शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

विदर्भ जास्त तापमानाचा परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 14:29 IST

मागील काही दिवसापासून विदर्भातील शहरे विस्तवाशी खेळत आहेत, असे वाटते. चंद्रपूर, ब्रह्मपुरी, अकोला, वर्धा, अमरावती, नागपूर या शहरातील तापमान ४५ अंशांच्या वर गेलेले आहे.

प्रा. योगेश दुधपचारेमागील काही दिवसापासून विदर्भातील शहरे विस्तवाशी खेळत आहेत, असे वाटते. चंद्रपूर, ब्रह्मपुरी, अकोला, वर्धा, अमरावती, नागपूर या शहरातील तापमान ४५ अंशांच्या वर गेलेले आहे, पश्चिम महाराष्ट्रातील जळगाव शहरसुद्धा विदर्भातील शहरांची स्पर्धा करत यांच्याही पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. या स्पर्धेत ही शहरे जगातील सर्वात जास्त तापमानाची केंद्रे म्हणून समोर येत आहेत. भारतीय हवामान खात्याने संपूर्ण देशभरातील विविध १७६ वेधशाळातून १९६९ वर्षापासून आजपर्यंत आलेल्या तापमानाच्या आकडेवारीच्या आधारे, हे स्पष्ट केले आहे की, विदर्भातील शहरे ही जगातील सर्वात जास्त तापमानाची आणि उच्च तापमान जास्तीत जास्त दिवस राहणारी केंद्रे म्हणून समोर आलेली आहेत. पुणे आणि दिल्ली येथील भारतीय हवामान खात्याच्या मुख्य वेधशाळेतील शास्त्रज्ञ ए.के. जयस्वाल, पीसीएस राव आणि वीरेंदर सिंग या संशोधकांनी हे संशोधन केले आहे.उच्च तापमान म्हणजे काय? मनुष्याच्या शरीरातील अंतर्गत भागात तापमान ३७ अंश सेल्सिअस इतके राहते, बाहेरचे तापमान कितीही बदलले तरी मनुष्याच्या शरीरातील या तापमानावर त्याचा परिणाम होत नाही, जर शरीरातील तापमान वाढले तर शरीर ते कमी करण्याचा प्रयत्न करते आणि जर ते कमी होत असेल तर शरीर तापमान निर्माण करीत असते किंवा ऊर्जा वाचविते. पण हे करीत असताना शरीरतंत्रावर परिणाम होत असतो. म्हणूनच हवामान खात्याच्या संशोधकांनी ३७ अंश आधार मानून एखाद्या ठिकाणचे मार्च ते जून महिन्यातील तापमान ३७ अंशांपेक्षा जास्त राहत असेल तर त्या दिवसाच्या त्या तापमानाला उच्च तापमान म्हणून नोंदविले आहे. संपूर्ण भारतातील प्रमुख १७६ वेधशाळांतून मिळालेल्या या आकडेवारीच्या आधारे ही उच्च तापमानाची शहरे कोणती याचा शोध घेण्यात आला.मागील ५० वर्षांच्या आकडेवारीच्या आधारावर उच्च तापमान असलेली शहरे जी मिळाली आहेत, त्यात सर्वात जास्त शहरेही भारताच्या दक्षिण आणि मध्य भागातच आहे.संपूर्ण १५ शहरांचा विचार केला तर असे दिसते की उत्तर भारताच्या तुलनेत मध्य आणि दक्षिण भारतातील शहरांतील तापमान आणि त्या शहरात उच्च तापमान असणाऱ्या दिवसांची संख्या जास्त आहे. बारमेरला ४९.९ अंश, आणि श्रीगंगानगर येथे तर ५० डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. परंतु येथे फक्त ६९ दिवस उच्च तापमान राहते. यावरून विदर्भ आणि मध्य भारतातील इतर ठिकाणी या शहरातील तापमान कसे घातक बनत चालले आहे याचा अंदाज येतो. राजस्थानच्या वाळवंटात असणाºया बारमेर शहरात उच्च तापमान असणारे दिवस ८८ आहेत. परंतु त्या तुलनेत उन्हाळ्यात जळगावला ९६ दिवस, चंद्रपूरला ९२ दिवस उच्च तापमान राहते.या अभ्यासातून आणखी एक गोष्ट पुढे आली आहे, ३७ अंश सेल्सिअसपेक्षा सरासरी कमाल तापमान कुठे आणि किती आहे याचा विचार केला तर, विदर्भातील लोकांच्या मनात धडकी भरेल. १९६९ पासून आजपर्यंतच्या कमाल तापमानाचे आकडे तपासले तर असे लक्षात येते की संपूर्ण भारतात कमाल तापमानाचे दोन केंद्र निर्माण झालेले आहे. यातील पहिले केंद्र राजस्थानमध्ये जैसलमेर-बिकानेरच्याजवळ ३९ अंश तापमानाचे, आणि दुसरे महाराष्ट्रात चंद्रपूरवर ४० अंश सेल्सिअस तापमानाचे दिसून येते. चंद्रपूरवर असलेला कमाल तापमानाचा हा केंद्रबिंदू सर्वात जास्त तीव्र आहे.चंद्रपूरला भारतातील किंबहुना जगातील उच्च तापमानाचा हा केंद्रबिंदू निर्माण होण्याची कोणती कारणे असू शकतील, याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. चंद्रपूरचे भौगोलिक स्थान २० अंश उत्तर इतके आहे, पृथ्वीतलावर २० अंश उत्तर आणि २० अंश दक्षिण या दोन अक्षवृत्तावर सर्वात जास्त तापमान नोंदवले जाते. परंतु पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात महासागरांचे आणि समुद्राचे पाणीच जास्त आहे. त्यामुळे २० अंश उत्तर अक्षवृत्त हा जगातील सर्वात जास्त तापमानाचा जमीन असलेला आपोआपच बनतो. पृथ्वीच्या विषुववृत्तावर कमाल तापमान सर्वाधिक नोंदवले जात नाही, याचे कारण विषुववृत्तीय भागात वर्षभर असलेले ढगांचे आच्छादन आणि त्या भागात दररोज दुपारी तीन ते चारच्या आसपास पडणारा पाऊस होय. म्हणूनच पृथ्वीतलावरील कमाल तापमान २० अंश उत्तर या अक्षवृत्तावर नोंदवले जाते. एकीकडे भौगोलिक घटक आणि दुसरीकडे चंद्रपूरला मोठ्या प्रमाणात असलेली कारखानदारी, प्रदूषण, याशिवाय कोळसा खाणी या गोष्टींचा या उच्च तापमानात, आणि तापमानाच्या दिवसात किती वाटा आहे, या गोष्टीवरही संशोधन होणे गरजेचे आहे. चंद्रपूर भारतातील अतिशय प्रदूषित शहरांपैकी एक आहे. या शहराच्या परिसरात ३० च्यावर कोळसा खाणी, आशियातील अतिशय मोठया कोळशावर आधारित वीज केंद्रांपैकी एक केंद्र, जवळच घुग्घुस, बल्लारपूर ताडाळी, वरोरा, ही आणखी उद्योगाची केंद्र यामुळे चंद्रपूरच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात धूळ पसरलेली असते, सल्फर डाय आॅक्साईड, कार्बन डायआॅक्साईड, मिथेन, कार्बन मोनॉक्साईड इत्यादी हरितगृह परिणामकारक वायू चंद्रपूरच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात आहेत. हे सर्व घटक हरितगृह परिणाम घडवून आणतात. सूर्याकडून येणारी ऊर्जा लघु लहरींच्या मार्फत येत असते. परंतु या ऊर्जने वातावरण तापत नाही. पृथ्वीतलावरून परत जाणारी ऊर्जा ही वातावरण तापवत असते, ही ऊर्जा मात्र हे वायू आणि धुळीचे कण रस्त्यातच अडवते आणि त्यामुळे चंद्रपूर परिसरात या घटकांमुळे हरितगृह परिणाम घडून येतो. पृथ्वीतलावरून परत जाणाºया ऊर्जेर्पैकी ८७ टक्के ऊर्जा हे घटक घडवीत असतात, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. एखाद्या लग्नाच्या मंडपातील उष्णतेसारखा या धुलीकनांचा परिणाम होत असतो.यालाच ग्रीनहाऊस इफेक्ट असे म्हणतात. याच ग्रीनहाऊस इफेक्टमुळे चंद्रपुरातील दैनंदिन तापमान जास्त असते.या संशोधकांनी सिद्ध केले की भारतात ज्या भागांमध्ये उच्च तापमानाचे जास्त दिवस आहेत, त्याच भागात सरासरी कमाल तापमानसुद्धा स्थिरावलेले आहे. हे दोन्ही नकाशे एकमेकांसोबत तंतोतंत जुळतात. १९६९ पासून आजपर्यंत २०१० वर्ष भारताच्या संदर्भात सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवले गेले. मागील ५० वर्षे खालील वर्ष हे क्रमानुसार तीव्रतेकडुन कमी तीव्र असे गणले गेले आहेत, (२०१०, २०१२, २००९, २००४, २००३, २००२, २००७ आणि २००५) हे सर्व वर्ष मागील ५० वर्षांचा विचार केला तर एकाच दशकात यावीत यावरून हा देश आणि जग कुठे चालले आहे याचा अंदाज करता येतो.(भूगोल विभाग प्रमुख, जनता कॉलेज चंद्रपूर.तथा पर्यावरण अभ्यासक, चंद्रपूर.)

टॅग्स :Temperatureतापमान