शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

भारतीय आकाशातली चिनी आतषबाजी! घटनेमागचं नेमकं रहस्य काय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 09:42 IST

महाराष्ट्रातील जालना, अकोला, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांत; तसेच मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातल्या काही भागांतून आकाशातून पेटत्या वस्तू पडताना दिसल्या. अचानक घडलेल्या या आतषबाजीमुळे चर्चांना उधाण आलं, काय आहे या वस्तू मागचे रहस्य.....

- हेमंत लागवणकर(विज्ञान प्रसारक,hemantlagvankar@gmail.com)

कोरोनामुळे लावावे लागलेले निर्बंध राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून हटवले आणि नव वर्षदिनी स्वागतयात्रा आयोजित करण्यासाठी परवानगी मिळाली. तयारीसाठी वेळ कमी होता, पण उत्साह आणि जल्लोषाला कमतरता नव्हती. अर्थात, नव वर्षाच्या आदल्या रात्री शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी यंदा झाली नाही. मात्र गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री साडेसात-आठच्या सुमारास काही ठिकाणी नयनरम्य आतषबाजी आकाशात काही जणांनी अनुभवली. रात्रीच्या काळोखात अचानक, अत्यंत प्रकाशमान वस्तू आकाशातून वेगाने खाली येत असल्याचं जालना, अकोला, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यात; तसंच मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातल्या काही भागातून दिसलं. काही मिनिटांतच या आतषबाजीचं चित्रण सोशल मिडियावर व्हायरल झालं. अचानक घडलेल्या आकाशातल्या या आतषबाजीमुळे चर्चांना उधाण आलं; काही जणांना हे भलतंच थ्रिलिंग वाटलं तर काही जण हा नजारा बघून भयभीत झाले. अनेक तर्क-वितर्क करायला सुरुवात झाली. काहींना हा उल्कापात वाटला तर काहींनी परग्रहावरून येणाऱ्या या तबकड्या आहेत, असं कवित्व केलं. राज्यातल्या खगोल वैज्ञानिकांकडे, अभ्यासकांकडे विचारणा सुरु झाल्या. त्यातल्या काहींनी निकामी झालेला कृत्रिम उपग्रह कोसळला असावा, अशी भीती व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या लाडबोरी इथं सापडलेल्या अवशेषांच्या निरीक्षणावरून ते न्यूझीलंडमधून प्रक्षेपित उपग्रह प्रक्षेपकाचे निकामी भाग असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला गेला. अवकाशातली एखादी वस्तू जेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात प्रवेश करते तेव्हा ती सुमारे ताशी दीड ते दोन लाख किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने खाली यायला सुरुवात होते. अत्यंत वेगाने खाली येणाऱ्या या वस्तूचं हवेबरोबर घर्षण होऊन मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण होते आणि ही वस्तू पेट घेते. जर हा उल्कापात असेल तर त्यापासून निघणारा प्रकाश लाल किंवा हिरव्या रंगाचा दिसतो. पण जर ही वस्तू पोलाद, अॅल्युमिनियम अशा धातूंपासून बनलेली असेल तर आकाशातून खाली येताना त्यातून पांढऱ्या रंगाचा प्रकाश बाहेर पडताना दिसतो. गुढीपाडव्याच्या रात्रीदेखील आकाशातून खाली येताना या वस्तूंमधून पांढऱ्या रंगाचा प्रकाश बाहेर पडत असल्याने हे अवशेष कृत्रिम उपग्रहाचे असल्याचं स्पष्ट झालं. भारतीय अवकाश संशोधन संस्था, अर्थात, ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांनी याविषयी खुलासा केला आहे. त्यांच्या मते, शनिवारी अवकाशातून कृत्रिम उपग्रहाचे चार अवशेष पृथ्वीच्या वातावरणात येण्याची सूचना देण्यात आली होती. या चार अवशेषांमध्ये चीनी उपग्रह प्रक्षेपकाचे अवशेष, अमेरिकेच्या आणि लहान अवशेषांचा समावेश असेल, असं सांगण्यात आलं होतं. हे अवशेष साधारण दुपारच्या वेळेत पृथ्वीच्या वातावरणात शिरतील असा अंदाज सुरुवातीला वर्तवण्यात आला होता; पण नंतर वैज्ञानिकांनी नंतरच्या वेळेचा अंदाज दिला. वैज्ञानिकांनी दिलेल्या अंदाजानुसार स्टारलिंक १८३१ उपग्रहाचे अवशेष अटलांटिक महासागरात कोसळले; तर कॉसमॉस-इरिडीयम उपग्रहांच्या टकरीमुळे निर्माण झालेले अवशेष इतके लहान होते की जमिनीवर पोहोचण्यापूर्वीच ते जळून खाक झाले. चीनी उपग्रह प्रक्षेपकाचे अवशेष मात्र वातावरणात शिरून आपल्या भूभागावर कोसळले.उपग्रहांचे अवशेष पृथ्वीवर कोसळण्याच्या घटना दुर्मिळ नव्हेत. चार दशकांपूर्वी, म्हणजे, १९७९ साली स्कायलॅबचे अवशेष हिंदी महासागरात कोसळले होते. आज तीस हजारांपेक्षा जास्त कृत्रिम उपग्रह अवकाशात आहेत आणि त्यापैकी सुमारे तीन हजार उपग्रह निकामी झाले आहेत. त्यामुळे अवकाशातला हा कचरा पृथ्वीतलावर येण्याच्या सर्रास घडतात आणि भविष्यातही घडतील. मात्र, प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांचा माग आपल्याला आधीच काढता येतो, हेही तितकंच खरं आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रscienceविज्ञान