शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

शास्त्रांचे उंबरठे ओलांडून..

By admin | Updated: February 21, 2015 14:07 IST

सरपणावर चूल पेटते आणि अन्न शिजतं. देशातले ७५ टक्के लोक आजही अन्न शिजवण्यासाठी सरपणावर अवलंबून आहेत. हे सरपण कमी लागावं म्हणून काही शास्त्रज्ञांनी चुलीत बर्‍याच सुधारणा केल्या आहेत.

मिलिंद थत्ते
 
सरपणावर चूल पेटते आणि अन्न शिजतं. देशातले ७५ टक्के लोक आजही अन्न शिजवण्यासाठी 
सरपणावर अवलंबून आहेत. हे सरपण कमी लागावं म्हणून काही शास्त्रज्ञांनी चुलीत बर्‍याच सुधारणा केल्या आहेत. अशा चुलीत सरपण खूपच कमी लागतं, पण तरीही या चुली ग्रामीण भागात लोकप्रिय झाल्या नाहीत. अशी एक चूल मीही गेली दोन वर्षे वापरतो आहे; पण आमच्या गावातल्या एकानंही 
अशी चूल हवी असं म्हटलं नाही. काय असेल लोकांचं कारण? 
----------------------
हत्ती आणि आंधळ्यांची गोष्ट अतिप्रसिद्ध आहे. ही गोष्ट पुन्हा सांगण्याची गरज नाही, पण ही घडते मात्र वारंवार. डॉ. जगदीशचंद्र बसूंचे आपण जेमतेम नाव ऐकलेले असते. टिळकांचे जसे एकच वाक्य आपल्याला माहीत आहे, तसे डॉ. बसूंचेही - ‘वनस्पतींना भावना असतात’. त्यांनी शास्त्रात जी क्रांती घडवली त्याविषयी आपल्याला सूतराम माहिती नाही. त्यांनी भौतिकशास्त्रातल्या नियमांनी जीवशास्त्रातल्या गोष्टी सिद्ध करून दाखवल्या. शास्त्रा-शास्त्रात त्यावेळी कठोर भिंती होत्या, अगदी जातिपातीसारख्या. आमच्या शास्त्रातले याला काय कळते, अशी डॉ. बसूंची हेटाळणी त्या शास्त्रातल्या ब्रह्मवृंदांनी केली होती. बसूंच्या संशोधनानंतर खूप वर्षांनी त्यांची महती मान्य झाली. शास्त्राशास्त्रातल्या भिंती काहीशा ढासळल्या. आपल्याच शास्त्राच्या चष्म्यातून सत्य काय ते दिसते या धारणेतून शास्त्रज्ञ बाहेर येऊ लागले. आता याची पुढची पायरी गाठणे गरजेचे आहे.
नैसर्गिक शास्त्रे आणि समाजशास्त्रे यात अजूनही अस्पृश्यता आहे. ‘विहीर’ चित्रपटातला एक छान संवाद आहे - ‘‘आयुष्याला पाने तीन, आर्ट्स, कॉर्मस आणि सायन्स.’’ या तिन्हींचा आपापसात काही संबंध नाही, एकात शिरलेल्याला दुसरीकडे जाता येत नाही अशी आपली पक्की व्यवस्था. एका जातीत जन्म झाला की दुसर्‍यात जाता येत नाही तसेच हे. अनेक संशोधने घडतात, ती एकांगी शास्त्रअभ्यासातून. अणुबॉम्बचा शोध हा शास्त्रातला मोठा शोध होता. अणुबॉम्बचा शोध लावणार्‍या शास्त्रज्ञांना आपलं हे बाळ किती विध्वंस करू शकतं हे एकदा पाहण्याची मोठी उत्सुकता होती. त्यांच्या त्या संशोधनाची आणि उत्सुकतेची मोठी किंमत जगाला मोजावी लागली. जपाननं तर किंमत मोजलीच, पण आताही अनेक राष्ट्रे मोठा खर्च अण्वस्त्रसज्जतेवर करतच आहेत. तीही किंमत आहेच. आपल्या शास्त्राचे, नवोन्मेषाचे समाजावर काय परिणाम होणार आहेत याची जाणीव शास्त्रज्ञांना असायलाच हवी.
एका बाजूला शास्त्रज्ञांचे समाजांधळेपण, तर दुसर्‍या बाजूला समाजाचे अभिसरण घडवणार्‍या कार्यकर्त्या मंडळींमध्ये शास्त्राविषयी हेटाळणीचा भाव असतो. ‘त्यांना प्रयोगशाळेच्या बाहेरचं काय कळतंय’ असं म्हटलं जातं. ‘सगळं ज्ञान लोकांजवळच असतं’ असंही म्हटलं जातं. पारंपरिक ज्ञान लोकांकडे असतं हे खरंच आहे; पण बदलत्या काळात जेव्हा मृगात मृगासारखा पाऊस पडत नाही, जमिनीत शिरलेल्या रसायनांमुळे वनस्पतींमधल्या काही गुणांची हानी झाली आहे, तेव्हा पारंपरिक ज्ञानाची मात्रा लागू पडतेच असं नाही. उदंड जंगल असताना शेतीतल्या राबासारख्या काही रिती रूढ झाल्या. जमिनी मोकळ्या असताना फिरती शेती परवडण्याजोगी होती. आता जंगल आणि जमिनी दोन्हीचे माप आटले आहे. आता जुन्या नुस्ख्यांवर अवलंबून राहणे कसे परवडेल? यामुळे परंपरेचे एकांगी प्रेम हेही समाजशास्त्र्यांना सोडणे भाग आहे. आमच्या जवळचे एक उदाहरण आहे. सरपणावर चूल पेटते आणि अन्न शिजते. देशातले ७५ टक्के लोक आजही अन्न शिजवण्यासाठी सरपणावर अवलंबून आहेत. आमच्या अनुसूचित क्षेत्रात तर ८२ टक्के लोक सरपण वापरतात. हे सरपण कमी लागावे म्हणून काही शास्त्रज्ञांनी फार मौलिक संशोधन केले आहे. चुलीत एकेक करत त्यांनी बर्‍याच सुधारणा केल्या आहेत. अशा सर्व सुधारणा करून तयार झालेल्या चुलीत सरपण खूपच कमी लागते, पण तरीही या चुली ग्रामीण भागात लोकप्रिय झाल्या नाहीत. अशी एक चूल मीही गेली दोन वर्षे वापरतो आहे; पण आमच्या गावातल्या एकानंही अशी चूल हवी असं म्हटलं नाही. 
काय असेल लोकांचं कारण? 
ही चूल कार्यक्षम असल्यामुळे उष्णता अजिबात बाहेर जात नाही. म्हणजे या चुलीचा थंडीत-पावसात शेकायला उपयोग नाही. पावसाळ्यात जेव्हा कपडे वाळत नाहीत, तेव्हा चुलीवर एक चौकोनी शिंकाळे टांगून कपडे वाळवतात. तोही उपयोग या चुलीचा नाही. चुलीत फार सुधारणा केल्यामुळे या चुलीची किंमतही फार झाली आहे. त्यात सरकार किंवा एखाद्या संस्थेने सवलत दिली, तर किंमत उतरते खरी; पण आताची चूल तर पूर्ण फुकट आहे की! आताच्या चुलीत सरपण थोडं जास्त लागतं, लागू दे की, तेही फुकटच आहे. असं लोकांचं डोकं चालतं. सरपण वाचवण्याची गरज नेमकी कोणाला आहे, असा प्रश्न पडतो. 
ज्यांनी चुलीचं इतकं चांगलं भौतिकशास्त्रीय संशोधन केलं, त्यांनी जमिनीवरचं समाजशास्त्रही लक्षात घ्यायलाच हवं. आपल्या देशात गुणवत्तेपेक्षा पैसा वाचवणं महत्त्वाचं मानलं जातं. हे अर्थशास्त्रही समजायला हवं. म्हणून जगदीशचंद्रांची आठवण येते. शास्त्रांनी दरवाजे उघडून लोकांजवळ यावं, समभावानं एक प्रकाश शोधावा, तर खरी मजा येईल!
 
(लेखक समावेशक विकासासाठी काम करणार्‍या ‘वयम्’ चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)