शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

अवनी वाघिनीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 18:05 IST

देशातील वाघांचे प्रमाण टिकविण्यासाठी ‘वाघ वाचवा’ मोहीम राबविणारे शासन आणि लोकांचा जीव वाचविण्यासाठी वाघालाच मारणारे शासन... दोन्हीवेळी धारेवर धरले गेले ते शासनालाच. अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतरही गदारोळ सुरूच आहे...

ठळक मुद्देअवनी वाघिणीला ठार करण्यात आले. ही खबर गावकऱ्यांसाठी जीवनदायी; पण वन्यजीवप्रेमींसाठी हळहळ व्यक्त करणारी ठरली.

अविनाश साबापुरे‘जवरिक आमचे नातलग मरून राह्यले होते, तवरिक आमच्या बोंबलन्याले कोणी कवडीचा भाव नाई देल्ला. अन् आता थे वाघीण मारली तं एवढं चिल्लावाले काय झालं राजेहो...’ नरभक्षक वाघिणीच्या शिकारीनंतरची चर्चा ऐकून चिडलेल्या गावकऱ्यांच्या मनातली ही सणक आहे. मृत्यू हा वाईटच असतो, तो माणसाचा असो नाहीतर प्राण्याचा. ज्याच्या मरणाची चर्चा व्यापक प्रमाणात होते, त्याच्या जगण्याचे संदर्भ लक्षात घ्यावे लागतात. त्याचे जगणे इतिहास बनतो. इतिहास भलाही असतो अन् बुराही असतो. राळेगाव, पांढरकवडा आणि कळंब या तीन तालुक्यांतील खेडूत गावकऱ्यांसाठी अवनी वाघिण दु:खद इतिहास बनला आहे. तो जेवढा उगाळला जाईल, तेवढीच गावकऱ्यांची ठणक वाढणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात दोन वर्षांपासून वाघिणीने धुमाकूळ घातला होता. ‘अवनी’चे नामाभिधान मिळालेल्या या वाघिणीमुळे २५-३० गावांचे शिवार अक्षरश: रक्ताळले होते. १३पेक्षा जादा माणसे त्याहून दुप्पट गायीढोरं वाघिणीचे शिकार झाले. त्यांचे ओरबाडलेले देह पाहणाऱ्या गावकऱ्यांना वाघिणीच्या पाऊलखुणाही भयावह वाटू लागल्या होत्या.झोटिंगधरा गावात वाघिणीने माणूस मारल्यावर भयग्रस्त गावकऱ्यांनी एसडीओंचे शासकीय वाहन पेटवून आपल्या संतापाला वाट करून दिली. त्यानंतर प्रशासन आणि शासन हलले. २००पेक्षा जादा कर्मचारी जंगलात फिरवून ‘मिशन टी-१’ गतिमान करण्यात आले. तेव्हापासून जंगलात दडलेली वाघीण देशभरातील माध्यमांमधून वारंवार झळकू लागली.‘मिशन टी-१’मधील ताफ्यावर चोहोबाजूंनी ‘प्रेशर’ होते. वाघाला पकडण्याचे, बेशुद्ध करण्याचे, ठार मारण्याचे नियम पाळत पुढे आलेल्या वाघिणीला कसे ‘फेस’ करावे हा प्रश्न होता. वन्यजीवप्रेमींची नजर, गावकऱ्यांची आस अन् माध्यमांचा कटाक्ष ही सगळी कसरत पेलत असतानाच शुक्रवारी रात्री वाघिणीला ठार करण्यात आले. ही खबर गावकऱ्यांसाठी जीवनदायी; पण वन्यजीवप्रेमींसाठी हळहळ व्यक्त करणारी ठरली.पांढरकवडा, कळंब आणि राळेगाव या वाघग्रस्त तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये अक्षरश: पेढे वाटण्यात आले. त्याचवेळी वन्यजीवप्रेमींनी सोशल मीडियातून वनविभागाला संशयाच्या शिखरावर उभे केले. वाघिणीला बेशुद्ध करून पकडणे शक्य असतानाही तिला मारण्यातच आले, हा आक्षेप घेण्यात आला. केंद्रीय मंत्री आणि नामवंत वन्यजीवप्रेमी मनेका गांधी यांनीही संताप व्यक्त केला. देशातील वाघांचे प्रमाण टिकविण्यासाठी ‘वाघ वाचवा’ ही मोहीम राबविणारे शासन आणि लोकांचा जीव वाचविण्यासाठी वाघालाच मारणारे शासन... अशा दुहेरी संरक्षकाच्या भूमिकेतल्या शासनाला आता वन्यजीवप्रेमींच्या आरोपांमुळे बचावात्मक पवित्र्यात यावे लागले आहे.पर्यावरण जपण्यासाठी सर्वच प्राण्यांप्रमाणे वाघांनाही जगविणे आवश्यक आहे. पण एखादा वाघ हजारो माणसांच्या जगण्याचा दुश्मन झाला असेल तर? वनविभागालाही अशावेळी वाघ की माणूस, यापैकी एकाला निवडणे आवश्यक होणारच. साहजिकच माणसांना प्राधान्य देण्यात आले. शिवाय वाघ आज आढळला आणि लगेच दुसºया दिवशी ठार मारला, असेही नाही. दोन वर्ष धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला केवळ पकडण्यासाठीच ७०-८० दिवस मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडाही झाला.सारे उपाय हरल्यावरच वाघिणीला संपविण्यात आले. पण वन्यजीवप्रेमींचा आक्षेप कायम आहे. हे आक्षेप ऐकल्यावर वाघग्रस्त गावकऱ्यांचे म्हणणे एवढेच आहे, की वाघांची चिंता वाटणाऱ्यांनी तीन दिवस आमच्या गावात येऊन मुक्कामी राहावे. आताही या भागात वाघिणीचे दोन बछडे आणि एक वाघ फिरत असल्याची गावकऱ्यांना भीती आहे. त्या भीतीवर वन्यजीवप्रेमींनी काहीतरी उपाय सांगावा, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.शहरात एखादवेळी चार वानरांची टोळी अंगणातले वाळवण उधळून लावते, दोरीवरचे कपडे उचलून नेते, तेव्हा शहरी माणसं अक्षरश: पिसाळून जातात. माकडांचा बंदोबस्त करा, म्हणून पेपरात बातम्या येतात. मग ३० खेड्यांमध्ये जर वाघ थेट माणसं मारत असेल, तर त्या गावकऱ्यांनी ओरडूही नये? वाघ मेला, डोक्यावरची मृत्यूची टांगती तलवार हटली म्हणून त्यांनी आनंद साजरा केला तर चुकले कुठे? चोर येऊ नये म्हणून दाराशी कुत्रा पाळणाऱ्यांना खेड्यातल्या माणसांपेक्षा वाघ महत्त्वाचा वाटत असेल, तर त्यांनी एकदा जरूर अशा खेड्यांमध्ये परिवारासह मुक्कामाला यावे, मृत्यूची भीती काय असते, ते एकदा अनुभवावे आणि माणसे की माणसाला मारणारे एक श्वापद, दोघांपैकी कोणाला मरू द्यावे याचा निर्णय घ्यावा, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे..(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीतउपसंपादक आहेत.)

manthan@lokmat.com