शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

मनाचा ठाव घेणारी ओल्या जिभेवरची भीजभाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 11:57 IST

बळ बोलीचे : बोलीवरून माणूस कोणत्या भागांतला हे ओळखणे अवघड जात नाही. प्रवास करताना बाजूला बसलेला माणूस तोंड उघडले की, कळून येतो !!

- प्रा. केशव सखाराम देशमुखव्याकरण झुगारून जिभेवरच्या भाषेने तिची म्हणून पत आणि किंमत शाबूत ठेवलेली आहे. ग्रंथाची आणि शिक्षणाची भाषा प्रमाण आणि नागरी भाषा असते. त्या भाषेचे ‘सगळीकरण’ तसेच अनुकरण चटकन होते. शिक्षणाच्या भाषेचे मोल प्रमाण भाषेला चढलेले असते.

लोक-भाषा तशी मुळीच नसते. या लोक-भाषेचा पोत आणि तिची तरलता लवचीक, हार्दिक, सहजगत्या, प्रवाही, प्रभावी आणि टवटवीत असते. महत्त्वाचे म्हणजे ती मनाला भिडते. महत्त्वाचे असेही की, पाणी, प्रांत, हवा, समाज बदलला की, बोली बदलते. तिची ढब बदलते. तिची रग बदलते. तिचा रंग बदलतो. कारण, ओल्या जिभेवरील ही ओली म्हणजेच भीजभाषा ऐकताना आपल्या मनाचा ठाव घेते! जसे की, सामान्यरूपे होताना जिभेवरच्या भाषेत ‘त्यांना, यांना’ याऐवजी ‘त्याहेला, याहेला’ किंवा ‘त्याह्याला, याह्यला-’ अशा रूपांत अवतरते.प्रश्नार्थक सर्वनामांचे उच्चार ग्रामबोलीत गमतीशीर आढळून येतात. उदा. तू कोण आहेस? याऐवजी ‘तू कोन हास’ असे कानांवर जास्त पडते. ‘तू’ सर्वनामाची विभक्तीरूपे जिभेवरच्या भाषेत ‘तुव्हं-मव्हं’ असा मोकळा-ढाकळा पेहराव करून सादर होताना दिसतात.

बोलीला, तिच्यातील शब्दरूपांना खास सौंदर्य आहे आणि खास गोडवासुद्धा! येणार आहेस? जाणार आहेस? असे म्हणायला शब्द आणि वेळ पुष्कळ खर्ची जातो. मग त्याऐवजी ‘येतूस?-जातूस?’ या एका शब्दात सगळे काम इथे भागले गेले आहे. व्हयालं, जायालं किंवा इथवर, कुठवर या प्रमाणित रूपांपेक्षा ‘इथ्रोक, कोठ्रोक’ असे जोडशब्दांचे उच्चार गावांच्या जिभेवर रुळलेले आढळून येतात. शांत राहा, गप्प बसा, असे म्हणायचे तिथे काम पडत नाही. ‘मुका बस’ म्हटले सगळे त्यात आले.

‘गरजेपुरता भाषेचा वापर’ हा या गावभाषेतील काटकसरीचा नियम छानच ठरावा. हळूहळू असे  म्हणण्याऐवजी ‘वजंवजं’ किंवा ‘ढबानं’ म्हटले म्हणजे शब्दाची मजा वाढते आणि वजनसुद्धा. ‘पळवणे’ या शब्दाची योजना गाडीला जुंपलेल्या बैलांना वापरताना किंवा कुत्र्यांना पळवून लावताना ‘खेदाडणे’ एवढ्या क्रियापदातून दाखवली जाते. ‘जाऊ या, घेऊ या, खाऊ या, पिऊ या...’ हे क्रियावाचक शब्द एकेका शब्दांत- जाऊता, घेऊता, खाऊता, पिऊता, अशी गावमुखी उमटतात. त्यातील गोडवा आणि सहजता ही ‘मनभावन’ असते. ‘बघ’ याऐवजी ‘पहाय’ किंवा ‘जा’ याऐवजी ‘जाय’ ‘रहा’ याऐवजी ‘रहाय’ असा हेल काढून उच्चार होतो आणि त्यातून शब्दाशब्दांची मिठ्ठास वाढत जाऊ पाहते. ध्वनी उच्चारात जिथे जास्त ऊर्जा खर्च होते किंवा मुद्रणातही जिथे अधिक शब्द वापरले जातात. त्याऐवजी ‘वाक्याचे काम’ ‘एका शब्दात’ पूर्ण करण्याचे विस्मयकारक कार्य बोलीतला एक-एक शब्द करतो आणि वाक्याची बरोबरी करतो. आता हेच पाहा : ‘काय म्हणून’ त्याऐवजी ‘कामून’, ‘दररोज’ त्याऐवजी ‘रोच्चं’ किंवा- ‘रात्रंदिवस’ त्याऐवजी ‘रातंदिह्या’ असे शब्दप्रयोग चालता- बोलता केले जातात.

समाजशिष्टसंमत, सभ्य, सहज शिव्यांचा वापर लोक चालताबोलता करतात. त्यातही पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या शिव्या यांची प्रतवारी भिन्न-भिन्न दिसते. हिंगोली परिसरात, पूर्वेला शिव्यांचा प्रसाद फार बारकाईने बघितला, तर ऐकायला बरा वाटत नाही; पण अभ्यासायला रुची येऊ शकते.

* पुरुषांच्या शिव्या : ‘गवसीच्या, गधडीच्या, —- मनीच्या’ अथवा —-डीच्या, —-हुंग्या, हकनाक लिंगभावभेद करीत शिव्या दिल्या जातात. गंमत, मजा, दिल्लगी, थट्टा, मस्करी यातूनही शिव्या उगम पावतात. नातेसंबंधाचा वापर करून सहजपणे शिव्या वापरतात. शिव्या भांडणातील एक शस्त्र म्हणून वापरले जाते. हाणामारीच्या पूर्वीची पहिली स्टेप शिव्यांपासून सुरू होते. भूमी बदलली, पाणी बदलले म्हणजे शिव्यांचे रूप आणि शिव्यांचा जोर बदलतो !!* स्त्रियांच्या शिव्या : सांड्या, केरसुनी, मुडद्या, मेल्या, हालकट, बेसरम, सिरजोर, अगाऊ, लफंडर, ठेंगडा, लाजलज्जा : हे शब्द वापरून, त्यांच्या आशयापर्यंत पोहोचणाऱ्या सरळ, सभ्य शिव्या स्त्रिया देताना दिसतात. (अधिक तिखट शिव्या नको वापरायला म्हणून...)

शिमगा आणि शिव्या यांचे एक संमेलन पूर्वी फार रंगून सजवले जाई. जुने लोक कमी झाले आणि शिव्याही!! (हल्ली शिव्यांचा आविष्कार बेचव, सपक झाला आहे. सिनेमा, सिरिअल्समधून आणि हिंदीच्या प्रभावांतून भेसळ झालेल्या भाषेतून शिव्या ऐकू येतात. त्यांचे रूप रंगहीन भिंतीसारखे असते.) कुणी तरी म्हणाले : शि+वी= शिक्षण+विचार! शिवी दिली की, समोरचा वठणीवर येतो; जागा होतो. बाप काय किंवा मास्तर काय, ‘गाढवा’ असे मुलाला म्हणायचा; म्हणतो. गाढवा या शिवीला पूर्वापार जनमान्यताच लाभलेली आहे. खरंय ना!! (पण, यामुळे कष्ट उपसणारा, ओझी वाहणारा गाढव हा प्राणी लोकांनी वेठीला का धरला, हे कळत नाही.) ‘निजणे’ एवढे एक क्रियापद विविध छटा घेऊन येते. ‘झोपलात का = निजले का?, आजारी आहे = निजून आहे, ‘निजली’ याच शब्दाला लैंगिक संबंधीही एक अर्थ खेड्यांच्या भाषेत मिळालेला आहेच! जपून याऐवजी ‘सुतासुतानं’ असे म्हटले जाते. उन्हाचा उकाडा असह्य झाला, त्याला ‘धकायलं’ असे म्हटले जाते किंवा संकटांना! अडथळ्यांना ‘साडेसाती’ म्हणतात. आता हा साडेसातचा आकडा आता कुठून जरा शोध घ्यायला हवा!

जनभाषा ही पुस्तके वाचून बनली नाही. ती व्यवहार, रीतभात, प्रवृत्ती, दोष, चांगुलपण, रिवाज, सवय, परंपरा अशा विविध विषयांच्या अनुभवांतून बनत गेली आहे. माणसांत फरक तसा भाषेत फरक. आता बघा : लातूरकडे : काय करू लालाव, नांदेडकडे : काय करायल्या, हिंगोलीकडे : काय करायलास! ‘काय करतो आहेस?’ या एका लहान वाक्यांची ठेवण तीन जिल्ह्यांत खास वेगळी जाणवण्याइतपत निराळी आढळते ती अशी.

पाणी बदलले की ‘वाणी’ बदलली जाते. पाणीबाणी हा शब्द दुष्काळवर्णनाचाच शब्द नाही, तर तो भाषाबदलाचेपण निदर्शक जरूर आहे. इथे जिल्ह्याजिल्ह्यांतली माणसे, समाजसमूह खास ‘स्वत:च्या’ बोलीत बोलतात.या बोलीला स्वत:ची स्वतंत्र अशी ढब आहे. शैली आहे. गोडवा आहे. रंग आहे. तिचे प्रत्येक बोलीचे उच्चारणाचे एक स्वतंत्र कलारूप आहे. बोलीवरून माणूस कोणत्या भागांतला हे ओळखणे अवघड जात नाही. प्रवास करताना बाजूला बसलेला माणूस तोंड उघडले की, कळून येतो !! 

टॅग्स :Socialसामाजिकliteratureसाहित्य