शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रांचे उंबरठे ओलांडून..

By admin | Updated: February 21, 2015 14:07 IST

सरपणावर चूल पेटते आणि अन्न शिजतं. देशातले ७५ टक्के लोक आजही अन्न शिजवण्यासाठी सरपणावर अवलंबून आहेत. हे सरपण कमी लागावं म्हणून काही शास्त्रज्ञांनी चुलीत बर्‍याच सुधारणा केल्या आहेत.

मिलिंद थत्ते
 
सरपणावर चूल पेटते आणि अन्न शिजतं. देशातले ७५ टक्के लोक आजही अन्न शिजवण्यासाठी 
सरपणावर अवलंबून आहेत. हे सरपण कमी लागावं म्हणून काही शास्त्रज्ञांनी चुलीत बर्‍याच सुधारणा केल्या आहेत. अशा चुलीत सरपण खूपच कमी लागतं, पण तरीही या चुली ग्रामीण भागात लोकप्रिय झाल्या नाहीत. अशी एक चूल मीही गेली दोन वर्षे वापरतो आहे; पण आमच्या गावातल्या एकानंही 
अशी चूल हवी असं म्हटलं नाही. काय असेल लोकांचं कारण? 
----------------------
हत्ती आणि आंधळ्यांची गोष्ट अतिप्रसिद्ध आहे. ही गोष्ट पुन्हा सांगण्याची गरज नाही, पण ही घडते मात्र वारंवार. डॉ. जगदीशचंद्र बसूंचे आपण जेमतेम नाव ऐकलेले असते. टिळकांचे जसे एकच वाक्य आपल्याला माहीत आहे, तसे डॉ. बसूंचेही - ‘वनस्पतींना भावना असतात’. त्यांनी शास्त्रात जी क्रांती घडवली त्याविषयी आपल्याला सूतराम माहिती नाही. त्यांनी भौतिकशास्त्रातल्या नियमांनी जीवशास्त्रातल्या गोष्टी सिद्ध करून दाखवल्या. शास्त्रा-शास्त्रात त्यावेळी कठोर भिंती होत्या, अगदी जातिपातीसारख्या. आमच्या शास्त्रातले याला काय कळते, अशी डॉ. बसूंची हेटाळणी त्या शास्त्रातल्या ब्रह्मवृंदांनी केली होती. बसूंच्या संशोधनानंतर खूप वर्षांनी त्यांची महती मान्य झाली. शास्त्राशास्त्रातल्या भिंती काहीशा ढासळल्या. आपल्याच शास्त्राच्या चष्म्यातून सत्य काय ते दिसते या धारणेतून शास्त्रज्ञ बाहेर येऊ लागले. आता याची पुढची पायरी गाठणे गरजेचे आहे.
नैसर्गिक शास्त्रे आणि समाजशास्त्रे यात अजूनही अस्पृश्यता आहे. ‘विहीर’ चित्रपटातला एक छान संवाद आहे - ‘‘आयुष्याला पाने तीन, आर्ट्स, कॉर्मस आणि सायन्स.’’ या तिन्हींचा आपापसात काही संबंध नाही, एकात शिरलेल्याला दुसरीकडे जाता येत नाही अशी आपली पक्की व्यवस्था. एका जातीत जन्म झाला की दुसर्‍यात जाता येत नाही तसेच हे. अनेक संशोधने घडतात, ती एकांगी शास्त्रअभ्यासातून. अणुबॉम्बचा शोध हा शास्त्रातला मोठा शोध होता. अणुबॉम्बचा शोध लावणार्‍या शास्त्रज्ञांना आपलं हे बाळ किती विध्वंस करू शकतं हे एकदा पाहण्याची मोठी उत्सुकता होती. त्यांच्या त्या संशोधनाची आणि उत्सुकतेची मोठी किंमत जगाला मोजावी लागली. जपाननं तर किंमत मोजलीच, पण आताही अनेक राष्ट्रे मोठा खर्च अण्वस्त्रसज्जतेवर करतच आहेत. तीही किंमत आहेच. आपल्या शास्त्राचे, नवोन्मेषाचे समाजावर काय परिणाम होणार आहेत याची जाणीव शास्त्रज्ञांना असायलाच हवी.
एका बाजूला शास्त्रज्ञांचे समाजांधळेपण, तर दुसर्‍या बाजूला समाजाचे अभिसरण घडवणार्‍या कार्यकर्त्या मंडळींमध्ये शास्त्राविषयी हेटाळणीचा भाव असतो. ‘त्यांना प्रयोगशाळेच्या बाहेरचं काय कळतंय’ असं म्हटलं जातं. ‘सगळं ज्ञान लोकांजवळच असतं’ असंही म्हटलं जातं. पारंपरिक ज्ञान लोकांकडे असतं हे खरंच आहे; पण बदलत्या काळात जेव्हा मृगात मृगासारखा पाऊस पडत नाही, जमिनीत शिरलेल्या रसायनांमुळे वनस्पतींमधल्या काही गुणांची हानी झाली आहे, तेव्हा पारंपरिक ज्ञानाची मात्रा लागू पडतेच असं नाही. उदंड जंगल असताना शेतीतल्या राबासारख्या काही रिती रूढ झाल्या. जमिनी मोकळ्या असताना फिरती शेती परवडण्याजोगी होती. आता जंगल आणि जमिनी दोन्हीचे माप आटले आहे. आता जुन्या नुस्ख्यांवर अवलंबून राहणे कसे परवडेल? यामुळे परंपरेचे एकांगी प्रेम हेही समाजशास्त्र्यांना सोडणे भाग आहे. आमच्या जवळचे एक उदाहरण आहे. सरपणावर चूल पेटते आणि अन्न शिजते. देशातले ७५ टक्के लोक आजही अन्न शिजवण्यासाठी सरपणावर अवलंबून आहेत. आमच्या अनुसूचित क्षेत्रात तर ८२ टक्के लोक सरपण वापरतात. हे सरपण कमी लागावे म्हणून काही शास्त्रज्ञांनी फार मौलिक संशोधन केले आहे. चुलीत एकेक करत त्यांनी बर्‍याच सुधारणा केल्या आहेत. अशा सर्व सुधारणा करून तयार झालेल्या चुलीत सरपण खूपच कमी लागते, पण तरीही या चुली ग्रामीण भागात लोकप्रिय झाल्या नाहीत. अशी एक चूल मीही गेली दोन वर्षे वापरतो आहे; पण आमच्या गावातल्या एकानंही अशी चूल हवी असं म्हटलं नाही. 
काय असेल लोकांचं कारण? 
ही चूल कार्यक्षम असल्यामुळे उष्णता अजिबात बाहेर जात नाही. म्हणजे या चुलीचा थंडीत-पावसात शेकायला उपयोग नाही. पावसाळ्यात जेव्हा कपडे वाळत नाहीत, तेव्हा चुलीवर एक चौकोनी शिंकाळे टांगून कपडे वाळवतात. तोही उपयोग या चुलीचा नाही. चुलीत फार सुधारणा केल्यामुळे या चुलीची किंमतही फार झाली आहे. त्यात सरकार किंवा एखाद्या संस्थेने सवलत दिली, तर किंमत उतरते खरी; पण आताची चूल तर पूर्ण फुकट आहे की! आताच्या चुलीत सरपण थोडं जास्त लागतं, लागू दे की, तेही फुकटच आहे. असं लोकांचं डोकं चालतं. सरपण वाचवण्याची गरज नेमकी कोणाला आहे, असा प्रश्न पडतो. 
ज्यांनी चुलीचं इतकं चांगलं भौतिकशास्त्रीय संशोधन केलं, त्यांनी जमिनीवरचं समाजशास्त्रही लक्षात घ्यायलाच हवं. आपल्या देशात गुणवत्तेपेक्षा पैसा वाचवणं महत्त्वाचं मानलं जातं. हे अर्थशास्त्रही समजायला हवं. म्हणून जगदीशचंद्रांची आठवण येते. शास्त्रांनी दरवाजे उघडून लोकांजवळ यावं, समभावानं एक प्रकाश शोधावा, तर खरी मजा येईल!
 
(लेखक समावेशक विकासासाठी काम करणार्‍या ‘वयम्’ चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)