शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

...एकावेळी फक्त एकच पाऊल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 06:05 IST

कोविड होऊन गेल्यावर आपल्या शरीराचा अंदाज घेत, डॉक्टरांशी बोलूनच हळूहळू रुटीन बसवायला हवं. मला काही होत नाही हा आत्मविश्वास फाजील आहे.

ठळक मुद्देकोविडमधून व्यवस्थित बरं होता येतं. पूर्वीसारखा व्यायाम, कामकाज सगळं सुरू करता येतं. फक्त गाडी रुळावर यायला वेळ लागतो आणि तो वेळ आपण स्वतःला दिला पाहिजे.

- मुक्ता चैतन्य

कोविड झाल्यावर जशी आपण स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे तसंच कोविड पश्चातही काळजी घ्यायला हवी. कोविडनंतरचे त्रास मानसिक असतात, तसे शारीरिकही असतात. थकवा हा यातला महत्त्वाचा घटक आहे.

मीही यातून गेले. कोविडनंतर प्रचंड थकवा होताच. मानसिक ताणही काही प्रमाणात होताच, नाकारून चालणार नाही. थोडंसं काम केलं तरी दमायला व्हायचं. चालायला/ पळायला/ सायकलिंगला जाणं शक्य नव्हतं. घरकाम किंवा थोड्याशा ऑफिस कामानेही थकून जायला व्हायचं. चिडचिड होत होती. पण, त्याचा उपयोग नाही हेही माहीत होतं.

मी सगळं सबुरीनं घ्यायचं ठरवलं. बेबी स्टेप्स. ट्रेकमध्ये जेव्हा सलग खूप मैल चालायचं असतं तेव्हा एक वेळ येते की जाम थकून जायला होतं, आता एकही पाऊल टाकायला नको असं वाटायला लागतं. अशावेळी स्वतःला सतत सांगत राहायचं, बेबी स्टेप्स! एकावेळी एक पाऊल.. असं करत करत आपल्या मुक्कामाचं ठिकाण कधी येतं कळतही नाही. हीच स्ट्रॅटेजी मी कोविडनंतर अवलंबली. एकावेळी एक गोष्ट. एरवी मला एकावेळी अनेक गोष्टी करत राहण्याची सवय आहे. पण, कोविडनंतर मी स्वतःला बजावलं होतं की मल्टी टास्किंग करायचं नाही. कारण कोविडने ऊर्जा शोषून घेतली होती. त्यामुळे एकावेळी एक काम. दिवसभरात दोनच कामं झाली तरी हरकत नाही, त्याचा गिल्ट येऊ द्यायचा नाही हेही स्वतःला सांगितलं. आपण एका नव्या आजारातून बाहेर आलेलो आहोत, आजारापश्चात आपलं शरीर कसं वागेल आपल्याला माहीत नाही त्यामुळे कशाचीही घाई करायची नाही हे पक्कं ठरवलेलं होतं.

सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे माझा फिटनेस परत कमावणं. कोविडने सगळी ताकद काढून घेतली होती. गेलेली एनर्जी परत मिळवायला हवीच होती. घराखाली गल्लीतच थोडं चालायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी भयानक थकायला झालं, पण म्हटलं ठिके, जमेल हळूहळू...

मोठ्या कष्टानं कमावलेला स्टॅमिना पार शून्यावर येतो तेव्हा जाम चिडचिड होते. त्यानंतर हतबल किंवा निराश हे दोन्ही वाटून देऊन चालणार नव्हतं. चालणं बरेच दिवस एखाद-दोन किलोमीटर पलीकडे नव्हतं. जेव्हा चालून विशेष दमत नाहीयोत हे लक्षात आलं त्यानंतर तीन-चार आठवड्यांत हळूहळू घरी व्यायाम सुरू केले. धिम्या गतीने मी बदल करीत होते. एक एक दिवस व्यायाम वाढवत नेला. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं सुरू होतं. योगासनं, कार्डिओ व्यायाम, प्राणायाम आणि श्वसनाचे व्यायामही सुरू केले... हळूहळू लय सापडली. या सगळ्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मनावरचा ताण कमी होत गेला. अस्वस्थता कमी झाली. व्यवस्थित झोप यायला लागली.

हे सगळं लिहिण्याचं कारण कोविड पश्चातच्या रिकव्हरीकडे अजिबात दुर्लक्ष करून चालत नाही. अनेक लोक डॉक्टरांनी दिलेली औषधं बंद करतात. आता काही होत नाही म्हणत मनमानी करायला लागतात. एकदम खूप चालायला/ पळायला/ व्यायाम करायला लागतात. एकदम प्रचंड घरकाम करतात. थोडक्यात खूप दगदग सुरू करतात. १५ दिवस एका खोलीत काढल्यावर आधीच कंटाळा आलेला असतो त्यामुळे लवकर रुटीन सुरू करायची घाई झालेली असते. आपण पूर्वीसारखेच आहोत हे स्वतःला सांगायचीही घाई असतेच. आपल्या शरीराचा अंदाज घेत, डॉक्टरांशी बोलूनच हळूहळू रुटीन बसवायला हवं. औषधं डॉक्टर सांगतील तोवर घेतलीच पाहिजेत. मला काही होत नाही हा आत्मविश्वास फाजील आहे. हा आजार नवा आहे, तो प्रत्येकाच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीने वागतो, होणारे परिणाम वेगळे आहेत, अशावेळी निष्काळजीपणा करून चालणारच नाही.

मी कोविडनंतर धिम्या गतीने सुरुवात केली आणि आता मी माझा पूर्वीचा वेग पकडला आहे, तरीही मी अजूनही ‘बेबी स्टेप्स’ असंच स्वतःला सतत सांगत असते. कोविडमधून व्यवस्थित बरं होता येतं. पूर्वीसारखा व्यायाम, कामकाज सगळं सुरू करता येतं. फक्त गाडी रुळावर यायला वेळ लागतो आणि तो वेळ आपण स्वतःला दिला पाहिजे.

तेव्हा कोविडकाळात जशी काळजी घेतलीत तशीच नंतरही घ्या. स्वतःला जपा. कोविड होऊन गेलाय, आपल्यात अँटिबॉडीज् आहेत म्हणून मास्क न घालणं असले प्रकार करू नका. कोविड परत होऊ शकतोच. पण एकच लक्षात असू द्या, कोविड बरा होतो आणि आपण पूर्वीसारखे ठणठणीतही होतो.