शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आमचे आरक्षण रद्द झाले तर तुमचे ऑटोमॅटिक रद्द होईल; जरांगे पाटलांचे भुजबळांना जशास तसे प्रत्यूत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 18:25 IST

शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीवर त्यांना वाटतेय आपली तर दहशत आहे. असो वयोमानानुनार होत असते. त्यांचे केस पांढरे होऊन काय फायदा झाला. - जरांगे पाटील

हिंगोलीतील ओबीसी एल्गार सभेमध्ये छगन भुजबळ यांनी शिंदे समिती रद्द करण्याची मोठी मागणी केली, तसेच गेल्या दोन महिन्यांत देण्याची आलेली कुणबी प्रमाणपत्रे देखील रद्द करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली होती. यावर आजा जरांगे पाटलांनी प्रत्यूत्तर दिले आहे. 

शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीवर त्यांना वाटतेय आपली तर दहशत आहे. असो वयोमानानुनार होत असते. त्यांचे केस पांढरे होऊन काय फायदा झाला. कायद्याच्या पदावर बसायचे आणि असली भाषा बोलायची. त्यांना चांगले माहीत आहे त्यांनी काय काय खुंट्या ठोकून ठेवल्यात त्या, आता आम्हीही खुंट्या तयार ठेवल्या आहेत, असा इशारा पाटलांनी दिला आहे.

जोडायला अक्कल लागते हे आधीच त्यांना कळायला हवे होते. मराठ्यांनी त्यांना उंचीवर नेऊन ठेवले, हे त्यांना कळायला हवे होते. गावबंदी हटाववरून त्यांना पदाचा गैरवापर करायचा आहे का असा सवाल करत लोक गावात येऊ नका हे हक्काने सांगतायत. यांना हक्क कळतो का, असा सवाल भुजबळ यांना केला. तसेच तुम्ही अटक का केली याच कारण सांगा. आमच्या लोकांचं काय चुकलं? तुम्हाला काय बोलावे हेच कळत नाहीय. समाज मला काय कुणालाही पडताळून बघू शकत नाही. महाराष्ट्रातील मराठा समाज आमचा नाही हे मी म्हणू शकत नाही. फक्त मराठा आरक्षणाचा कायदा सांगा दुसरे सांगू नका, असे जरांगे पाटील म्हणाले. 

आमच्या लोकांनी मार खाल्ला. पोलिसांनी त्यांना गोळ्या मारल्या. यांचे केस असेच पांढरे झालेत का, तुम्ही असेच पांढरे झाले का? जाती जातीत द्वेष पसरवतायत असा आरोप करत जरांगे पाटलांनी  शिव्या देणाऱ्या लोकांचं मी समर्थन करत नाही कुणी त्यांच्या अंगावर जाऊ नये, असा सल्ला दिला. तसेच यांना कुठे झुंडशाही दिसली. त्यांचेच पाहुणे आहेत हॉटेल जाळणारे पण हे लोकांवर ढकलतात असा आरोप जरांगे यांनी केला. 

आमचे आरक्षण रद्द झाले तर तुमचे ऑटोमॅटिक रद्द होईल, कारण ओबीसींच्या शासकीय नोंदी नाहीत. तुम्ही ओबीसी आणि मागास नाही, आम्हाला कुणीही बाहेर काढू शकत नाही.  मी दिवस रात्र सांगतोय, ओबीसी मराठा यांनी एकमेकांच्या अंगावर जायचे नाही. बोर्ड काढा हे त्यांचे आवाहन जातीयवादी नाही तर काय आहे. मी पाय तोडून घ्यायला तयार, पण आरक्षण मिळवूनच दाखवणार आहे. या सभेला त्यांनी दंगल सभा नाव द्यायला हवे. ते पांढरे झाले जुनाट नेते आहेत, असा टोला जरांगे पाटलांनी तायवाडे यांना लगावला. 

मी आता त्यांना संताजी धनाजीसारखा दिसत आहे. कितीही दंगली भडकवण्याचा प्रयत्न करूद्या. मराठ्यांनी शांतपणे आंदोलन करावे. जुन्या नेत्यांना मी सल्ले देत नाही. खोट्या केसेसचा त्रास सहन करा, पण शांत बसा. शांतपणे सहन करा, एकजूट वाढवा, आपण आरक्षण घेऊच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChagan Bhujbalछगन भुजबळOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण