शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

काल चारचाकींना टोलमाफी म्हणाले, आज फडणवीसांनी शब्द बदलले; मनसेच्या खळखट्याकनंतर सावध झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 16:43 IST

Devendra Fadanvis on Toll Free: राज्यातल्या सर्व टोलवर फोर व्हिलर किंवा छोट्या गाड्यांना आपण टोलमुक्त केले आहे. केवळ व्यावसायिक वाहनांवरच आपण टोल आकारतो, राज्य सरकारकडून आपण पैसे दिलेले आहेत असे फडणवीस म्हणाले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कालच्या टोलमाफीच्या वक्तव्यावरून आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना टोलनाक्यांवर जाण्याचे आदेश दिले होते. कार्यकर्त्यांना अडविले तर टोलनाके जाळून टाकू असा इशाराही दिला होता. परंतू, मनसे आक्रमक झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनी कालच्या त्यांच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे. 

२०१५ मध्ये आम्ही जी घोषणा केली होती त्यानुसार राज्यातल्या सर्व टोलवर फोर व्हिलर किंवा छोट्या गाड्यांना आपण टोलमुक्त केले आहे. केवळ व्यावसायिक वाहनांवरच आपण टोल आकारतो, राज्य सरकारकडून आपण पैसे दिलेले आहेत असे फडणवीस म्हणाले होते. यावरून राज ठाकरेंनी कारचालकांकडून आजही टोल वसुली केली जात असल्याचे म्हणत मनसेचे कार्यकर्ते प्रत्येक टोलनाक्यावर जातील आणि पाहणी करतील, टोल न घेता गाड्या सोडल्या जात नाहीएत. त्यांना अडविले तर टोलनाके जाळणार असल्याचे राज यांनी म्हटले होते.

यावर आता फडणवीसांचे स्पष्टीकरण आले आहे. 2015 रोजी 12 टोलनाक्यांवरील टोलवसुली बंद करण्यात आली आहे. पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसीच्या 53 टोलनाक्यांवर कार जीप आणि एसटीला टोल आकरला जात नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फडणवीसांचं विधान अर्धसत्य असल्याचे सांगितले. वेलणकर म्हणाले की,  २०१५ साली काही टोलनाके बंद केले होते, तर काही ठिकाणी चारचाकी वाहनांना सूट दिली होती. त्यात पुणे-औरंगाबाद रोडवरील टोल आहे. परंतु सगळ्याच ठिकाणी चारचाकी वाहनांना सूट देण्यात आली नाही. आजही मुंबई-पुणे जुना हायवे, मुंबई प्रवेश एन्ट्री पाँईट(वाशी, दहिसर, ऐरोली, मुलुंड) त्याचसोबतचे MSRDC चे टोलनाके, मुंबई-वांद्रे सागरी महामार्ग, समृद्धी महामार्ग याठिकाणी चारचाकी वाहनांना टोल आकारला जातो असं त्यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसtollplazaटोलनाकाRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे