शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या मुलांकडे तुमचं लक्ष आहे ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 08:59 IST

आपल्या मुलांकडे लक्ष कसं ठेवायचं? हा पालकांना नेहमी पडणारा प्रश्न आहे.

संजीव लाटकर, पालक समुपदेशकआपल्या मुलांकडे लक्ष कसं ठेवायचं? हा पालकांना नेहमी पडणारा प्रश्न आहे. हाच प्रश्न पालक मलाही नेहमी विचारतात. मुलांकडे लक्ष ठेवणं ही संकल्पना मुलांच्या वयानुसार बदलत असते. मूल जेव्हा अगदी लहान असते तेव्हा ते खूप unpredictable अर्थात बेभरवशाचे असते. त्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज असते. कारण आपण जी कृती करतो, त्याचे परिणाम नेमके काय होणार आहेत हे लहान मूल जाणत नाही. उदाहरणार्थ पडणे, धडपडणे, भाजणे अशा घटना या त्यांच्या आकलनाच्या पलीकडे असतात. त्याने त्याचा पुरेसा अनुभव घेतलेला नसतो. अशा अतिशय अजाण, लहान मुलांकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असते. पुढे मुलं मोठी झाली की ते हळूहळू कमी होतं. आपला मुलांवरचा विश्वास वाढला की डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज राहत नाही. सहाजिकच लक्ष ठेवणे कमी होते.

मुलांचा हा जो प्रवास सुरु होतो, तो अशा एका टप्प्यावर पोहचतो, की पालकांनी आपल्यावर लक्ष ठेवलेलं (आता वयात आलेल्या, समज आलेल्या आणि मोठ्या झालेल्या) किशोरवयीन मुलांना आवडत नाही. ते पालकांकडे नाराजी व्यक्त करतात किंवा पालकांना चक्क खडसावतात. मग आजकालची मुलं सहजपणे म्हणून जातात, की "आम्हाला आमची स्पेस हवीय. त्यात तुम्ही ढवळाढवळ करू नका". मुलांच्या आणि त्याहीपेक्षा पालकांच्या जीवनात एक टप्पा असाही येतो की या वयातल्या मुलांवर लक्ष ठेवायचं कसं? असा प्रश्न पालकांपुढे असतो!

हे वय जितकं आत्मविश्वासाचं असतं, तितकंच अनुभवांच्या अभावाचंही असतं. या वयात मुलं निसरड्या वाटेवर जाण्याची किंवा फसण्याची शक्यता असते. मुलांना योग्य किंवा अयोग्य हे चटकन समजेल, असं नसतं. त्यांना थोडी झगमगाटी किंवा धाडसी जीवन शैली आकर्षित करू शकते. अशा वेळी पालकांच्या मार्गदर्शनाची आणि पालकांबरोबर संवादाची खूप महत्त्वाची गरज तयार होते. या संवादाच्या वेळी संवादापेक्षा पालकांचा भर माहिती काढून घेण्यावर असेल, तर तिथे फार मोठी गल्लत होण्याची शक्यता आहे. मुलांनी त्यांची सर्व माहिती आपल्याला द्यावी, अशी पालकांची इच्छा असते आणि ते त्याच दिशेने विचार करत असतात. पण पालकांनी सतत पोलिसांसारखी चौकशी करणं, सतत माहिती काढून घेणं, सतत प्रश्न विचारून भंडावून सोडणे, सतत त्यांच्यावर लक्ष ठेवणं मुलांना आवडत नाही.  

मुलं शाळेत जातात. क्लासला जातात. खेळत असतात. मुलं जस जशी मोठी होतात तसं त्यांचं स्वतःचं एक विश्व तयार होतं. या विश्‍वात ते सहसा पालकांना डोकावूं  देत नाहीत. या विश्वाबद्दल त्यांनी  जेव्हा जेव्हा पालकांशी माहिती शेअर करतात, तेव्हा तेव्हा त्यांनी पालकांचा ओरडाही खाल्लेला असतो. त्यामुळे ते माहिती शेअर करणं थांबवतातच. या नव्या विश्वाकडे, नव्या मित्रांकडे, नव्या वातावरणाकडे मुलं जेव्हा आकृष्ट होतात, तेव्हा त्यांना तसं होऊ द्यावं. मुलं मोठी होत असताना ती संवेदनशील असतात. म्हणूनच अनेक पालकांचा प्रश्न असा असतो, की उद्या मुलं बिघडली तर आम्ही काय करायचं? म्हणून आम्ही मुलांवर बारकाईने लक्ष ठेवतो. मुलांवर लक्ष ठेवणं म्हणजे वॉच ठेवणं नव्हे. मुलांकडे लक्ष द्यायचं असतं, लक्ष ठेवायचं नसतं! लक्ष देणे म्हणजे मुलांना प्राधान्य देणे, मुलांचे निरीक्षण करणे, मुलांचं म्हणणं नीट ऐकणे, मुलांशी सुसंवाद प्रस्थापित करणे. मुलांना विश्वास देणे, मुलांबद्दल तुम्ही क्षमाशील आहात याची खात्री पटवून देणे आणि या माध्यमातून मुलांना समजून घेणे. यातून मुलं तुमच्याशी मोकळेपणाने संवाद साधू शकतात. किमान काहीही झालं तरी तुम्ही त्यांच्या मागे भक्कमपणे उभे आहात, हा खूप आश्वासक असा धीर त्यांना वाटतो. 

'घार हिंडते आकाशी, तिचे चित्त पिलापाशी' या प्रमाणे पालक आयुष्यभर मुलांकडे लक्ष देतच असतात. मुलं मोठी होऊन पंखात पुरेसे बळ घेऊन कुठेही उडून गेली, तरी पालकांचं लक्ष देणं मात्र थांबत नाही. हे लक्ष देणं म्हणजेच पालकत्वाचा गाभा आहे...

टॅग्स :kidsलहान मुलं