शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अवनी वाघिनीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 18:05 IST

देशातील वाघांचे प्रमाण टिकविण्यासाठी ‘वाघ वाचवा’ मोहीम राबविणारे शासन आणि लोकांचा जीव वाचविण्यासाठी वाघालाच मारणारे शासन... दोन्हीवेळी धारेवर धरले गेले ते शासनालाच. अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतरही गदारोळ सुरूच आहे...

ठळक मुद्देअवनी वाघिणीला ठार करण्यात आले. ही खबर गावकऱ्यांसाठी जीवनदायी; पण वन्यजीवप्रेमींसाठी हळहळ व्यक्त करणारी ठरली.

अविनाश साबापुरे‘जवरिक आमचे नातलग मरून राह्यले होते, तवरिक आमच्या बोंबलन्याले कोणी कवडीचा भाव नाई देल्ला. अन् आता थे वाघीण मारली तं एवढं चिल्लावाले काय झालं राजेहो...’ नरभक्षक वाघिणीच्या शिकारीनंतरची चर्चा ऐकून चिडलेल्या गावकऱ्यांच्या मनातली ही सणक आहे. मृत्यू हा वाईटच असतो, तो माणसाचा असो नाहीतर प्राण्याचा. ज्याच्या मरणाची चर्चा व्यापक प्रमाणात होते, त्याच्या जगण्याचे संदर्भ लक्षात घ्यावे लागतात. त्याचे जगणे इतिहास बनतो. इतिहास भलाही असतो अन् बुराही असतो. राळेगाव, पांढरकवडा आणि कळंब या तीन तालुक्यांतील खेडूत गावकऱ्यांसाठी अवनी वाघिण दु:खद इतिहास बनला आहे. तो जेवढा उगाळला जाईल, तेवढीच गावकऱ्यांची ठणक वाढणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात दोन वर्षांपासून वाघिणीने धुमाकूळ घातला होता. ‘अवनी’चे नामाभिधान मिळालेल्या या वाघिणीमुळे २५-३० गावांचे शिवार अक्षरश: रक्ताळले होते. १३पेक्षा जादा माणसे त्याहून दुप्पट गायीढोरं वाघिणीचे शिकार झाले. त्यांचे ओरबाडलेले देह पाहणाऱ्या गावकऱ्यांना वाघिणीच्या पाऊलखुणाही भयावह वाटू लागल्या होत्या.झोटिंगधरा गावात वाघिणीने माणूस मारल्यावर भयग्रस्त गावकऱ्यांनी एसडीओंचे शासकीय वाहन पेटवून आपल्या संतापाला वाट करून दिली. त्यानंतर प्रशासन आणि शासन हलले. २००पेक्षा जादा कर्मचारी जंगलात फिरवून ‘मिशन टी-१’ गतिमान करण्यात आले. तेव्हापासून जंगलात दडलेली वाघीण देशभरातील माध्यमांमधून वारंवार झळकू लागली.‘मिशन टी-१’मधील ताफ्यावर चोहोबाजूंनी ‘प्रेशर’ होते. वाघाला पकडण्याचे, बेशुद्ध करण्याचे, ठार मारण्याचे नियम पाळत पुढे आलेल्या वाघिणीला कसे ‘फेस’ करावे हा प्रश्न होता. वन्यजीवप्रेमींची नजर, गावकऱ्यांची आस अन् माध्यमांचा कटाक्ष ही सगळी कसरत पेलत असतानाच शुक्रवारी रात्री वाघिणीला ठार करण्यात आले. ही खबर गावकऱ्यांसाठी जीवनदायी; पण वन्यजीवप्रेमींसाठी हळहळ व्यक्त करणारी ठरली.पांढरकवडा, कळंब आणि राळेगाव या वाघग्रस्त तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये अक्षरश: पेढे वाटण्यात आले. त्याचवेळी वन्यजीवप्रेमींनी सोशल मीडियातून वनविभागाला संशयाच्या शिखरावर उभे केले. वाघिणीला बेशुद्ध करून पकडणे शक्य असतानाही तिला मारण्यातच आले, हा आक्षेप घेण्यात आला. केंद्रीय मंत्री आणि नामवंत वन्यजीवप्रेमी मनेका गांधी यांनीही संताप व्यक्त केला. देशातील वाघांचे प्रमाण टिकविण्यासाठी ‘वाघ वाचवा’ ही मोहीम राबविणारे शासन आणि लोकांचा जीव वाचविण्यासाठी वाघालाच मारणारे शासन... अशा दुहेरी संरक्षकाच्या भूमिकेतल्या शासनाला आता वन्यजीवप्रेमींच्या आरोपांमुळे बचावात्मक पवित्र्यात यावे लागले आहे.पर्यावरण जपण्यासाठी सर्वच प्राण्यांप्रमाणे वाघांनाही जगविणे आवश्यक आहे. पण एखादा वाघ हजारो माणसांच्या जगण्याचा दुश्मन झाला असेल तर? वनविभागालाही अशावेळी वाघ की माणूस, यापैकी एकाला निवडणे आवश्यक होणारच. साहजिकच माणसांना प्राधान्य देण्यात आले. शिवाय वाघ आज आढळला आणि लगेच दुसºया दिवशी ठार मारला, असेही नाही. दोन वर्ष धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला केवळ पकडण्यासाठीच ७०-८० दिवस मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडाही झाला.सारे उपाय हरल्यावरच वाघिणीला संपविण्यात आले. पण वन्यजीवप्रेमींचा आक्षेप कायम आहे. हे आक्षेप ऐकल्यावर वाघग्रस्त गावकऱ्यांचे म्हणणे एवढेच आहे, की वाघांची चिंता वाटणाऱ्यांनी तीन दिवस आमच्या गावात येऊन मुक्कामी राहावे. आताही या भागात वाघिणीचे दोन बछडे आणि एक वाघ फिरत असल्याची गावकऱ्यांना भीती आहे. त्या भीतीवर वन्यजीवप्रेमींनी काहीतरी उपाय सांगावा, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.शहरात एखादवेळी चार वानरांची टोळी अंगणातले वाळवण उधळून लावते, दोरीवरचे कपडे उचलून नेते, तेव्हा शहरी माणसं अक्षरश: पिसाळून जातात. माकडांचा बंदोबस्त करा, म्हणून पेपरात बातम्या येतात. मग ३० खेड्यांमध्ये जर वाघ थेट माणसं मारत असेल, तर त्या गावकऱ्यांनी ओरडूही नये? वाघ मेला, डोक्यावरची मृत्यूची टांगती तलवार हटली म्हणून त्यांनी आनंद साजरा केला तर चुकले कुठे? चोर येऊ नये म्हणून दाराशी कुत्रा पाळणाऱ्यांना खेड्यातल्या माणसांपेक्षा वाघ महत्त्वाचा वाटत असेल, तर त्यांनी एकदा जरूर अशा खेड्यांमध्ये परिवारासह मुक्कामाला यावे, मृत्यूची भीती काय असते, ते एकदा अनुभवावे आणि माणसे की माणसाला मारणारे एक श्वापद, दोघांपैकी कोणाला मरू द्यावे याचा निर्णय घ्यावा, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे..(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीतउपसंपादक आहेत.)

manthan@lokmat.com