शहरं
Join us  
Trending Stories
1
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
2
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
3
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
4
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
5
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
6
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
7
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
8
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
9
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
10
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
11
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
12
स्मार्टफोनची बॅटरी धडाधड उतरतेय? पटकन ऑन करा 'या' ५ सेटिंग्स; बॅटरीची होईल दुप्पट बचत
13
राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा
14
मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या
15
U19 World Cup 2026 Schedule : ICC चा मोठा निर्णय; वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या गटातून पाकिस्तान बाहेर
16
बाजारात जोरदार 'यू-टर्न'! IT क्षेत्रात बंपर खरेदी, एचसीएल-टीसीएससह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी
17
'राज' सिनेमातली 'ती' आज कुठे गायब? भूताच्या भूमिकेत दिसली; बिपाशा बासूवरही पडलेली भारी
18
निरोगी त्वचा, मजबूत केस, वजन कमी करण्यासाठी बेस्ट ठरते मेथी; 'हे' आहेत १० जबरदस्त फायदे
19
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
20
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच होणार! कुटुंबीयांनी दिली मंजूरी
Daily Top 2Weekly Top 5

कथा भारतीय सैन्यदलाच्या : महिलांसाठी लष्कराचे दरवाजे खुले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 07:00 IST

- कर्नल वि. ना. तांबेकर भारतीय महिलांना लष्कराचे दरवाजे आता ‘सताड’ उघडले आहेत. ‘सताड’ म्हणण्याचे कारण म्हणजे आतापर्यंत महिलांना ...

- कर्नल वि. ना. तांबेकरभारतीय महिलांना लष्कराचे दरवाजे आता ‘सताड’ उघडले आहेत. ‘सताड’ म्हणण्याचे कारण म्हणजे आतापर्यंत महिलांना लष्करात फक्त अधिकारी आॅफिसर म्हणून प्रवेश होता. शिपाई-सोल्जर म्हणून नव्हता; परंतु यावर्षी जूनपासून १७।। ते २१ वर्षाच्या महिलांना शिपाई-सोल्जर-जवान म्हणून प्रवेश देण्याची प्रक्रिया इंडियन आर्मीच्या भूदलाने सुरू केली आहे; परंतु याची माहिती बऱ्याच जणांना नाही.महाराष्ट्रात तर याबद्दल अज्ञान दिसते. ज्याप्रमाणे पुरुषांना शिपाई-जवान म्हणून प्रवेश मिळत असे, त्याच पद्धतीप्रमाणे आता महिलांनाही आर्मीच्या भूदलात प्रवेश देण्यास जून २०१९ पासून सुरुवात करण्यात आली आहे. हा प्रवेश कसा मिळतो? कुणाला मिळतो? याची नियमावली काय असते? याची माहिती या लेखात देण्यात आली आहे. यावर्षी केवळ १०० महिलांची निवड करण्यात येत आहे आणि ही भरती लष्कराच्या मिलिटरी पोलीस (स्र.) विभागापासून होणार असून, नंतर ती स्टेप बाय स्टेप (टप्प्याटप्प्याने) इतर विभागांत म्हणजे ई. एम. ई., ए. एस. सी. सिग्नल इ. विभागातही होणार आहे. मिलिटरी पोलीस या लष्कराच्या विभागात प्रथमच शिपाई-सोल्जर म्हणून महिलांना प्रवेश देण्यात आला आहे. यानंतर लष्कराच्या इतर विभागांत म्हणजेच सिग्नल इलेक्ट्रॉनिक्स व मेकॅनिकल इंजिनिअरिंग (एटए) आर्मी एव्हिएशन, आर्मी एअर डिफेन्स, आर्मी सर्व्हिस कोअर, आर्मी आॅर्डनन्स कोअर आणि आर्मी इंटेलिजन्स विभागात महिलांना शिपाई म्हणून प्रवेश दिला जाणार आहे. 

पात्रता काय हवी?अर्जदार महिला १७।। ते २१ या वयोमर्यादेतच असावी, लष्करातील विधवांच्याबाबतीत मात्र ही मर्यादा ३० वर्षांपर्यंत आहे. त्यांची उंची कमीत कमी १४२ सें. मी. हवी व त्यानुसार त्यांचे वजन असावे. मुलींना कुठलीही व्याधी किंवा व्यंग नसावे. मुख्य अट म्हणजे उमेदवार अविवाहित असावी. 

निवड कशी व कुठे?महिला उमेदवारांनी आपल्या सर्व प्रमाणपत्रांसह म्हणजेच जातीचा, वयाचा दाखला, शिक्षणाचा, अविवाहित असल्याचा, सैनिकाची मुलगी असल्यास ते प्रमाणपत्र यांसह ठरलेल्या मुदतीत आॅनलाईन अर्ज करावयाचा आहे. ठरलेल्या तारखेनंतर अर्ज केल्यास तो स्वीकारला जात नाही. त्या अर्जाची छाननी करून, सर्व कागदपत्रे योग्य असलेल्या उमेदवारांचे गुणवत्तेनुसार क्रमांक लावण्यात येतात. त्यानंतर, जितक्या जागा भरावयाच्या आहेत, त्यापेक्षा जास्त महिला पुढील निवड प्रक्रियेसाठी हजर राहण्यासाठी आॅनलाईन कॉल दिले जातात. त्यामध्ये केव्हा, कुठे सर्व मूळ प्रमाणपत्रांसह (ङ्मफकॠकठअछ) हजर व्हायचे, याची माहिती असते. हे सरकारी अधिकृत निमंत्रणच म्हणा! सध्या या प्रवेशप्रक्रियेसाठी अंबाला, लखनौ, जबलपूर, शिलाँग व बेळगाव या केंद्रांपैकी उमेदवाराच्या जवळच्या केंद्रामध्ये बोलाविले जाते. महाराष्ट्रीयन उमेदवारांना बेळगाव हे सोयीचे आहे. या केंद्राच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. उमेदवाराने भरतीला जाताना सर्व मूळ (ङ्म१्रॅ्रल्लं’) प्रमाणपत्रे, दोन फोटो घेऊन जाणे भाग आहे; अन्यथा तिला पुढच्या चाचण्या देता येत नाहीत. हे महत्त्वाचे आहे. 

चाचण्या कोणत्या?प्रमाणपत्राची, वयाची खात्री झाल्यानंतर उमेदवारांना १६०० मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी इ. समावेश असतो. त्यामध्ये उत्तीर्ण होणाºया महिलांना गुणानुक्रमे निवडले जाते. निवड झालेल्या उमेदवारांना लगेच त्याच ठिकाणी लेखी परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा ङ्मु्नीू३्र५ी असते. साधारण एक तासाच्या या परीक्षेत सामान्यज्ञान, गणित, विज्ञान इ. विषयांवर नेहमीचे सोपे प्रश्न असतात. त्याची धास्ती करण्यासारखी नसते. या परीक्षेचा निकाल तेथेच भरती केंद्रात लगेच कळतो. त्यात उत्तीर्ण होणाºया उमेदवारांना गुणानुक्रमे निवडले जाते. निवड झालेल्या महिलांना मेडिकल चाचणीसाठी तिथल्याच मिलिटरी हॉस्पिटलमध्ये पाठविले जाते. वैद्यकीय तपासणीमध्ये उत्तीर्ण होणाºया महिलांची पुढील शिक्षणासाठी निवड करून त्यांना तेथेच कळविले जाते. पुढील प्रशिक्षणासाठी कोणत्या सेंटरला, केव्हा हजर व्हायचे, तेही सांगितले जाते व आॅनलाईन कॉल लेटरही पाठविले जाते. त्या लेटरची कॉपी घेऊन निवड झालेल्या उमेदवारांनी त्या त्या तारखेला व वेळेला त्या सेंटरला हजर राहणे महत्त्वाचे आहे; अन्यथा तिच्याऐवजी दुसºया उमेदवाराला बोलाविले जाते. सध्या एकूण १०० महिलांची निवड करण्यात येत असून, त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. सैन्य दलात सध्या २०१९-२० वर्षात एकूण १७०० महिलांची निवड टप्प्याटप्प्याने होणार आहे. निवड झालेल्या पहिल्या तुकडीचे (बॅचचे) प्रशिक्षण बंगलोर येथील अ.र.उ. सेंटर येथे डिसेंबरपासून सुरू होत आहे. आता ज्या मुलींनी अर्ज केले नसतील, त्यांना यापुढील भरती प्रक्रियेमध्ये सामील होता येईल; मात्र त्यासाठी आता यापुढे येणाऱ्या भरती नोटिफिकेशनकडे लक्ष ठेवले पाहिजे आणि ठरल्या तारखेच्या आत सर्व प्रमाणपत्रांसह अर्ज केले पाहिजेत. तरच त्यांना भरतीसाठी कॉल येईल. हे गृहीत धरून इच्छुक महिलांनी तयारीत राहिले पाहिजे.(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत.)

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाIndian Armyभारतीय जवान