शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
4
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
5
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
6
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
7
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
8
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
9
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
10
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
12
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
13
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
15
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
16
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
17
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
19
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
20
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले

माझ्यासारख्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 09:05 IST

हरवलेली माणसं : मातीशी चाळा करीत एकाकी बसलेला, पांढुरक्या दाढीच्या वाढलेल्या जटांतून उमटून पडणारा मळाचा काळपट डाग त्याच्या चेहऱ्याला अधिकच भेसूर बनवत होता. अंगावर कपड्याचा तुकडाही नसताना त्याला कशाचीही फिकीर नव्हती. 

- दादासाहेब श्रीकिसन थेटे

एक कप चहा, एक विडी ही त्याची गरज आणि त्याच गरजेपोटी भानू एका चहाच्या टपरीवरून, दुसऱ्या टपरीवर दिवसभर येरझाऱ्या मारायचा. दररोज दिसणारे चेहरे त्याला ओळखीचे वाटायचे. या चेहऱ्यांनाही तो चांगलाच माहीत होता. तरीही ओळख दाखवून प्रेमाचे दान देणारे चेहरे मात्र फार क्वचितच असायचे. अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण न करणारा सुजाण समाज या मनोरुग्णांना (माणसांना) माणसातून वारंवार बहिष्कृत करतोय हा अनुभव भानूच्या वेळीही मी अनुभवला. त्यांची विवंचना जर शहाण्या समजणाऱ्या समाजाला जाणवत नसेल, तर समाजशील म्हणवणारा माणूस किती अप्पलपोटी आणि आत्मसंतुष्टी झाला याचा प्रत्यय या बेवारस मानवी देहाकडे पाहून अनुभवायला येत होता. या मूळ गरजांपेक्षाही प्रेम आणि आपुलकी हीच त्याच्या जगण्याची गरज होती. हे सहवासातून आणि त्याला केलेल्या मायेच्या एका स्पशार्तून आम्हाला जाणवले होते.

‘भानू’ या हाकेला प्रेमाचा ओलावा देत पुकारले की, त्याची नजरा सैरभर होत होती. आजवर मनोरोगाचा शाप मिळाल्यापासून आपला विटाळ पाळणारा समाज आज आपल्याला मोटार गाडीत शेजारी बसवून कुठेतरी घेऊन जातोय या एका जाणिवेने तो बहुधा मनातून पाणावून गेला असावा. त्याला अंघोळ घालताना त्याच्या किळसवाण्या शरीरावर मायेचा फिरणारा हात त्याच्या जगण्यात अनामिक सुगंध भरत होता. वाढलेली नखे मोठ्या काळजीवाहूपणाने कापणारी समाजभान पोरं त्याला जणू जुन्या आठवाणीतच घेऊन जात होती. सांगितलेल्या सूचनेनुसार त्याने आपल्या हालचाली केल्या. त्याच्या अंगा-अंगातून घाणीचा दुर्गंध साबण, शाम्पूच्या फेसाबरोबर आणि माणुसकीच्या स्पर्शाने नाहीसा झाला होता. अंगावर ढीगभर साचलेला मळ पाण्याबरोबर धुऊन गेला होता. तशी भानूला तरतरी जाणवली होती. त्याचा चेहरा खुलला होता. जी गावातली पोरं आजवर त्याची किळस करीत होती तीच पोरं आता त्याला नवे कपडे आणत होती, तर कुणी टॉवेल, कुणी नेल कटर, तर कुणी चपला आणून देत होती...! गावातल्या प्रत्येक पोरात भानूमुळे माणुसकीचे समाजभान भिनल्यागत प्रत्येक जण भानूसाठी तळमळ करीत होता.

आपला भानू माणसागत दिसू लागला हे पाहून गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ज्या गावातल्या लोकांनी आजवर नाकारले त्याच भानूला पाहायला अख्खा गाव गोळा झाला होता. शोधला तर देवही सापडतो, तसाच आपल्यातलाच हरवलेला एक माणूस त्यादिवशी सापडल्यामुळे गावकरी जल्लोष करीत होते. एखाद्या नवविवाहित मुलीला बिदाई करते वेळेस जसा सारा गाव भावविवश होऊन तिला सासरी पाठवतो, तशीच भानूला बिदाई करायला सगळा गाव जमला होता. भानूच्या बदलत्या रूपड्यासोबत सेल्फी काढणारी गावातली मुले जणू माणसात माणूस शोधण्याची कला या भानूकडे पाहून अनुभवत होती.

यानंतर कोणत्याही समाजभान मोहिमेचा आम्हीही भाग होऊ, असे उत्साहाने बोलणारी तिथली पोरं एका कृतीतून एवढी प्रेरित झालेली पाहून मी मनातून ऊर्जित झालो होतो. हरवलेल्या समाजव्यवस्थेत हे माणुसकीचे समाजभान जागृत होताना पाहून आणि आणखी एक बेघर मानसाच्या डोक्यावर छत उभे करताना जिंदगी वसूल झाल्याचा परमोच्च आनंद, आज मी पुन्हा अनुभवत होतो. आता भानू बरा होऊन त्याच्या घरी परत येतोय. अगदी माणसासारखा होऊन!  आनंद दिल्याने वाढतो. आयुष्य वाटल्याने वाढते. आज जेवढे दिले तेवढेच मला परत मिळत होते. आज परत एक माणूस जन्माला घातल्याचा आनंद होत होता. (लेखक समाजभान टीमचे संस्थापक  आहेत)  

 ( Sweetdada11@gmail.com )

टॅग्स :SocialसामाजिकAurangabadऔरंगाबाद