शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'अतिथी देवो भव’ हाच गाभा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 02:43 IST

नासीर शेख : जीएसटीचा निर्णय हॉटेल व्यवसायासाठी सकारात्मक

पुणे : भारतातील हॉटेल उद्योगामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कारण, ‘अतिथी देवो भव’ हा येथील हॉटेल संस्कृतीचा गाभा आहे. विविधतेत एकता हे सूत्र या व्यवसायातही पाहायला मिळते’, अशा शब्दांत पुण्यातील ‘द वेस्टिन’चे महाव्यवस्थापक नासीर शेख यांनी हॉटेल व्यवसायाचे चित्र उलगडले.

लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांची शेख यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी विविध विषयांसह ‘लोकमत’च्या महाराष्ट्र आणि पुण्यातील यशदायी वाटचालीबाबत चर्चा झाली. शेख म्हणाले, ‘जीएसटी लागू करण्याचा निर्णय हॉटेल व्यवसायासाठी सकारात्मक ठरला. जगभरात प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. उत्पादन, बँकिंग, आयटी क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्या पुण्यामध्ये येत असल्याने हॉटेल व्यवसायाला फायदा होतो आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आदरातिथ्य अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हॉटेलमध्ये ग्राहकांना मनापासून सोयीसुविधा पुरवल्या जातात. केवळ आलिशान इमारती ही हॉटेलची ओळख नसून तेथील आदरातिथ्य, ग्राहकांना सकारात्मक प्रतिसाद या बाबींना या व्यवसायात महत्त्व आहे. शेख म्हणाले, ‘‘पूर्वी आलिशान हॉटेलमध्ये जाणे हे केवळ उच्चभ्रू वर्गाला परवडणारे होते. मात्र, आता जीवनमान उंचावल्याने पंचतारांकित हॉटेल्स सामान्यांच्या आवाक्यात आली आहेत. हॉटेल्सनीही धोरणांमध्ये अनेक बदल केले आहेत. ‘बजेट टू लक्झरी’ हे सूत्र अवलंबले जात आहे. खास प्रसंग हॉटेलमध्ये जाऊन साजरे करण्याची संधी मिळते.’’हॉटेल व्यवसायात विविधतेत एकताहॉटेल व्यवसायिक, कर्मचारी ‘विविधतेत एकता’ या सूत्रावर विश्वास ठेवतात. हॉटेलमधील अधिकारी, कर्मचारी तसेच ग्राहक विविध प्रांतिक, भाषिक पार्श्वभूमीचे असतात. तरीही, संतुलित संस्कृती पाहायला मिळत असल्याने कोणताही भेदभाव केला जात नाही. हॉटेलमधील विविध पदांवर नेमणूक करताना कौशल्य, मेहनत, चिकाटी, विनय या गुणांचीच पारख केली जाते, असेही नासीर शेख यांनी अधोरेखित केले.

टॅग्स :Puneपुणे