शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

करिअरसाठी कक्षेबाहेर डोकावणे गरजेचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:55 IST

बारावी पास करून अभियांत्रिकीत करिअर करू इच्छिणाºया पाल्याला ‘जेईई मेन’मध्ये चांगले मार्क्स मिळाले असतील तर, अग्नी विषयात अभियांत्रिकीची पदवी घेऊन एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळविणे हा एक उत्तम पर्याय आहे

ठळक मुद्देबारावी पास करून अभियांत्रिकीत करिअर करू इच्छिणाºया पाल्याला ‘जेईई मेन’मध्ये चांगले मार्क्स मिळाले असतील तर, अग्नी विषयात अभियांत्रिकीची पदवी घेऊन एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळविणे हा एक उत्तम पर्याय आहे

बारावी विज्ञान शाखेनंतर काय? प्रत्येक विद्यार्थी, आईवडिलांना पडलेला प्रश्न. त्यातच अभियांत्रिकीत प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक पालकाला वाटते की, आपल्या पाल्याने संगणक शाखेतून अभियांत्रिकीची पदवी मिळवावी व एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी करावी. परंतु सध्या ती परिस्थती राहिलेली नाही. आपल्या पाल्याच्या करिअरचा विचार करून सर्व पालकांनी थोडे कक्षेबाहेर डोकावणे गरजेचे आहे.

बारावी पास करून अभियांत्रिकीत करिअर करू इच्छिणाºया पाल्याला ‘जेईई मेन’मध्ये चांगले मार्क्स मिळाले असतील तर, अग्नी विषयात अभियांत्रिकीची पदवी घेऊन एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळविणे हा एक उत्तम पर्याय आहे; परंतु याबाबत आपण शहरवासीय - महाराष्टÑीय फारच अनभिज्ञ, उदासीन आहोत. महाराष्टÑात वसलेल्या या भारतातील एकमेव शिक्षण संस्थेचा फायदा इतर राज्यांतील विद्यार्थीच जास्त घेत असून, आजमितीस शिक्षण पूर्ण केलेले हे सर्व विद्यार्थी उच्च पद भूषवित आहेत किंवा मोठ्या पगाराच्या नोकºया अथवा व्यवसाय करीत आहेत.भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर (एनएफएसी) या महाविद्यालयात अग्नी विषयात इंजिनीअरिंगची पदवी (इ.ए. - ऋ्र१ी) हा चार वर्षांचा पाठ्यक्रम १९७८ पासून चालवला जातो. या पाठ्यक्रमाला (अकउळए) ची मान्यता असूनही प्रशिक्षण संस्थेशी (फळटठव) संलग्न आहे. या पाठ्यक्रमाच्या सहाव्या बॅचची प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरू झाली असून ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करता येतील. या पाठ्यक्रमाला दरवर्षी ६० जणांना ‘जेईई मेन’च्या सी.आर.एल. रँकवरून प्रवेश दिला जातो. याव्यतिरिक्त शारीरिक मोजमापे योग्य असणेही प्रवेशासाठी आवश्यक आहे.चार वर्षे जरी प्रशिक्षण संस्थेत राहावे लागत असले तरी पाठ्यक्रम पूर्ण होताच कॅम्पसच्या मुलाखतीत मुलांना बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी सहज मिळते.नोकरीव्यतिरिक्त अग्निशमनच्या यंत्रसामग्रीतही व्यवसाय करायला भरपूर वाव असून, इ.ए. - ऋ्र१ी ही पदवी मिळाल्यानंतर या विषयात पीएच.डी. करून सेंट्रल बिल्डिंग रीसर्च इन्स्टिट्यूट (उइफक), रुरकीसारख्या ठिकाणी वैज्ञानिक म्हणून काम करू शकतो. परंतु पदवी घेतलेले बरेच विद्यार्थी नोकरी हाच पर्याय निवडतात व पुढील काळात स्वास्थ्य, सुरक्षा व पर्यावरणाचे मान्यताप्राप्त छोट्या कालावधीचे पाठ्यक्रम पूर्ण करून आपल्या करिअरला झळाळी देऊन स्वास्थ्य, सुरक्षा व पर्यावरण विभागाच्या उच्च पदावर विराजमान होतात. सर्वच राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपनीत या विभागाला फार महत्त्व असून नोकरीच्या भरपूर संधी देश-विदेशात, जास्त करून आखाती देशात उपलब्ध आहेत.

(लेखक मुंबई अग्निशमन दलाचे माजी अधिकारी आहेत.)सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांनी करिअरसाठी कक्षेबाहेर डोकावणे गरजेचे आहे. अग्नी विषयात अभियांत्रिकीची पदवी घेऊन एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळविणे हा एक उत्तम पर्याय आहे. परंतु याबाबत आपण शहरवासीय - महाराष्टÑीय फारच अनभिज्ञ, उदासीन आहोत.