शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

तुमच्या मुलांकडे तुमचं लक्ष आहे ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 08:59 IST

आपल्या मुलांकडे लक्ष कसं ठेवायचं? हा पालकांना नेहमी पडणारा प्रश्न आहे.

संजीव लाटकर, पालक समुपदेशकआपल्या मुलांकडे लक्ष कसं ठेवायचं? हा पालकांना नेहमी पडणारा प्रश्न आहे. हाच प्रश्न पालक मलाही नेहमी विचारतात. मुलांकडे लक्ष ठेवणं ही संकल्पना मुलांच्या वयानुसार बदलत असते. मूल जेव्हा अगदी लहान असते तेव्हा ते खूप unpredictable अर्थात बेभरवशाचे असते. त्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज असते. कारण आपण जी कृती करतो, त्याचे परिणाम नेमके काय होणार आहेत हे लहान मूल जाणत नाही. उदाहरणार्थ पडणे, धडपडणे, भाजणे अशा घटना या त्यांच्या आकलनाच्या पलीकडे असतात. त्याने त्याचा पुरेसा अनुभव घेतलेला नसतो. अशा अतिशय अजाण, लहान मुलांकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असते. पुढे मुलं मोठी झाली की ते हळूहळू कमी होतं. आपला मुलांवरचा विश्वास वाढला की डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज राहत नाही. सहाजिकच लक्ष ठेवणे कमी होते.

मुलांचा हा जो प्रवास सुरु होतो, तो अशा एका टप्प्यावर पोहचतो, की पालकांनी आपल्यावर लक्ष ठेवलेलं (आता वयात आलेल्या, समज आलेल्या आणि मोठ्या झालेल्या) किशोरवयीन मुलांना आवडत नाही. ते पालकांकडे नाराजी व्यक्त करतात किंवा पालकांना चक्क खडसावतात. मग आजकालची मुलं सहजपणे म्हणून जातात, की "आम्हाला आमची स्पेस हवीय. त्यात तुम्ही ढवळाढवळ करू नका". मुलांच्या आणि त्याहीपेक्षा पालकांच्या जीवनात एक टप्पा असाही येतो की या वयातल्या मुलांवर लक्ष ठेवायचं कसं? असा प्रश्न पालकांपुढे असतो!

हे वय जितकं आत्मविश्वासाचं असतं, तितकंच अनुभवांच्या अभावाचंही असतं. या वयात मुलं निसरड्या वाटेवर जाण्याची किंवा फसण्याची शक्यता असते. मुलांना योग्य किंवा अयोग्य हे चटकन समजेल, असं नसतं. त्यांना थोडी झगमगाटी किंवा धाडसी जीवन शैली आकर्षित करू शकते. अशा वेळी पालकांच्या मार्गदर्शनाची आणि पालकांबरोबर संवादाची खूप महत्त्वाची गरज तयार होते. या संवादाच्या वेळी संवादापेक्षा पालकांचा भर माहिती काढून घेण्यावर असेल, तर तिथे फार मोठी गल्लत होण्याची शक्यता आहे. मुलांनी त्यांची सर्व माहिती आपल्याला द्यावी, अशी पालकांची इच्छा असते आणि ते त्याच दिशेने विचार करत असतात. पण पालकांनी सतत पोलिसांसारखी चौकशी करणं, सतत माहिती काढून घेणं, सतत प्रश्न विचारून भंडावून सोडणे, सतत त्यांच्यावर लक्ष ठेवणं मुलांना आवडत नाही.  

मुलं शाळेत जातात. क्लासला जातात. खेळत असतात. मुलं जस जशी मोठी होतात तसं त्यांचं स्वतःचं एक विश्व तयार होतं. या विश्‍वात ते सहसा पालकांना डोकावूं  देत नाहीत. या विश्वाबद्दल त्यांनी  जेव्हा जेव्हा पालकांशी माहिती शेअर करतात, तेव्हा तेव्हा त्यांनी पालकांचा ओरडाही खाल्लेला असतो. त्यामुळे ते माहिती शेअर करणं थांबवतातच. या नव्या विश्वाकडे, नव्या मित्रांकडे, नव्या वातावरणाकडे मुलं जेव्हा आकृष्ट होतात, तेव्हा त्यांना तसं होऊ द्यावं. मुलं मोठी होत असताना ती संवेदनशील असतात. म्हणूनच अनेक पालकांचा प्रश्न असा असतो, की उद्या मुलं बिघडली तर आम्ही काय करायचं? म्हणून आम्ही मुलांवर बारकाईने लक्ष ठेवतो. मुलांवर लक्ष ठेवणं म्हणजे वॉच ठेवणं नव्हे. मुलांकडे लक्ष द्यायचं असतं, लक्ष ठेवायचं नसतं! लक्ष देणे म्हणजे मुलांना प्राधान्य देणे, मुलांचे निरीक्षण करणे, मुलांचं म्हणणं नीट ऐकणे, मुलांशी सुसंवाद प्रस्थापित करणे. मुलांना विश्वास देणे, मुलांबद्दल तुम्ही क्षमाशील आहात याची खात्री पटवून देणे आणि या माध्यमातून मुलांना समजून घेणे. यातून मुलं तुमच्याशी मोकळेपणाने संवाद साधू शकतात. किमान काहीही झालं तरी तुम्ही त्यांच्या मागे भक्कमपणे उभे आहात, हा खूप आश्वासक असा धीर त्यांना वाटतो. 

'घार हिंडते आकाशी, तिचे चित्त पिलापाशी' या प्रमाणे पालक आयुष्यभर मुलांकडे लक्ष देतच असतात. मुलं मोठी होऊन पंखात पुरेसे बळ घेऊन कुठेही उडून गेली, तरी पालकांचं लक्ष देणं मात्र थांबत नाही. हे लक्ष देणं म्हणजेच पालकत्वाचा गाभा आहे...

टॅग्स :kidsलहान मुलं