शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

जिल्हा परिषदेच्या शाळा खासगीपेक्षाही सरस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 06:37 IST

‘असर’चा अहवाल; पटनोंदणीचे प्रमाण ९९.२ टक्के

मुंबई : राज्यातील खासगी प्राथमिक शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांची कामगिरी चांगली असल्याचे ‘असर’च्या पाहणीत आढळून आले आहे. पाचवी व दुसरीच्या विद्यार्थ्यांची वाचनक्षमता आणि गणित विषयातील प्रावीण्यामुळे जिल्हा परिषद शाळांची कामगिरी सरस ठरल्याचे या अहवालात म्हटले आहे.

शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ‘प्रथम’ या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने, प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेणारी ‘असर’कडून राष्ट्रीय स्तरावर पाहणी करण्यात येते. या वर्षीच्या अहवालाचे प्रकाशन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. हे सर्वेक्षण ३३ जिल्ह्यांतील ९९० गावांमधीला १९,७६५ घरांमध्ये करण्यात आले. १४ सामाजिक संस्था, २१ विश्वविद्यालये आणि महाविद्यालयातर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले. या अहवालानुसार, महाराष्ट्रातील शाळेत जाणाºया मुलांची पटनोंदणीचे प्रमाण ९९.२ टक्के इतके आहे.सुविधेत वाढ : मुलींकरिता स्वतंत्र, स्वच्छ व वापरण्यायोग्य शौचालयाचे प्रमाण ६३.९% . माध्यान्ह भोजन ९४.७% शाळांमध्ये. ९१.८% शाळांमध्ये वीजपुरवठा आहे.इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रजिल्हा परिषद शाळांतील इयत्ता ५वीच्या मुलांचे वजाबाकी व त्यापेक्षा अधिक गणिते सोडविण्याचे प्रमाण २,०१४ राज्यांच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येते.राजस्थानमध्ये हे प्रमाण ३४.२, तामिळनाडूमध्ये ६२.६%, तर हिमाचल प्रदेशमध्ये ७१.५% इतके आहे.तर महाराष्ट्रात २०१४ मध्ये ३८.३६ टक्के इतके होते, ते २०१८ मध्ये वाढून ५९.९ टक्के झाले. महाराष्ट्रात हे प्रमाण २१.३ टक्क्यांनी वाढले आहे.हे अशास्त्रीय सर्वेक्षण : ‘असर’चा हा अहवाल अशास्त्रीय आहे. पाहणी ही दहावी नापास विद्यार्थ्यांकडून होत असल्याचा दावा सोलापूरचे शिक्षक रणजित डिसले यांनी केला.उच्च प्राथमिक शाळा मागे!उच्च प्राथमिक शाळांतील मुलांच्या वाचन व गणित क्षमतेत मागील वर्षाच्या तुलनेत फारसा बदल नाही. महाराष्ट्रातील इयत्ता ८वीच्या १९.८ टक्के मुलांना इयत्ता दुसरीचा मजकूर वाचता आला नाही. याचा अर्थ, या वयोगटातील सुमारे एक पंचमांश मुले पुढील शिक्षणासाठी तयार नाहीत. गणिताची परिस्थिती यापेक्षा बिकट आहे.

टॅग्स :Schoolशाळा