शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू; नायगांव तालुक्यातील भोपाळा येथील दुर्दैवी घटना

By हितेंद्र.सिताराम.काळुंखे | Updated: September 9, 2022 19:25 IST

नायगाव तालुक्यातील भोपाळा येथील सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तरुण युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क नायगांव

नायगाव तालुक्यातील भोपाळा येथील सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तरुण युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.९ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.

सविस्तर माहिती अशी की दर वर्षी प्रमाणे याहीवर्षी  बसवण्यात आलेल्या सार्वजनिक युवा गणेश मंडळ गणपतीचे विसर्जन करण्यासाठी दि.९ सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या पाझर तलावात गणपतीला सोडन्यासाठी पाण्यात उतरलेल्या शिवकुमार बाबुराव हत्तीनगरे वय  20 वर्ष या तरुण युवकाचा पाझर तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यातील गाळात बसून तो पाण्यात अडकल्याने गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुण युवकाची एकच धांदल उडाली होती. गणपती सोडण्यासाठी गेलेला तरुण युवक पाण्यात फसला ह्या घटनेची माहिती माजी सरपंच आनंदराव पाटील बावणे यांनी रामतीर्थ पोलिस व तहसील प्रशासनाला कळवली.  रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी संकेत दिघे यासह पोलीस कर्मचारी व नायगाव तहसीलचे तहसीलदार गजानन शिंदे, तलाठी विजय पाटील यासह गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पाण्यात फसलेल्या युवकाला पाण्याबाहेर काढण्यासाठी तब्बल दीड तास प्रयत्न केले परंतु अनेकांना तो हाताला लागत नसल्याने हनमंत हत्तीनगरे, बाबुराव हातीनगरे, व्यंकट हातीनगरे , आनंदा मष्णाजी कोठेवाढ यांनी गळाच्या साह्याने पाण्यात फसलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात यशस्वी झाले परंतु तब्बल दीड तास पाण्यात अडकल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

सदरील घटनेचा रामतीर्थ पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिले असून या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे भोपळा व शंकर नगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिवकुमार हत्तीनगरे हा एकुलता एक मुलगा होता तो शंकरनगर येथील गोदावरी मनार कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता त्यांच्या या अकाली निधनामुळे आई वडिलांचा आधार गेला असून त्यांच्या वयोवृद्ध आई-वडिलास शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून केल्या जात आहे.

टॅग्स :Accidentअपघात