शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'मल्लिकार्जुन खरगेंचे घर जाळले...मतांसाठी कुटुंबीयांचे बलिदान विसरले', CM योगींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 18:05 IST

Yogi Adityanath on Mallikarjun Kharge : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे.

Yogi Adityanath on Mallikarjun Kharge : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आपली पूर्ण ताकद लावत आहेत. एकीकडे काँग्रेस भाजपवर संविधनाच्या मुद्द्यावरुन टीका करत आहेत, तर दुसरीकडे भाजप 'बटेंगे तो कटेंगे' म्हणत काँग्रेसवर विभाजनाचे राजकारण करत असल्याची टीका करत आहे. यादरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या टीकेला आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

योगींचा खर्गेंवर जोरदार प्रहार योगी आदित्यनाथ आपल्या प्रत्येक प्रचारसभेत 'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा करत आहेत. ही घोषणा संविधानविरोधी असल्याची टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. त्यावर आता योगी आदित्यनाथ महाराष्ट्रातील अचलपूर येथील सभेत बोलताना म्हणाले की, 'निजामाच्या रझाकारांनी मल्लिकार्जुन खरगे यांचे गाव जाळले होते. त्यात त्यांची आई, मावशी आणि बहीण मरण पावले. पण, खरगे खरं बोलायला घाबरतात, कारण निजामावर आरोप केले तर मुस्लिम मते मिळणार नाहीत. रझाकारांनी हिंदूंच्या कत्तली केल्या, पण, खरगेंना सत्य स्वीकारायचे नाही. मतांसाठी खरगे कुटुंबाचा त्याग विसरले.' 

काय म्हणाले होते मल्लिकार्जुन खरगे?

झारखंडमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेवर निशाणा साधला होता. त्यांनी या घोषणेला दहशतवाद्यांची भाषा म्हटले. यावेळी त्यांनी योगी आदित्यनाथ यांची तुलना दहशतवाद्यांशी केली होती. यावरुनदेखील मोठा वाद झाला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४yogi adityanathयोगी आदित्यनाथMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे