शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
3
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
4
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
5
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
7
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
8
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
9
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
10
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
11
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
12
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
13
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
14
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
15
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
16
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
17
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
18
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
19
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
20
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट

इसिस : भारताच्या उंबरठय़ावर उभे आहे दहशतीचे सावट

By admin | Updated: August 22, 2015 19:08 IST

नरेंद्र मोदींच्या युएई दौ:यात मुत्सद्देगिरी पणाला लावून भारताने पाकिस्तानला दम भरला आणि ‘इसिस’च्या भारत-प्रवेशाची बिळे बुजवण्यासाठी पहिले पाऊल उचलले. या पार्श्वभूमीवर एका क्रूर दहशतवादी संघटनेच्या भयावह प्रसाराचा वेध

- पवन देशपांडे
 
हातात रायफल घेऊन काही जण एका मॉलमध्ये घुसतात.. अंदाधुंद गोळीबार करतात, अनेक जणांना ओलीस ठेवत सारी यंत्रणा वेठीस धरतात..
 
नेहमीचीच वर्दळ. लोक आपापल्या कामात व्यस्त असतात.. तेवढय़ात एक ट्रक, जीप अथवा कार येते, मोठ्ठा स्फोट होतो.. 
शंभराहून अधिक निष्पाप जीव मारले जातात..
 
..हात मागे बांधलेले आणि खाली मान घालून बसलेला एक माणूस. तोंडाला काळी पट्टी बांधून त्याच्याच बाजूला काळ्या कपडय़ातील एक व्यक्ती. खाली बसलेल्या माणसाच्या मानेवर ठेवलेला धारदार सुरा. क्षणात गळ्यावर सर्रकन सुरी फिरते. ‘जगाला हे कळावं’ म्हणून मुद्दाम चित्रित केलेला हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल केला जातो..
 
एका रांगेत उभ्या केलेल्या काही महिला. भोगवस्तू बनण्यास नकार दिल्यानं त्यांना ओळीनं गोळ्या घातल्या जातात.. 
 
कुठे घडत असतील अशा भयंकर घटना? का घेतले जात असतील असे निष्पाप बळी? 
- (सध्या तरी) हे ठिकाण आहे इराक आणि सीरिया. 
गेली कित्येक र्वष नरकयातना भोगतच हे दोन्ही देश सुखसमृद्धीची नवी पहाट उगवण्याची वाट पाहत आहेत. 
भारतापासून हे दोन्ही देश शेकडो मैल दूर असले तरी हा धोका आता भारताच्याही उंबरठय़ावर पाऊल ठेवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
हल्ल्यांची अशी क्रूर पद्धत वापरणारी ही संघटना आहे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया अर्थात इसिस. जगातली सध्याची सर्वात घातक, सर्वात क्रूर आणि सर्वात भयानक दहशतवादी संघटना.
ही संघटना आपलं जाळं भारतीय तरुणांवर टाकते आहे. गेल्या काही दिवसांतील घटनांवर नजर टाकली तर ते स्पष्ट होईल. 
गेल्यावर्षी कल्याणचे चार तरुण इराकमध्ये गेल्याची माहिती समोर आली. ते चौघेही इसिसच्या दहशतवाद्यांना सामील झाले होते. त्यातला एक जण भारतात परतला आणि आता पोलिसांच्या ताब्यात आहे. 
इसिसचा टि¦टर हँडलर बंगळुरूमधून जेरबंद झाला. तो बंगळुरूमध्ये बसून टि¦टरद्वारे लोकांना इसिसमध्ये सामील होण्यासाठी प्रेरित करायचा. पोलिसांना त्याचा ठिकाणा लागला आणि तो पकडला गेला. 
कल्याणच्या चौघांना इसिसमध्ये जाण्याची प्रेरणा देणा:या नवी मुंबईतील प्राध्यापकालाही पोलिसांनी अटक केली आहे. 
आताची ताजी घटना.. इसिसचा भारतातील प्रवक्ता बनण्यास निघालेल्या नवी मुंबईतील जुबेर खानला महाराष्ट्र एटीएसने दिल्लीत अटक केली. त्याचाही इराकला जाण्याचा प्लॅन होता.
काश्मीरमध्ये आतार्पयत आठ-दहा वेळा वेगवेगळ्या रॅलींमध्ये इसिसचे ङोंडे फडकले आहेत. गेल्या महिन्यात तर ‘सावधान, इस्लामिक स्टेट काश्मीरमध्ये येतेय’ असेही फलक काही तरुणांनी लावले होते. या तरुणांना पकडण्यासाठी पोलीस अजूनही धजावलेले नाहीत, कारण काश्मीरमधील परिस्थिती आणखी चिघळेल, अशी त्यांना भीती आहे. 
गुप्तचरांच्या माहितीनुसार सध्या 25 पेक्षा अधिक तरुण इसिसच्या संपर्कात आहेत. इसिसने भारतात मोठी फौज निर्माण करण्यासाठी मोहीमही हाती घेतली आहे. त्यासाठी भारतात त्यांचे दलाल कार्यरत आहेत आणि टि¦टरच्या माध्यमातून तरुणांना आपल्याकडे खेचण्यासाठी वेळोवेळी त्यांचं ब्रेनवॉशिंगही केलं जात आहे. आतार्पयत काहींना पकडण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना यश आलं असलं तरी ही फळी वाढत जातेय, हे वास्तव नाकारून चालणार नाही. त्यामुळे इसिसला रोखणं हे भारतासमोरील मोठं आव्हान झालं आहे
देशाच्या गृहसचिवांनी काही आठवडय़ांपूर्वी काही राज्यांतील पोलीसप्रमुखांची बैठक बोलावली होती. त्याचा अजेंडाही इसिस हाच होता. कारण काश्मीर, तेलंगणा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांत इसिसची मुळे घट्ट होत असल्याची भीती सुरक्षा यंत्रणांना आहे. त्यामुळेच टि¦टरच्या माध्यमातून इसिस ज्या भारतीय तरुणांना आपल्या क्रौर्यसेनेत सामील करून घेण्यासाठी ब्रेनवॉशिंग करण्याची शक्यता आहे अशा तरुणांवर नजर ठेवण्याचा आणि त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय गृहसचिवांनी तसे आदेशही दिले आहेत. 
इसिसचं आक्रमण इतकं सोपं आणि सहजपणो आटोक्यात येणारं नाहीच. गेल्या वर्षभरातील कारवाईनंतर अमेरिकेलाही आता ते पुरतं उमजलं आहे. इसिस हा राक्षस आहे. माणसं खात सुटलेला. त्यांच्या ङोंडय़ाप्रमाणंच जगावर आपली काळी छाया पसरवण्याच्या मनसुब्यांनी कत्तली करत सुटलेली ही दहशतवादी संघटना आहे. कलियुगातली राक्षससेना!
..आणि त्यांच्या अजेंडय़ावरचं भारत हे नवं सावज आहे !