शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य प्रवाहापासून दूर ‘बडा माडिया’ जमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 06:00 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागाला आज आधुनिकतेचा काही अंशी का असेना, स्पर्श झाला आहे. पण भागमरागड तालुक्याच्या छत्तीसगड सीमेकडील डोंगराळ भागातल्या छोट्या गावांमध्ये राहणारे बडा माडिया जमातीचे लोक आजही मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत.

ठळक मुद्दे प्रोटेक्टेड व्हिलेज प्रवर्गात समाविष्ट करावे

अरविंद ना.पोरेड्डीवारगडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागाला आज आधुनिकतेचा काही अंशी का असेना, स्पर्श झाला आहे. पण भागमरागड तालुक्याच्या छत्तीसगड सीमेकडील डोंगराळ भागातल्या छोट्या गावांमध्ये राहणारे बडा माडिया जमातीचे लोक आजही मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत. ३०-३५ वर्षांपूर्वी हे लोक बाहेरील कोणी अनोळखी माणूस दिसला की पळून जात, किंवा तो माणूस आपल्यावर आक्रमण करतो आहे, अशा समजुतीतून त्याच्याशी हिंसक पद्धतीने वागत असत. आज ती परिस्थिती नसली तरी त्यांच्या खाणपानापासून तर राहणीमानापर्यंत फारसा बदल झालेला नाही. रस्ते, वाहतुकीची साधने, संपर्क सुविधा अशा भौतिक गोष्टी तर दूरच, पण पोट भरण्यासाठीही त्यांना अजून जंगलातील वनस्पतींचाच सहारा घ्यावा लागत आहे.भामरागड या तालुका मुख्यालयापासून ३६ किलोमीटर अंतरावर बिनागुंडा, कुआकोडी, पेरमलभट्टी, पुंगासूर, तुर्रेमर्का, घोटफडी, बंगाळी, धिरंगी, फोदेवाडा आणि कायर ही गावे पहाडावर १५ किलोमीटर परिसरात वसलेली आहेत. जंगलालगतच्या वास्तव्यामुळे पावसाळ्यात मलेरियाचे डास वाढतात. १० वर्षांपूर्वी मलेरियाच्या प्रकोपाने त्यांच्यातील काही कुटुंबे मृत्यूमुखी पडली. २०११ च्या जनगणनेनुसार डोंगरावर राहणाऱ्या त्या १० गावातील बडा माडिया जमातीची लोकसंख्या १००४ आहे. या गावातील अवघ्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांचा परिसरातील मोठे गाव लाहेरी आणि तालुका मुख्यालय असलेल्या भामरागडशी संपर्क असतो. बाकी अनेकांनी तर तालुका मुख्यालयात पायही ठेवलेला नाही. त्या १० गावांपैकी फक्त बिनागुंडा येथे आरोग्य उपकेंद्र आहे. शिक्षणासाठी बिनागुंडा येथे एकमेव आश्रमशाळा आहे, पण १५ किलोमीटर परिसरात बिनागुंडापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ताही नाही. पावसाळ्याचे ४ महिने आणि नंतरचे २ महिने नदी-नाल्या तुडुंब भरून वाहात असल्याने या भागातील लोकांचा बाहेरच्या जगाशी संपर्कच नसतो. जानेवारीनंतर हे लोक स्वत:च श्रमदानातून रस्ता तयार करून बिनागुंडापर्यंत येण्याची सोय करतात. बडा माडिया प्रजातीमधील रोजी-बेटीचा व्यवहार त्याच १० गावांमध्ये केला जातो. पहाडाच्या मागील बाजुस छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्याची सीमा आहे.ही जमात शेती करीत नाही. काही लोक सपाट जमिनीवर आवत्या (मशागत न करता केलेली पेरणी) टाकून भातशेती करतात. तांदळाच्याच प्रकारातील ‘कोसरी’ पावसाळ्यात जंगलात, पहाडावर फेकतात. त्यावर उगवणाऱ्या पिकातून ते पोट भरतात. गोरगा, ताडी या झाडांचा रस किंवा मोहा हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे. या जमातीमधील बहुतांश कुटुंब शाकाहारी भाजी बनवून खात नाहीत.या जमातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून प्रयत्न झालेत आणि आजही सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाकडून शासनाच्या योजना राबविल्या जात आहे, पण तरीही मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या या जमातीला, त्यांच्या संस्कृतिला वाचवण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे.आदिवासी विकास विभाग पुढाकार घेईल का?भामरागड तालुक्यातल्या या बडा माडिया जमातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने या गावांना ‘प्रोटेक्टेड व्हिलेज’ प्रवर्गात समाविष्ट करून केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण धोरणाअंतर्गत इतर भागांप्रमाणे या गावांसाठी विशेष योजना लागू करणे गरजेचे आहे. त्यासाठी चर्चा, संशोधन आणि विचारविनिमय होणे अपेक्षित आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना पत्र देऊन त्यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी २५ डिसेंबर २०१८ ला राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना पत्र लिहून या भागातील बडा माडिया जमातीच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उत्थानासाठी त्यांची वस्ती असलेल्या गावांना प्रोटेक्टेड व्हिलेज प्रवर्गात समाविष्ट करावे आणि केंद्र व राज्य सरकारच्या आदिवासींकरिता असलेल्या सर्व विकास योजना प्राधान्याने राबवाव्यात, अशी सूचना केली. पण अद्याप त्यावर कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. आदिवासी विकास विभागाने या गावांना दत्तक घेतल्यास येथील सामाजिक परिस्थितीत आमुलाग्र बदल होऊ शकेल. 

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना