शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

करिअरसाठी कक्षेबाहेर डोकावणे गरजेचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:55 IST

बारावी पास करून अभियांत्रिकीत करिअर करू इच्छिणाºया पाल्याला ‘जेईई मेन’मध्ये चांगले मार्क्स मिळाले असतील तर, अग्नी विषयात अभियांत्रिकीची पदवी घेऊन एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळविणे हा एक उत्तम पर्याय आहे

ठळक मुद्देबारावी पास करून अभियांत्रिकीत करिअर करू इच्छिणाºया पाल्याला ‘जेईई मेन’मध्ये चांगले मार्क्स मिळाले असतील तर, अग्नी विषयात अभियांत्रिकीची पदवी घेऊन एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळविणे हा एक उत्तम पर्याय आहे

बारावी विज्ञान शाखेनंतर काय? प्रत्येक विद्यार्थी, आईवडिलांना पडलेला प्रश्न. त्यातच अभियांत्रिकीत प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक पालकाला वाटते की, आपल्या पाल्याने संगणक शाखेतून अभियांत्रिकीची पदवी मिळवावी व एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी करावी. परंतु सध्या ती परिस्थती राहिलेली नाही. आपल्या पाल्याच्या करिअरचा विचार करून सर्व पालकांनी थोडे कक्षेबाहेर डोकावणे गरजेचे आहे.

बारावी पास करून अभियांत्रिकीत करिअर करू इच्छिणाºया पाल्याला ‘जेईई मेन’मध्ये चांगले मार्क्स मिळाले असतील तर, अग्नी विषयात अभियांत्रिकीची पदवी घेऊन एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळविणे हा एक उत्तम पर्याय आहे; परंतु याबाबत आपण शहरवासीय - महाराष्टÑीय फारच अनभिज्ञ, उदासीन आहोत. महाराष्टÑात वसलेल्या या भारतातील एकमेव शिक्षण संस्थेचा फायदा इतर राज्यांतील विद्यार्थीच जास्त घेत असून, आजमितीस शिक्षण पूर्ण केलेले हे सर्व विद्यार्थी उच्च पद भूषवित आहेत किंवा मोठ्या पगाराच्या नोकºया अथवा व्यवसाय करीत आहेत.भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर (एनएफएसी) या महाविद्यालयात अग्नी विषयात इंजिनीअरिंगची पदवी (इ.ए. - ऋ्र१ी) हा चार वर्षांचा पाठ्यक्रम १९७८ पासून चालवला जातो. या पाठ्यक्रमाला (अकउळए) ची मान्यता असूनही प्रशिक्षण संस्थेशी (फळटठव) संलग्न आहे. या पाठ्यक्रमाच्या सहाव्या बॅचची प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरू झाली असून ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करता येतील. या पाठ्यक्रमाला दरवर्षी ६० जणांना ‘जेईई मेन’च्या सी.आर.एल. रँकवरून प्रवेश दिला जातो. याव्यतिरिक्त शारीरिक मोजमापे योग्य असणेही प्रवेशासाठी आवश्यक आहे.चार वर्षे जरी प्रशिक्षण संस्थेत राहावे लागत असले तरी पाठ्यक्रम पूर्ण होताच कॅम्पसच्या मुलाखतीत मुलांना बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी सहज मिळते.नोकरीव्यतिरिक्त अग्निशमनच्या यंत्रसामग्रीतही व्यवसाय करायला भरपूर वाव असून, इ.ए. - ऋ्र१ी ही पदवी मिळाल्यानंतर या विषयात पीएच.डी. करून सेंट्रल बिल्डिंग रीसर्च इन्स्टिट्यूट (उइफक), रुरकीसारख्या ठिकाणी वैज्ञानिक म्हणून काम करू शकतो. परंतु पदवी घेतलेले बरेच विद्यार्थी नोकरी हाच पर्याय निवडतात व पुढील काळात स्वास्थ्य, सुरक्षा व पर्यावरणाचे मान्यताप्राप्त छोट्या कालावधीचे पाठ्यक्रम पूर्ण करून आपल्या करिअरला झळाळी देऊन स्वास्थ्य, सुरक्षा व पर्यावरण विभागाच्या उच्च पदावर विराजमान होतात. सर्वच राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपनीत या विभागाला फार महत्त्व असून नोकरीच्या भरपूर संधी देश-विदेशात, जास्त करून आखाती देशात उपलब्ध आहेत.

(लेखक मुंबई अग्निशमन दलाचे माजी अधिकारी आहेत.)सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांनी करिअरसाठी कक्षेबाहेर डोकावणे गरजेचे आहे. अग्नी विषयात अभियांत्रिकीची पदवी घेऊन एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळविणे हा एक उत्तम पर्याय आहे. परंतु याबाबत आपण शहरवासीय - महाराष्टÑीय फारच अनभिज्ञ, उदासीन आहोत.