शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

युवा नेत्यांनीही गाजविले लोकसभेच्या प्रचाराचे मैदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 02:51 IST

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाने महाराष्ट्रातील प्रचाराची रणधुमाळी थांबली. एकीकडे राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील नेते एकमेकांना भिडले असताना युवा नेत्यांनीही प्रचाराची धुरा सांभाळत मैदान गाजविल्याचे यंदाच्या प्रचारादरम्यान पाहायला मिळाले.

मुंबई : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाने महाराष्ट्रातील प्रचाराची रणधुमाळी थांबली. एकीकडे राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील नेते एकमेकांना भिडले असताना युवा नेत्यांनीही प्रचाराची धुरा सांभाळत मैदान गाजविल्याचे यंदाच्या प्रचारादरम्यान पाहायला मिळाले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर आदी नेते चर्चेत होते.

आदित्य ठाकरे यांनी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी नियमित रॅली, सभा, प्रचारफेऱ्यांच्या जोडीने ‘आदित्य संवाद’ हा विशेष उपक्रम राबविला. पहिल्या टप्प्यात मुंबईसह पाच जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी सहा लाख युवकांशी थेट तर १५ युवकांशी डिजिटली संपर्क साधण्याचे उद्दिष्ठ ठेवले होते. नेहमीच्या राजकीय संवादाच्या स्वरूपाला या वेळी फाटा देण्यात आला होता. रॅम्प, चालत-बोलत साधलेला संवाद आणि उपस्थित युवा वर्गाकडून येणारे हरत-हेचे प्रश्न असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. मुंबईतील कार्यक्रमात तर त्यांना लग्न, डेटींगबाबतही थेट प्रश्न केला होता. प्रचार आणि अन्य कार्यक्रमादरम्यान अनेक लोक भेटत असतात. स्थळ वगैरे येतात का, पाहता का, लग्नाचे काय, असा सवाल करण्यात आला. त्यावर सध्या प्रचाराच्या रणधुमाळीत आहे,‘आधी लगीन लोकसभा निवडणुकीचे आणि नंतर बाकी...’ अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी हा प्रश्न टोलविला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रचाराबाबत विचारलेल्या प्रश्नांना आदित्य यांनी दिलेली उत्तरांचीही या प्रचारादरम्यान चर्चा झाली.

सुजात आंबेडकरांच्या निमित्ताने एक नवीनच नाव यंदाच्या प्रचारात समोर आले. प्रकाश आंबेडकरांच्या सोलापूर येथील प्रचाराची धुरा सुजातकडे होती. मुलाखती, भाषणे, प्रचार आणि राजकीय आरोपप्रत्यारोपातून प्रथमच सुजातची महाराष्ट्राला ओळख घडत होती. याशिवाय अन्य युवा नेतेही प्रचारात होते. यातील काही स्वत: उमेदवार होते तर काही संसदीय राजकारणात महत्वाची पदे अथवा जबाबदारी सांभाळत आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक