शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध पूर्णपणे थांबलेच तर भारताला असेल मोठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 11:11 IST

Iran War : अमेरिका आणि इराण यांच्यात २ आठवड्यांसाठी युद्ध थांबविण्याचा निर्णय आर्थिक, सामाजिक आणि मानवीय दृष्टिकोनातून स्वागतार्ह आहेच. त्यातून भारताला काही लाभ होण्याची शक्यताही आहे. परंतु हे सर्व कायमचा युद्धविराम झाला तरच शक्य आहे. कारण या भविष्यातील संधी आहेत.

- डॉ. विनायक म. गोविलकर(चार्टर्ड अकाउंटंट)एकीकडे अमेरिका आणि इस्रायल तर दुसरीकडे इराण असे गेले सुमारे दीड महिना सुरू असलेल्या युद्धाने केवळ या तीन देशांचेच नव्हे तर युएई, इराक, सिरीया, लेबेनॉन आणि काही आखाती देश यांचे प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तेल आणि गॅस यांच्या पुरवठा साखळीत मोठा अडथळा निर्माण झाला. त्यांच्या किमती प्रचंड वाढल्या.

जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. डॉलर मजबूत होऊ लागला. गुंतवणूकदारांमध्ये सावधपणा आला. इंधनाच्या किमती वाढल्याने वस्तूंच्या किमतीत वाढ स्वाभाविकपणे होण्याची चिन्हे दिसू लागली. जगावर एक अनिश्चिततेचे सावट आले. या पार्श्वभूमीवर हे युद्ध दोन आठवड्यांसाठी थांबवण्यात आल्याची बातमी बुधवारी आली आणि एका अर्थाने संपूर्ण जगाने तात्पुरता का होईना सुटकेचा निःश्वास टाकला.

युद्धकाळात भारताने युद्धाच्या दोन्ही पक्षांशी राजनैतिक संबंध चांगले ठेवण्यात यश मिळविल्याने युद्धाचा गंभीर नकारात्मक परिणाम भारतावर झाल्याचे दिसले नाही. शेअर बाजाराचा निर्देशांक निश्चितच घसरला. काही प्रमाणात औद्योगिक उत्पादन घटले, निर्यात कमी झाली. काही वस्तूंची आयात होऊ शकली नाही. आता तात्पुरत्या युद्धविरामाचा तत्काळ परिणाम म्हणून शेअर बाजारात खरेदी वाढून निर्देशांकाने मोठी भरारी घेतली. उद्योग जगतात आशेचे वातावरण निर्माण झाले.

युद्धविराम तात्पुरती न राहता टिकला, म्हणजेच तो स्वल्पविराम न राहता पूर्णविराम झाला, तर भारतास काही संधी निश्चितच उपलब्ध होऊ शकतात. तेल आणि गॅसच्या आयातीसाठी भारताला डॉलर्स मोजावे लागतात. आता आयातीवरील खर्च कमी झाल्याने भारताची डॉलरची मागणी कमी होईल. दुसरीकडे युद्धाची भीती संपली तर विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास असल्याने त्यांची गुंतवणूक पुन्हा सुरू होईल आणि ती डॉलरमध्ये आल्याने विदेशी चलनाचा साठ वाढू शकेल. एकीकडे आयातीसाठी डॉलरचा बाह्य प्रवाह कमी आणि दुसरीकडे गुंतवणूकदारांकडून डॉलरची आवक यामुळे विदेशी चलन साठ्याची स्थिती सुधारून रुपयाची किंमत टिकून राहू शकेल.

भारताने संरक्षण सामुग्री उत्पादनात आघाडी घेतली  आहे आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली आहे. युद्धाच्या काळात इस्रायल, अमेरिका, इराण आणि अन्य काही देशांनी मोठ्या प्रमाणात युद्ध सामुग्री वापरली आहे. तसेच अजून पूर्ण शांतता प्रस्थापित झालेली नाही. त्यामुळे युद्ध सामुग्रीची गरज अद्याप संपलेली नाही. अशा वेळी भारताला आपली संरक्षण आयुधे विकण्याची संधी शोधता येऊ शकते.

इराण आणि काही आखाती देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा ध्वस्त झाल्या आहेत. विमानतळे, रेल्वे, रस्ते, तेल साठे इत्यादी. त्या देशांना त्यांचे पुनर्निर्माण करावे लागेल. भारताने आपली तांत्रिक प्रगती आणि क्षमता वेळोवेळी दाखवून दिलेली असल्याने या पुनर्निर्माण कार्यातील काही कामे भारतीय कंपन्यांना मिळविण्यासाठी प्रयत्न करता येतील.

परिस्थिती सुधारल्यास काय होईल?आता युद्धविरामातील एक महत्त्वाचे कलम आहे, ही सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली करणे. शिवाय युद्धविरामामुळे जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ७०–८० डॉलर या पातळीपर्यंत येऊ शकतील. याचा एकत्रित परिणाम म्हणून भारताचे आयात बिल कमी होऊ शकते आणि तेल व गॅसचा पुरवठा स्थिर राहू शकतो. तेलाच्या किमती कमी झाल्याने माल वाहतूक खर्च मर्यादेत राहील. जहाजांचे भाडे आणि विम्याची किंमत पूर्वपदावर येऊ शकते. त्यामुळे निर्यातीला मदत होईल. देशात महागाईची भीती उरणार नाही. रसायने, पेंट उद्योग, खते यांच्या किमती मर्यादेत राहून उत्पादनात वाढ होऊ शकते. कापड उद्योगाची ठप्प झालेली निर्यात पुन्हा उभारी घेऊ शकते.रुपया होईल मजबूत, पैसा येईल मायदेशीया पूर्वीच भारताने काही देशांबरोबर रुपयात व्यापार करण्यास सुरुवात केलेली आहे. उदा. रशियाकडून तेलाची खरेदी. आता अमेरिकेबद्दल साशंकता सुरू झाल्याने ब्रिक्स देश व इतर काही मित्र देश डॉलरला पर्यायी चलन शोधण्याच्या प्रयत्नाला गती देतील. तो पर्यंत भारत रुपयात आयात करता यावी यासाठी काही देशांबरोबर वाटाघाटी करू शकेल.उत्पादन खर्च मर्यादित, आयात खर्च कमी आणि निर्यातीला जास्त संधी यामुळे भारताचा जीडीपी वाढण्याची शक्यता निर्माण होईल. अनेक भारतीय सध्या आखाती देशात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. ते भारतात विदेशी चलनात पैसे पाठवत असतात. युद्धाला विराम मिळाल्यामुळे त्यांची नोकरी, उद्योग चालू राहतील आणि त्यामुळे त्यांच्याकडून भारतात पैसे येणेही सुरू राहील. 

भारतावर परिणाम काय?८५%  तेल आयात भारत आपल्या एकूण तेल वापराच्या करतो आहे.६०%  स्वयंपाकाच्या गॅससाठी भारत  आयातीवर अवलंबून आहे. ५०% औद्योगिक गॅस भारताला आयात करावा लागतो.  ८५% गॅस आयात भारतात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजाद्वारे होते. 

इराणने या सामुद्रधुनीतून जहाजे जाऊ देण्यावर निर्बंध घातले होते. शिवाय जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर  ११७ डॉलर प्रति बॅरल पर्यंत वर गेले होते. म्हणजे तेल आयातीसाठी वाहतुकीवर बंधन आणि तेलाच्या चढ्या अनिश्चित किमती यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम स्वाभाविक होता.

English
हिंदी सारांश
Web Title : India's Big Opportunity if War Ceases Completely: Analysis

Web Summary : Complete ceasefire offers India economic advantages: reduced import costs, increased foreign investment, stronger rupee. Defense exports and infrastructure projects in affected nations present further opportunities for growth.
टॅग्स :IranइराणUnited StatesअमेरिकाIndiaभारत