शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

‘मनाच्या पंखाची’ भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 23:44 IST

हल्ली पुरोगामीत्वाचे पोवाडे गाणारी आमची जीवनशैली जिने आम्हाला कोठून कोठे आणून ठेवले हे सिंहावलोकन केल्यानंतरच कळते.

  • विद्या बनाफर

हल्ली पुरोगामीत्वाचे पोवाडे गाणारी आमची जीवनशैली जिने आम्हाला कोठून कोठे आणून ठेवले हे सिंहावलोकन केल्यानंतरच कळते. पूर्वी मर्यादित गरजा होत्या, मर्यादित इच्छा व अपेक्षा होत्या, अन् जोडलेली खूप माणसे होती, रक्ताची नाती दृढ होती. एकमेकांना हृदयात जागा होती. संयुक्त कुटुंबे होती. आज त्यांची जागा अमर्याद गरजा व इच्छा-अपेक्षांनी घेतली आहे. घरात आज चार माणसे, मोबाइल आठ, गाड्या, मोठा बंगला आहे. मुले पाळणाघरात, कुत्रे बंगल्यात आणि घरची कामे सर्व यंत्र करीत आहेत. आई-बाबा मुलांच्या वाट्याला क्वचितच येतात. आयुष्य उधळण्याची, धावण्याची स्पर्धा जणू सुरू आहे आणि आम्ही म्हणत आहोत की आम्ही जगतोय. शर्यतीमध्ये मागे पडला तो आत्मघात करीत आहे. कुणी शिक्षणात यशस्वी झालं नाही म्हणून तर कुणी कर्जबाजारी झालं म्हणून. अपयश पचवण्याची क्षमता आपल्यात उरलेली नाही. एखादी मुलगी प्रेमाला नकार देत असेल तर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून पुरुषार्थ मानला जात आहे. परीक्षेत यश मिळाले नाही म्हणून आत्महत्या तर कुणी वासनांध देह एक वर्षाच्या बालिकेवरसुद्धा बलात्कार करून आपल्या देहाची आग विझवण्यात धन्यता मानत आहे. कधी पालकांनी मागितले ते दिले नाही म्हणून तरुणाई आत्महत्येकडे वळत आहे. रोजच्या वर्तमानपत्रातून या घटना किरकोळ झाल्या आहेत. शासन-प्रशासन ही या घटनेची निंदा केली, समित्या बनविल्या, न्याय मिळेल यासारखी आश्वासने देऊन मोकळी होते व होळीची बोंब चार दिवस नंतर घटना जुनी होते. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपमुळे संवाद सुसंवाद संपुष्टात आले त्यांची जागा हताशपणा, निराशपणा, डिप्रेशनसारखे आजार अनेक मेंदूवर कब्जा करून घेत आहेत. त्यात शेतकरी आत्महत्या हा विदर्भातील संवेदनशील विषय विदर्भातीलच. कारंजा जवळ एक गाव आहे तेथे शेतकरी आत्महत्यामुळे झालेल्या दीडशे ते दोनशे विधवा आहेत. विदर्भातील शेतकरी आत्महत्यामुळे विदर्भाला विधवांचे वृंदावन म्हटले जाते. जेव्हा माणूस, व्यक्ती, स्त्री-पुरुष कोणीही बाहेरून, शासन-प्रशासन, नाते, आप्तस्वकीय यांच्याकडून सुधारणा, सुख सुविधा व मदत किंवा सहकार्याची अपेक्षा करतो तेव्हा तो परावलंबी असतो. जसे अंड्याला बाहेरून दाब दिला तर एक जीवन संपते. हाच दाब जेव्हा आतून दिला जातो तेव्हा एक नवीन जीव जन्माला येतो. तसंच माणसाचं आहे, नेमके हेच तत्त्व आपल्या जीवनाला लागू पडते. बाहेरून दाब दिला गेला तर अपेक्षा पूर्ण न होता कदाचित नुकसान होईल; पण आतून दिल्या गेला तर काहीतरी मोठा यशाचा मार्ग किंवा एक वेगळा विचार समोर येऊ शकतो जो अपयश, आत्महत्यासारख्या निराशावादी मार्गापेक्षा फार प्रशस्त असतो.प्रत्येक व्यक्तीकडे एक न दिसणारा म्हणजेच अदृश्य अवयव असतो. तो त्याला माहिती नसतो आणि त्याचा शोध घेण्यासाठी आतून दाब यावा लागतो. ‘मी’चा शोध घ्यावा लागतो. आपल्या मनाच्या शक्तीचा शोध आणि तो अवयव म्हणजे पंख!! मनाचे पंख! या पंखाचा शोध लावता आला तर समोर एक मोठे आकाश असते व त्यात कितीही उंच भरारी घेता येते. पुरुषासारखा पुरुष फक्त निसर्गावर अवलंबून राहून, अस्मानी संकटाने खचून आत्महत्या करतो. उरते मागे स्त्री ती जगाच्या दृष्टीने बिचारी असते. चार चिल्ले पिल्ले घेऊन हलाखीचे जीवन कंठते. निसर्गाचा असहकार, शासन प्रशासनाचे भिकार दस्तऐवज, कायदे, औपचारिकता, त्यानंतर टाकलेला तुकडा याने परिवाराची भूक भागत नाही. समस्या मिटत नाहीत. अशा स्थितीत पर्यायी मार्ग, वेगळा विचार, तज्ज्ञांचे सहकार्य, जीवनाशी निष्ठा असेल तर सर्व काही शक्य होऊ शकते. विद्यार्थी शिक्षणाच्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये तरुण वयात आत्महत्या करताहेत. अपयशामुळे खचून जाताहेत. खरं म्हणजे विनर तो नसतो जो शर्यत शिंकला. ज्याने शर्यत पूर्ण केली तो जिंकलेलाच असतो. समस्या लिहा, मांडा, कोणाला तरी सांगा. जगात मदत करणारे अनेक लोकही आहेत. आपण त्यांच्यापर्यंत कदाचित पोहोचत नाही. समस्या योग्य रीतीने मांडली म्हणजे अर्धी समस्या सोडविल्यासारखे असते. आपल्या दुर्बलतेवर नव्हे, आपल्यातील सामर्थ्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. धाडस केले, धोके पत्करले तर यश तुमचेच असते.‘हारा वह जो मैदान में उतरा ही नहीं।जो खेला वही जीता है’

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक