शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 10:26 IST

Online Gaming World : ऑनलाइन गेमिंगवर नियंत्रण आणणारे विधेयक संसदेच्या नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात संमत करण्यात आले. त्यामुळे गेल्या काही वर्षांत भारतामध्ये फोफावलेल्या ऑनलाइन गेमिंग इंडस्ट्रीला चाप बसणार आहे, परंतु गेमिंगच्या जाळ्यात अडकलेल्या युवा पिढीच्या आर्थिक, सामाजिक आणि मानसिक स्तरावर या विधेयकाचे काय परिणाम होणार याचा घेतलेला हा मागोवा...    

- ओंकार गंधे(सायबर सुरक्षातज्ज्ञ)

 भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन गेमिंग इंडस्ट्रीचा झपाट्याने विकास झाला आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या सहज उपलब्धतेमुळे आणि युवकांमध्ये वाढलेल्या गेमिंगच्या आकर्षणामुळे ही इंडस्ट्री प्रचंड वेगाने फोफावली आहे. सुरुवातीला ‘गेमिंग’ म्हणजे  एक करमणुकीची गोष्ट वाटत होती. मात्र जसजसे ‘पैसे जिंका’, ‘झटपट करोडपती व्हा’ असे संदेश देणारे गेमिंग ॲप्स व प्लॅटफॉर्म्स आले, तसतसे या क्षेत्राचे स्वरूप बदलू लागले आणि नैतिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाले.

संसदेमध्ये मांडण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ४५ कोटी भारतीय नागरिक मनी गेम्सच्या आहारी गेले होते आणि यामुळे त्यांचे ४५ हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले. या गेम्समुळे अनेक युवकांनी कर्ज घेतले, नोकऱ्या सोडल्या आणि काहींनी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णयही घेतले. विशेषतः तरुण पिढी ‘अजून एकदा खेळला तर जिंकू’ या भ्रमात अडकत गेली. तरुणांचे फक्त आर्थिक नुकसान नव्हे, तर त्यांच्या मानसिक आरोग्याचाही गंभीर प्रश्न बनला. याचाच गांभीर्याने  विचार करून  २१ ऑगस्ट रोजी संसदेमध्ये ‘ऑनलाइन गेमिंग प्रोमोशन आणि रेग्युलेशन विधेयक २०२५’ मंजूर झाले. भारताच्या डिजिटल गेमिंग क्षेत्राला एक सुरक्षित, जबाबदार आणि नैतिक चौकट देणे हाच या विधेयकाचा उद्देश आहे. या विधेयकात मनी गेम्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जे गेम्स फक्त पैसे जिंकण्याच्या संकल्पनेवर आधारित असतात, त्यांचे उत्पादन, प्रसार, प्रचार यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. या गेम्सचा प्रचार करणाऱ्या सेलेब्रिटी व इन्फ्लुएन्सर्सना ५० लाखांपर्यंतचा दंड आणि २ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. पुन्हा त्या चुकीची पुनरावृत्ती केल्यास शिक्षा दुप्पट होणार आहे.

ई-स्पोर्ट्स व स्किल-बेस्ड गेम्सबाबत अफवा आणि वस्तुस्थिती- ऑनलाइन गेमिंगला चाप लावणाऱ्या विधेयकाच्या घोषणेनंतर अनेक माध्यमांनी अफवा पसरवल्या की सर्व प्रकारचे गेमिंग, अगदी ई-स्पोर्ट्स आणि शैक्षणिक गेम्ससुद्धा बंद होणार आहेत.-मात्र, यामध्ये अजिबात तथ्य नाही. प्रत्यक्षात या विधेयकामुळे कौशल्याधारित, स्पर्धात्मक, शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक गेम्सना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. मंत्रालयामार्फत ई-स्पोर्ट्ससाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे स्पर्धात्मक गेमिंग क्षेत्राला अधिक प्रोत्साहन मिळेल. 

या कायद्यामुळे काय फायदा होईल ?      सर्वसामान्य नागरिक आणि विशेषतः तरुण पिढी फसव्या गेम्सपासून सुरक्षित राहील. मानसिक आरोग्य सुधारेल, आर्थिक नुकसान टळेल. अनेक मनी गेम्सच्या माध्यमातून काळा पैसा अधिकृत करण्याचे उद्योग सुरू होते. या विधेयकामुळे अशा गैरप्रकारांना आळा बसेल. गेमिंग रेग्युलेशन विधेयक २०२५ हे डिजिटल भारताच्या भविष्यासाठी एक अत्यंत दूरदृष्टीपूर्ण आणि आवश्यक पाऊल आहे. हे विधेयक केवळ फसव्या गेम्सवर बंदी घालत नाही, तर एक सकारात्मक डिजिटल गेमिंग संस्कृती घडवण्याचा मार्गही मोकळा करते. यामुळे कौशल्याधारित गेमिंगला वाव मिळण्याबरोबरच गैरफायदा घेणाऱ्या कंपन्यांना चाप बसणार आहे.

नियमांचाच ‘गेम’ झाला तर...सरकारने डिजिटल स्वातंत्र्यावर बंधने घातली आहेत. पण जेव्हा प्रश्न समाजाच्या सुरक्षिततेचा, युवकांच्या भवितव्याचा आणि आर्थिक स्थैर्याचा असतो, तेव्हा सरकारचा हस्तक्षेप अपरिहार्य आणि आवश्यक असतो. परंतु, अंमलबजावणी प्रभावी नसेल तर हे नियम कागदावरच मर्यादित राहतील. 

टॅग्स :onlineऑनलाइनGame Addictionव्हिडिओ गेम व्यसन