शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट; पेरण्यांसाठी पोषक स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 12:57 IST

लांबलेल्या खरिपाच्या पेरण्यांमुळे काळजीत पडलेल्या बळीराजाला 'पेरते व्हा' चा संदेश छत्रपती संभाजीनगरच्या कृषी हवामान केंद्राने दिला आहे. तसेच येत्या १५ जुलै पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून बहुतेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे

मुक्ता सरदेशमुख 

राज्यात यंदा पावसाने काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी दडी मारल्याचे चित्र असताना भारतीय हवामान खात्याने कोकणासह  विदर्भ आणि  मराठवाड्याला जोरदार पावसाचा इशारा  दिला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. हे  वृत्त प्रसिद्ध होत असताना नाशिक शहर आणि परिसरात जोरदार पावसाचे आगमन झाले. संभाजीनगर परिसरातही आज पावसाने हजेरी लावली. 

 दरम्यान लांबलेल्या खरिपाच्या पेरण्यांमुळे काळजीत पडलेल्या बळीराजाला 'पेरते व्हा' चा संदेश छत्रपती संभाजीनगरच्या कृषी हवामान केंद्राने दिला आहे. तसेच येत्या १५ जुलै पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून बहुतेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

यलो अलर्ट कुठे?सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना. बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर, यवतमाळ जिल्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरधारांचा इशारा देण्यात आला आहे. 

मुसळधारांचा अंदाज

गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून  मुंबई  प्रादेशिक हवामान केंद्रातून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहणार असून १३ ते १६ जुलै दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच आज (१२ जुलै) रोजी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

 खरिपाच्या पेरण्यांसाठी पोषक स्थिती

यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या. पेरण्यांसंदर्भात बळीराजाच्या संभ्रम वाढलेला दिसत असताना पेरणीयोग्य पाऊस झाला असेल तर पेरणी करण्यास हरकत नाही असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. छत्रपती संभाजीनगर कृषी हवामान केंद्राने दिलेल्या सल्ल्यानुसार,   "सोयाबीन, ज्वारी, बाजरी व इतर पीक उत्पादक शेतकऱ्यांनी आपापल्या विभागात पेरणीयोग्य पाऊस (७५ ते १०० मि.मि.) झाला असेल तर पेरण्या करता येतील .  तसेच शेतकऱ्यांना  पिकांची पेरणी बीज प्रक्रिया पूर्ण करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे."

शिव काजळे, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर 

कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पालघर, नाशिक, नंदूरबार, धुळे, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, हिंगोली, नांदेड, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांमुळे होणारा धोका टाळण्यासाठी पुरेशी काळजी घेण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळाली असली तरी मध्य  महाराष्ट्र, मराठवाडा आणि खान्देशात हलक्या ते माध्यम सारी बरसतील. कोकणातील सिंधुदुर्ग तर विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ अकोला, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया , गडचिरोली जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

टॅग्स :Monsoon forecastमोसमी पावसाचा अंदाजKharifखरीपmonsoonमोसमी पाऊसsowingपेरणीFarmerशेतकरी