शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “धनुष्यबाण शिंदे गटाकडे गेल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरेल, दंगल...”; युवासेनेचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 15:08 IST

Maharashtra News: शिंदे गट आणि निवडणूक आयोगाने ‘५० खोके एकदम ओके’ कार्यक्रम केला, तर ठाकरेंचे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा शरद कोळींनी दिला.

Maharashtra Politics: शिवसेना आणि पक्ष चिन्हाबाबत शिंदे-ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनाला मोठा धक्का देत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला मोठा दिलासा दिला. निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने पुढील कार्यवाही करण्यास होकार दिला आहे. यामुळे पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावर निवडणूक आयोग कार्यवाही करण्यास मोकळा झाला आहे. यानंतर जर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले, तर ठाकरेंचा शिवसैनिक रस्त्यावर उतरेल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल, असा गंभीर इशारा युवासेनेकडून देण्यात आला आहे. 

युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शरद कोळी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासूनच शिंदे गटावर सातत्याने सडकून टीका करताना पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हे फक्त एकनाथ शिंदे असतील. निवडणूक आयोग शिंदे गटाला चिन्ह देईल असा गौप्यस्फोट केल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर शरद कोळी आक्रमक झाले असून, असे झाल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरेल. दंगलही होऊ शकेल. राज्यभरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा दिला आहे. 

अब्दुल सत्तार म्हणजे उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग

अब्दुल सत्तार म्हणजे उतावळा नवरा , गुडघ्याला बाशिंग. शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण देण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगावर सोपवली आहे. निवडणूक आयोग जर पक्षपाती करत निर्णय दिला किंवा शिंदे गट आणि निवडणूक आयोग यांनी जर ‘५० खोके एकदम ओके’ कार्यक्रम केला, तर उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, अशा इशारा देत, संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा आहे, असे ठणकावून सांगितले आहे. 

दरम्यान, अलीकडेच तानाजी सावंत यांनी केलेल्या विधानावरूनही शरद कोळी यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले होते. उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगणाऱ्यांना ठेचून काढू. शिंदे गटातील मंत्र्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तोंड सांभाळून बोलावे. सत्ता कायमची नसते, सत्ता येते आणि जाते. पण उद्धव ठाकरेंबाबत एकही अपशब्द काढू नये. छत्रपती शिवाजी महाराज कधीच दिल्ली समोर झुकले नाहीत. शिवाजी महाराजांना मुघलांकडून अनेकदा बोलावणे आले होते. पण शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी त्यांनी कधीच दिल्ली समोर झुकले नाहीत. उद्धव ठाकरे देखील झुकणार नाही, असे शरद कोळी यांनी म्हटले होते.

 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगAaditya Thackerayआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे