुडवले म्हणजे बेहद्द चव असणारी फळं खायला मिळत. त्यात, टेंभुरनं, बिब्बे, धामनं, बोरं, चिचा, चारं, कारं, वाघाटं, करटुलं, हादग्याची फुलं, कामुन्या, जांभुळनं, रामफळं-सीताफळं यासारखी किती-किती फळं आणि भाज्या चार-सहा पाऊस कोसळले की मिळत. यातल्या अनेक फळांची आता बेरीज कमी आणि वजाबाकी मात्र जास्त झाली आहे. शिवाय, ‘झाडांवर चढून, लपून, वरून पडून फळं मिळवत ते खाण्याची जी मजा कूछ और होती; ती सरली...’

तात्पर्य, या फळांनी, या भाज्यांनी आपला आनंदही हिरवा, टवटवीत, फ्रेश, सदानंदी ठेवलेला होता. ते मिळविण्यात एक खुशी होती आणि खाण्यात होते सुख. आता काळ फिरला आहे. बाजाराला भाव आला आहे. जे शेतात पिकते आणि विकते ते रसायनांनी घेरले आहे. हिरव्यागार भाज्या दिसतात; पण त्यातून ‘संशय’ फिरतो. रानभाज्यांची, रानफळांची ही अशी चव चाखता येत नाही. फक्त कागदांवर लिहिता येते...!

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिकmarathiमराठी