शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

काल शिंदेंनी आमदारांना भोजनाला बोलवलेले, पण रद्द केले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 12:17 IST

मोदींचे भाषण काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर होते, महागाई, चीनचा धोका यावर शब्द काढला नाही. - संजय राऊत

नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव का आणावा लागला? कारण या देशातील एक राज्य गेल्या साडे तीन महिन्यापासून हिंसेच्या वनव्यात पेटलेले आहे. महिलांची नग्न धिंड काढली जात आहे. मोदी यासंदर्भात संसदेत येऊन निवेदन करण्यास तयार नव्हते. म्हणून अविश्वास ठराव आणावा लागल्याचे ठाकरे गट शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. मोदींनी विक्रमी भाषण केले आणि त्यात केवळ अडीच मिनिटेच मणिपूरवर बोलले, अशी टीका राऊत यांनी केली.  

मोदींचे भाषण काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर होते, महागाई, चीनचा धोका यावर शब्द काढला नाही. मणिपूरच्या समस्येला नेहरू जबाबदार आहेत असे ते म्हणतात. आता नेहरूंच्या प्रेमातून बाहेर पडा, दहा वर्ष आपले सरकार आहे, आपण काय केले? मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी होते आपण काय केले तेव्हा? पण जसे संताजी धनाजी दिसायचे तसे यांना नेहरू दिसतात. नेहरू हे फार मोठे नेते, त्यांना जगाची मान्यता आहे, तुम्ही सत्ता सोडा, तुम्ही कोणत्या राज्याचा प्रश्न सोडवला? आमच्या बेळगावचा प्रश्न तरी सोडवा, शांतीचा सूर्य कधी उगवेल? तुमचा सूर्य मावळणार आहे, 2024 ला ते बघा, असा इशारा राऊत यांनी दिला. 

फ्लाइंग किस काय असते? फ्लाइंग किस म्हणजे आपले प्रेम व्यक्त करण्याचे नवीन पिढीचे ते एक साधन आहे. आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांच्या बायकांचे फ्लाइंग किस पाहिलेले आहेत. राहुल गांधी यांनी फ्लाइंग किस दिले म्हणजे कोणाचा विनयभंग केले का? त्यांनी अत्यंत प्रेमाने आपल्या भावना व्यक्त केल्या, मोदींनी देखील फ्लाइंग किस द्यावा त्यांना कोणी अडवले आहे, असेही खोचकपणे राऊत म्हणाले. 

काल मुख्यमंत्री यांनी आपल्या आमदारांसाठी एक जेवण ठेवले होते. पण नंतर ते रद्द झाले. कारण, त्या जेवणामध्ये मारामाऱ्या होतील मंत्री पदावरून म्हणून काल त्यांचे हेलिकॉप्टर देखील उडू शकले नाही, असे राऊत म्हणाले.  त्यांच्या बाजूने जनता आणि निसर्ग देखील नाही, हे सर्व औट घटकेचे सरकार आहे. 2024 ला महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडियाचे सरकार येईल. तेव्हा तुम्ही कुठे जाल? माझ्या महाराष्ट्रातील पोलिसांना आणि तपास यंत्रणेला देखील सवाल आहे. 2024 ला या सर्व खोट्या तपासण्या चौकशा केसेस या बद्दल तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाईल, कोणालाही दया, माया केली जाणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदी