शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

करिअरसाठी कक्षेबाहेर डोकावणे गरजेचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:55 IST

बारावी पास करून अभियांत्रिकीत करिअर करू इच्छिणाºया पाल्याला ‘जेईई मेन’मध्ये चांगले मार्क्स मिळाले असतील तर, अग्नी विषयात अभियांत्रिकीची पदवी घेऊन एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळविणे हा एक उत्तम पर्याय आहे

ठळक मुद्देबारावी पास करून अभियांत्रिकीत करिअर करू इच्छिणाºया पाल्याला ‘जेईई मेन’मध्ये चांगले मार्क्स मिळाले असतील तर, अग्नी विषयात अभियांत्रिकीची पदवी घेऊन एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळविणे हा एक उत्तम पर्याय आहे

बारावी विज्ञान शाखेनंतर काय? प्रत्येक विद्यार्थी, आईवडिलांना पडलेला प्रश्न. त्यातच अभियांत्रिकीत प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक पालकाला वाटते की, आपल्या पाल्याने संगणक शाखेतून अभियांत्रिकीची पदवी मिळवावी व एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी करावी. परंतु सध्या ती परिस्थती राहिलेली नाही. आपल्या पाल्याच्या करिअरचा विचार करून सर्व पालकांनी थोडे कक्षेबाहेर डोकावणे गरजेचे आहे.

बारावी पास करून अभियांत्रिकीत करिअर करू इच्छिणाºया पाल्याला ‘जेईई मेन’मध्ये चांगले मार्क्स मिळाले असतील तर, अग्नी विषयात अभियांत्रिकीची पदवी घेऊन एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळविणे हा एक उत्तम पर्याय आहे; परंतु याबाबत आपण शहरवासीय - महाराष्टÑीय फारच अनभिज्ञ, उदासीन आहोत. महाराष्टÑात वसलेल्या या भारतातील एकमेव शिक्षण संस्थेचा फायदा इतर राज्यांतील विद्यार्थीच जास्त घेत असून, आजमितीस शिक्षण पूर्ण केलेले हे सर्व विद्यार्थी उच्च पद भूषवित आहेत किंवा मोठ्या पगाराच्या नोकºया अथवा व्यवसाय करीत आहेत.भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर (एनएफएसी) या महाविद्यालयात अग्नी विषयात इंजिनीअरिंगची पदवी (इ.ए. - ऋ्र१ी) हा चार वर्षांचा पाठ्यक्रम १९७८ पासून चालवला जातो. या पाठ्यक्रमाला (अकउळए) ची मान्यता असूनही प्रशिक्षण संस्थेशी (फळटठव) संलग्न आहे. या पाठ्यक्रमाच्या सहाव्या बॅचची प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरू झाली असून ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करता येतील. या पाठ्यक्रमाला दरवर्षी ६० जणांना ‘जेईई मेन’च्या सी.आर.एल. रँकवरून प्रवेश दिला जातो. याव्यतिरिक्त शारीरिक मोजमापे योग्य असणेही प्रवेशासाठी आवश्यक आहे.चार वर्षे जरी प्रशिक्षण संस्थेत राहावे लागत असले तरी पाठ्यक्रम पूर्ण होताच कॅम्पसच्या मुलाखतीत मुलांना बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी सहज मिळते.नोकरीव्यतिरिक्त अग्निशमनच्या यंत्रसामग्रीतही व्यवसाय करायला भरपूर वाव असून, इ.ए. - ऋ्र१ी ही पदवी मिळाल्यानंतर या विषयात पीएच.डी. करून सेंट्रल बिल्डिंग रीसर्च इन्स्टिट्यूट (उइफक), रुरकीसारख्या ठिकाणी वैज्ञानिक म्हणून काम करू शकतो. परंतु पदवी घेतलेले बरेच विद्यार्थी नोकरी हाच पर्याय निवडतात व पुढील काळात स्वास्थ्य, सुरक्षा व पर्यावरणाचे मान्यताप्राप्त छोट्या कालावधीचे पाठ्यक्रम पूर्ण करून आपल्या करिअरला झळाळी देऊन स्वास्थ्य, सुरक्षा व पर्यावरण विभागाच्या उच्च पदावर विराजमान होतात. सर्वच राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपनीत या विभागाला फार महत्त्व असून नोकरीच्या भरपूर संधी देश-विदेशात, जास्त करून आखाती देशात उपलब्ध आहेत.

(लेखक मुंबई अग्निशमन दलाचे माजी अधिकारी आहेत.)सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांनी करिअरसाठी कक्षेबाहेर डोकावणे गरजेचे आहे. अग्नी विषयात अभियांत्रिकीची पदवी घेऊन एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळविणे हा एक उत्तम पर्याय आहे. परंतु याबाबत आपण शहरवासीय - महाराष्टÑीय फारच अनभिज्ञ, उदासीन आहोत.