शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

बदलला दिवाळीचा फराळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 07:00 IST

गेल्या १०-१५ वर्षांत दिवाळी फराळाचे स्वरूप पूर्ण बदलले आहे. लाडू, करंजीची जागा मिसळपाव, बटाटेवडा, भजी, मसाला डोसा इ. एवढेच काय परवा कोथरूडला एका कार्यकर्त्याच्या घरी फराळासाठी गेलो, तर तेथे चक्क ऑम्लेट ब्रेड ठेवला होता.

- अंकुश काकडे दिवाळी सुरू झाली, की ८ दिवस दिवाळी फराळ घरी करण्याची गडबड असे. रोज सर्व मंडळी फराळ करण्यात गुंतलेली असत आणि त्यावेळी फराळाचे जिन्नसही किती असायचे, बुंदीलाडू, रवालाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, अनारसे, मोठी शेव, तिखट शेव, पोह्याचा चिवडा, कडबोळे आणि हे सर्व पदार्थ घरातील महिला करीत. दिवसेंदिवस दिवाळीचे स्वरूपही बदलत गेले. घरातील एकत्र कुटुंबपद्धती कमी होत गेली. घरातील महिलादेखील कामानिमित्त बाहेर जाऊ लागल्या, त्यामुळे रेडिमेड फराळ सुरू झाला. तोदेखील पॅकेटमध्ये, तसेच घरोघरी फराळाला जाणे हेदेखील कमी होत गेले. आता दिवाळी झाल्यानंतर अनेक ठिकाणी सार्वजनिक फराळ ही प्रथा सुरू झाली. अर्थात, त्यात राजकीय नेते, आमदार, खासदार, नगरसेवक हे आपल्या कार्यकर्त्यांसाठी, काही प्रमुख नागरिकांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन करतात. पण यावर्षी निवडणुका अर्थात होऊन गेल्या होत्या, त्यामुळे ती संख्या कमी होती. आता घरीदेखील नवीन तरुण पिढी पूर्वीसारखे दिवाळीच्या पदार्थांना प्राधान्य देत नाहीत. त्यामुळे पूर्वीच्या दिवाळी फराळाच्या पदार्थांची जागा आता मिसळपाव, मटार उसळ, बटाटेवडा-भजी, पाव ढोकळा, मसाला घावन, उत्तप्पा, वडा सांबार, इडली चटणी असे काही दाक्षिणात्य पदार्थदेखील पाहावयास मिळतात. अर्थात, दिवाळीचे पारंपरिक पदार्थदेखील ठेवलेले असतात. अहो एवढेच काय, पण... परवा आमच्या पक्षाच्या कोथरूडमधील एका कार्यकर्त्याने एका गार्डनमध्ये दिवाळी फराळ आयोजिला होता. तेथे फराळासाठी गेलो अन् मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. तेथे तर चक्क आॅम्लेट ब्रेड ठेवला होता आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्यांची गर्दी त्याच ठिकाणी होती. लाडू-करंजी घेताना कोणी दिसत नव्हते. शिवाय रविवार किंवा सुटीचा वार या फराळ कार्यक्रमासाठी निवडला जातो. तसेच एका दिवशी चार, पाच ठिकाणी फराळाचे कार्यक्रम चालू असतात. त्यामुळे डॉ. सतीश देसाई यांची आठवण सांगत होते, की फराळाचे आमंत्रण आल्यानंतर ते प्रथम विचारत काय मेनू आहे  आणि जेथे वेगळा व चांगला, चमचमीत मेनू असेल तेथेच जातात. मला मात्र सर्व ठिकाणी जाऊन थोडं थोडं घ्यावं लागतं. पण ह्या वर्षी विधानसभा निवडणूक झाली. निकाल लागला त्यामुळे काही ठिकाणी आनंद, तर काहींनी फराळाचे कार्यक्रमच आयोजिले नाहीत. गेल्या रविवारी सदाशिव पेठेतल्या एका माननीयांनी दिवाळीच्या फराळाचे आयोजन केले होते. अर्थात, तो दिवाळी फराळ सदाशिव पेठेतला होता. त्यामुळे तो मर्यादित होता. पण कार्यकर्त्यांची मात्र त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली. साहजिकच त्या ठिकाणी असलेले मिसळपाव संपले. त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांना फराळ मिळाला नाही, ते तेथेच जवळ असलेल्या गोपाळ हायस्कूलमध्ये एका माननीयांनी आयोजिलेल्या फराळाकडे वळले. पण पुण्यातील चित्र मात्र नेहमीप्रमाणे होते. निकाल काहीही लागला तरी सर्वपक्षीय कार्यकर्ते, पत्रकार या दिवाळी फराळात सहभागी झाल्याचे दिसले. (लेखक प्रसिद्ध राज

टॅग्स :PuneपुणेDiwaliदिवाळी