शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
2
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
3
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
4
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
5
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
6
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
7
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
8
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
9
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
10
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
11
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
12
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
14
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
15
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
16
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
17
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
18
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
19
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
20
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
Daily Top 2Weekly Top 5

डालडा, सर्फ आणि  महाराजा!.. The world of advertising

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 06:00 IST

कधीकाळी रस्त्यावर वस्तू विकणार्‍या  माणसाने आरोळी ठोकली आणि  जाहिरातीचा जन्म झाला असावा.  पण हीच जाहिरात आज उद्योगांपासून ते ग्राहकांपर्यंत परवलीचा शब्द बनली आहे.  डालडा, सर्फ, एअर इंडियाचा महाराजा,  अमूल गर्ल, लक्स. अशा अनेक जाहिराती  आणि उत्पादनांनी मग ग्राहकांच्या मनाचा ठाव घेतला..

ठळक मुद्देघडणार्‍या, मोडणार्‍या, नव्याने घडणार्‍या,  सतत बदलणार्‍या ‘आकारां’च्या दुनियेतला  विचार आणि शास्र

- हृषीकेश खेडकरएक असं जग जे फक्त कल्पनांवर जगतं. एक असं जग ज्यात अशक्य काहीच नाही. एक असं जग ज्याचा जन्मच मुळी प्रत्येकाचं लक्ष वेधण्यासाठी झाला आहे.- बरोबर ! आजची डिझाइनची गोष्ट त्याच जगाचा मागोवा घेणार आहे, ज्या जगाने प्रत्येकाला आपल्या कवेत घेतलं. जाहिरातीचं जग, ह्या जगाची सुरुवात कुठे आणि कधी झाली हे ठामपणे सांगणं अवघड आहे; पण कधीकाळी रस्त्यावर वस्तू विकणार्‍या माणसाने आरोळी ठोकली आणि जाहिरातीचा जन्म झाला असं म्हटलं तर वावगं ठरायला नको.भारतात जाहिरात बनवायला सुरुवात झाली ती 1905 साली; जेव्हा बी. दत्ताराम यांनी गिरगावात अँडव्हर्टायजिंग एजन्सी सुरू केली. पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली आणि अनेक कापड गिरण्या आपले उद्योग थाटू लागल्या. स्रोनाक, केयमर, जेडब्ल्यूटी यांच्यासारख्या व्यावसायिक एजन्सी परदेशातून भारतात दाखल झाल्या आणि खर्‍या अर्थाने जाहिरातीचं अभूतपूर्व पर्व भारतात सुरू झालं. एकीकडे वीस आणि तीसच्या दशकात बनवल्या जाणार्‍या जाहिरातींवर राजा रवि वर्मा यांच्या चित्रांचा लाभलेला वारसा आणि त्याला चित्रपटाच्या बॅनरची मिळालेली जोड याचा ठळक प्रभाव दिसू लागला, तर दुसरीकडे ब्रिटन आणि अमेरिकेत बनवलेल्या जाहिराती जशाच्या तशा भारतात छापून वितरित होऊ लागल्या. लॅरी स्रोनाक नामक भारतात काम करणार्‍या एका कर्मशिअल आर्टिस्टला ही गोष्ट जाणवली आणि 1925 साली त्याने थेट पेशावरपासून तुतिकोरिनपर्यंत आणि क्वेट्टापासून कोलकातापर्यंत अख्खा भारत पिंजून काढला. या अफलातून प्रवासानंतर लॅरीने बनवलेला अहवाल भारतातला पहिला मार्केट रिसर्च म्हणून ओळखला जातो.सुखवस्तू लोकांसाठी जाहिरातीच्या माध्यमांतून वस्तू विकणारं भारतीय मार्केट पुढे सर्वसामान्यांना गरजेच्या आणि परवडणार्‍या वस्तूंच्या विक्रीसाठी जाहिराती बनवू लागलं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकन ‘लिव्हर’ कंपनी, जी भारतात साबण विकत होती. 1937 साली या कंपनीने आपल्या ग्राहकांना अधिक चांगलं समजून घेण्याच्या दृष्टीने आशिया खंडात एक शोधमोहीम राबवली आणि याचा परिपाक म्हणजे या कंपनीच्या माध्यमातून भारतीय ग्राहकाला मिळालेलं ‘डालडा’ तूप. मूलत: ‘डाडा’ नावाच्या डच कंपनीकडून आयात केलेलं हे तूप ‘लिव्हर’ कंपनीनं ‘एल’ हे अक्षर वापरून ‘डालडा’ नावाने भारतात विकायला सुरुवात केली.भारतीय गृहिणीला आकर्षित करण्याच्या दृष्टीने डालडाने ‘लिंटास’ अँडव्हर्टायसिंग एजन्सीच्या मदतीने दहा भारतीय भाषांमध्ये जाहिराती बनवल्या, जो आजही या क्षेत्रातला एक विक्रम समजला जातो. पिवळ्या आणि हिरव्या रंगाचा, ‘पाल्म’ झाडाचे चित्र असलेला डालडाचा डबा आजतागायत कित्येकांच्या स्वयंपाकघरात आणि परसातल्या बागेत अविभाज्य सत्ता गाजवतो आहे.जाहिरातीच्या जगाचा आपल्या रोजच्या जीवनातील सवयींवरदेखील मोठा प्रभाव आहे; याचं उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय असलेल्या स्वस्तिक कंपनीचे ‘डेट’ डिटर्जंट. पन्नासच्या दशकात या कंपनीने जाहिरात म्हणून डिटर्जंट पावडरबरोबर प्लॅस्टिकच्या बादल्या द्यायला सुरुवात केली. नळाखाली किंवा नदीवर वाहत्या पाण्यात कपडे न धुता बादलीत पाण्याबरोबर डिटर्जंट पावडर टाकून कपडे स्वच्छ करण्याचा मंत्र या कंपनीने दिला.या जाहिरातीचा अजून एक परिणाम म्हणजे भारतात प्लॅस्टिकच्या बादल्यांचे नवीन मार्केट तयार झाले. साठचे दशक भारतावर युद्धाचे ढग घेऊन आले आणि पुन्हा जाहिरातीच्या जगाला खीळ बसली. यानंतरच्या काळात भारतात अनेक सहकारी आणि कौटुंबिक उद्योगसमूह भरभराटीस आले. यातली दोन मुख्य उदाहरणे म्हणजे ‘अमूल’ आणि टाटांचे ‘एअर इंडिया’. होर्डिंगचा वापर करून मॅस्कॉटच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांसमोर कमी खर्चात पोहोचण्याचा एक नवीन ट्रेण्ड जाहिरात क्षेत्रात चालू झाला. यूस्टन्स फर्नांडिझ यांनी बनवलेली ‘अमूल गर्ल’ आणि उमेश राव यांनी बनवलेला एअर इंडियाचा ‘महाराजा’ हे आजही जाहिरात जगातले लँडमार्क  मानले जातात.

स्वप्नातल्या या जगाला स्वप्न पडू पाहत होतं ते सिनेतारकांचे. अवघ्या भारतीय तरुणाईवर सिनेतारकांचा मोठा पगडा होता आणि हीच गोष्ट हेरत ‘लक्स’सारख्या ब्रॅण्डने आपल्या ग्राहकांना विकत घेता येणार्‍या सौंदर्याची स्वप्नं दाखवायला सुरुवात केली. लिव्हर कंपनीच्या या ब्रॅण्डने सिनेतारकांसाठी जाहिरात क्षेत्रात पायघड्या अंथरल्या आणि आजही लक्सच्या जाहिरातीत तीच परंपरा अखंडित पहायला मिळते.बदलत्या काळाबरोबर जाहिरातीची ही दुनिया आता कात टाकायला लागली. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून बाहेर पडणारे विद्यार्थी आता जाहिरातीच्या क्षेत्रात आपले ज्ञान आणि कौशल्ये वापरू पाहत होती. सर्जनशीलतेला आता तर्काची जोड मिळायला लागली आणि अँडव्हर्टायजिंग एजन्सी आता फक्त जाहिरातीचा विचार न करता संपूर्ण ब्रॅण्ड मॅनेजमेंट करू लागली.ग्राहकाचा दृष्टिकोन यानंतर बदलला. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सर्फ पावडरच्या जाहिरातीत दिसणारी ‘ललिताजी’. ‘सस्ती चीज और अच्छी चीज मैं फरक होता है.’ असं म्हणून निर्णायक क्षणी ग्राहकाचं मन किमतीवरून मूल्याकडे वळवत, भारतीय गृहिणीचे प्रतिनिधित्व करणारी ललिताजी आजही आपल्या मनात सहज डोकावते.राजीव गांधी पंतप्रधान असतानाचा हा काळ, जेव्हा भारतात माहिती तंत्रज्ञानाच्या युगाची नांदी होत होती. जाहिरातीद्वारे ग्राहकापर्यंत पोहोचणं जितकं सोपं होत होतं तितकंच गरजेचंही. परदेशी गुंतवणूदारांसाठी भारतीय बाजारपेठ खुलत होती आणि जाहिरातीचं महत्त्व अधिकच वाढलं. विकासाबरोबर देशाची लोकसंख्यादेखील विक्रमी वाढू लागली आणि अपेक्षितरीत्या जाहिरातीच्या जगाचा विस्तार अनेक पटींनी फोफावला. एलेक पदमसी, प्रल्हाद कक्कर, पीयूष पांडे अशी मातब्बर लोकं आता जाहिरातीच्या जगाला नवीन दिशा देऊ पाहत होती. प्रचंड वेगाने पुढे जाणार्‍या या जगात पुढे घडलं तरी काय, हे आपण क्रमश: येणार्‍या लेखांमधून बघूयात.(संदर्भ : अँड कथा)

hrishikhedkar@gmail.com(लेखक वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)